शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंनी व्यासपीठावरून दिला ‘शब्द’; शहराच्या विकासावरून मांडलं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 12:53 IST

शहरांमध्ये दिवे लावले त्याला सौंदर्य म्हणतात का? वीजेच्या पोलवर लायटिंग केली म्हणजे सुंदर शहर झाले असं होत नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं.

पुणे – जेव्हा कधी माझ्या महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात येईल तेव्हा शहराचं नियोजन करण्यासाठी प्लॅनिंग आर्किटेक्टच्या हाती देईन हा माझा शब्द आहे असं राज ठाकरे यांनी पुण्यात एका मुलाखतीत म्हटलं आहे. जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त शहर नियोजन, सौंदर्यदृष्टी आणि शाश्वत विकास ह्यावर विषयावर ज्येष्ठ लेखक दीपक करंजीकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरून अनेक गोष्टींवर भाष्य केले.

या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले की, आजही मुंबई दर्शन घडवायचे झाले तर त्यात ब्रिटीश कालीन वास्तू दाखवल्या जातात. शहर रचना हे रॉकेट सायन्स नाही, किती लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येला लागणाऱ्या गोष्टी कोणत्या, शाळा, मार्केट, हॉस्पिटल, रस्ते हे सांगावे लागतात. परळमध्ये हॉस्पिटलचा हब ब्रिटिशांनी बनवला. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत असा कुठलाही हब बनला नाही. आता अनेक गोष्टी खासगीकरण केले जाते हे चिंताजनक आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मी जेव्हा बाळासाहेबांची फोटोग्राफी तयार करत होतो, तेव्हा गेट ऑफ इंडियासमोर सर्व जनता बसली होती. अटलबिहारी वाजपेयी तिथे होते, त्यांच्या सुरक्षेसाठी एक अधिकारी आले. त्यांनी विचारले हे काय आहे तर मी म्हटलं ताज हॉटेल आहे. ते म्हणाले हे कपड्याने झाका, मी म्हटलं माझ्या बापाची मिल आहे. हा विचार त्यांच्या डोक्यात आला हा महत्त्वाचा आहे. ताजसारखी बिल्डिंग झाकण्याचा विचार येणे महत्त्वाचे आहे असा किस्सा राज यांनी मुलाखतीत सांगितला. समाजाचा नगरसेवक, आमदार, खासदार यांच्याशी संपर्क येतो कधी? किती वेळा भेटतात? छोटीमोठी कामे असली तर भेटतात. नाहीतर रोज सकाळी बॅग उचलून कामावर जायचे घरी यायचे, या लोकांना समाधान लागते. खासदार, आमदार, नगरसेवकांची कामे लोकांना माहिती नाहीत अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.

दरम्यान, शहरांमध्ये दिवे लावले त्याला सौंदर्य म्हणतात का? वीजेच्या पोलवर लायटिंग केली म्हणजे सुंदर शहर झाले असं होत नाही. लोकसंख्येनुसार १५ टक्के रस्ते लागतात. पुण्यात ७ ते ८ टक्के रस्ते आहेत. एकेदिवशी घरातून निघाल तर तिथेच फसाल. १ इमारत वाढली, तर त्यात किती गाड्या, माणसे येणार, मित्र परिवार येणार हे सगळे किती मावणार कसे याचा विचार न करता एफएसआय दिला जातो. स्विमिंग पूल महापालिकेने लोकांना द्यायचा आज तीच गोष्ट बिल्डर लोकांना देतायेत आणि त्यातून पैसे कमावतात. मग प्रशासन केवळ परवानगी देण्यासाठी आहे का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.

शहरांचा विचका करणाऱ्यांना मतदान केले जाते

कुठलेही प्लॉट विकले जातायेत, कुणीही येतंय, राज ठाकरे ओरडून सांगतोय, बाहेरुन येणारे लोंढे आण त्यांच्यासाठी निर्माण करणाऱ्या सुविधा यामुळे शहराचे विद्रुपीकरण होतंय, अनाधिकृत इमारती उभ्या राहतात. असलेल्या लोकांमुळे शहरात समस्या झाल्या नाहीत तर येणाऱ्या लोकांमुळे सुरु आहे. हे सगळं मतांच्या राजकारणामुळे झालंय. कुणी स्पष्ट बोलत नाही. धारावी मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी ओळखली जायची आज अशा अनेक झोपडपट्ट्या तयार झाल्या. मोकळ्या जागेत झोपडपट्टी वसवली जाते त्यानंतर कालांतराने एसआरएमधून घरे दिली जातायेत. अशा राजकारणी लोकांना मतदान केले जाते. शहरे घाण केलेल्यांना कधीच कळत नाही. आपण चुकीचे काम करतोय हे लोकांनी मतदान केले नाही तर त्यांना कळाले. शहरांचा विचका ज्या लोकांनी केला, त्याच त्याच पक्षांना, त्याच लोकांना मतदान करतोय हे मतदारांना का कळत नाही अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.

राजकारणात लोकसहभाग वाढावा

१९९५ आधीचा आणि १९९५ नंतरचा महाराष्ट्र असे विभाजन करावे लागेल. १९९१-९२ साली देशात मार्केट उघडलं याची जाणीव महाराष्ट्रातल्या, देशातल्या मध्यमवर्गीयांना झाली, आज महाराष्ट्रात,देशात अनेक चळवळी मध्यमवर्गाच्या हाती होता. मध्यमवर्ग हा श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दुवा होता, १९९५ वेळी तो अचानक यातून दूर झाले, त्या चळवळी, राजकारण संपले. म्हणून माझी महाराष्ट्रातील प्रत्येक मध्यमवर्गीयांना विनंती तुम्ही राजकारणात लक्ष दिले पाहिजे. तुमची सकाळ पाण्याने होते, पाणी बिल राजकारणी ठरवतात, दुधाचे भाव राजकारणी ठरवतात, तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक गोष्टी राजकारणाशी निगडीत आहे. त्या राजकारणाला तुच्छ मानता असं करू नका, प्रत्येकाने राजकारणात यायला हवे असे नाही तर लक्ष ठेवले पाहिजे. त्यामुळे लोकसहभाग हवा असं आवाहन राज ठाकरेंनी लोकांना केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे