शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

‘समृद्धी महामार्गावरून मेट्रो धावणार नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 06:24 IST

सध्या आठ पदरी महामार्ग तयार होणार आहे. त्यामध्ये १५ मीटरचा काँक्रीटचा पट्टा असेल. २० कोटींचा पेव्हर त्यासाठी टाकण्यात येणार आहे.

औरंगाबाद : जागा उपलब्ध नसल्याने मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नसल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले. भविष्यात मेट्रोसाठी नियोजन करायचे ठरल्यास नव्याने भूसंपादन करावे लागेल. या महामार्गावर ३७ वर्षे टोलवसुली सुरू राहील असेही त्यांनी सांगितले. 

हाय स्पीड रेल्वे (मेट्रो) चा सध्यातरी मुद्दा नाही. मेट्रो महामार्गावरून जाणार तरी कुठून? कारण महामार्गाचा मध्य दुभाजक १५ मीटरचा आहे. रेल्वेसाठी किमान १७ मीटरचा दुभाजक लागतो. त्यामुळे सध्या तरी जागा वाढविणे शक्य नाही.

सध्या आठ पदरी महामार्ग तयार होणार आहे. त्यामध्ये १५ मीटरचा काँक्रीटचा पट्टा असेल. २० कोटींचा पेव्हर त्यासाठी टाकण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाचा भविष्यात विस्तार करायचा ठरल्यास त्यासाठी वाव असेल. १२० मीटरपर्यंत भूसंपादन केलेले आहे. सध्या १२० पैकी केवळ ४९ मीटर जागा वापरली आहे. १२० कि़मी. कोड बदलून ते १५० कि़मी. ताशी वेग असे केले आहे. आयआयटी मुंबईकडून त्यासाठी बदल करण्यात आले आहेत, असे गायकवाड म्हणाले.३७ वर्षे लागणार टोलमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. २०२१ च्या जुलैपर्यंत याचे काम पूर्ण होईल, त्या मार्गावरून प्रवास करायचा झाल्यास प्रति कि़मी. एक रुपया ६५ पैसे एवढी रक्कम चारचाकी वाहनाला मोजावी लागेल. ११६५ रुपये ७०१ कि़ मी. साठी टोल लागणार आहे. २०२१ पासून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण खुला होईल. महामार्ग बांधणीचा कालावधी धरून एकूण ४० वर्षांपर्यंत वाहनधारकांना टोल द्यावा लागेल.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग