मीटरने चला, अन्यथा कारवाई
By Admin | Updated: July 20, 2014 01:12 IST2014-07-20T01:12:36+5:302014-07-20T01:12:36+5:30
उपराजधानीत आॅटोरिक्षांना ई-मीटर बसविण्याची मुदत मागील वर्षी ३० जूनला संपली. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (शहर) वारंवार कारवाईचा बडगा उभारला, परंतु वर्षे होऊनही अनेक

मीटरने चला, अन्यथा कारवाई
आरटीओ : १०० आॅटोंवर कारवाई
नागपूर : उपराजधानीत आॅटोरिक्षांना ई-मीटर बसविण्याची मुदत मागील वर्षी ३० जूनला संपली. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (शहर) वारंवार कारवाईचा बडगा उभारला, परंतु वर्षे होऊनही अनेक आॅटोचालक मीटरने चालत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आरटीओने मागील दोन दिवसांपासून धडक मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत १०० आॅटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली असून यातील ३० आॅटो जप्त करण्यात आले आहेत.
शहरात १९९० पासून ते आतापर्यंत पाचवेळा आॅटोचालकांना मीटरने चालण्याची सक्ती करण्यात आली. परंतु,प्रत्येकवेळा ती बारगळली, हे विशेष. सध्याच्या स्थितीत शहरात ९ हजार २५५ आॅटोरिक्षांचे परवाने देण्यात आले आहेत. मागील वर्षी या आॅटोंवर इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची सक्ती आरटीओने केली होती. यामुळे साधारण ८५ टक्के आॅटोंमध्ये ई-मीटर बसविण्यात आले.
शहरातील आॅटो मीटरने चालण्यासाठी आरटीओने वेळोवेळी सूचना केल्या. आॅटो संघटनांच्या बैठकीत तशी माहिती दिली. परंतु आॅटोरिक्षा मीटरने चालण्यास तयार होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. आरटीओने याची गंभीर दखल घेत ही मोहीम हाती घेतली. मागील दोन दिवसापासून चार वायु पथकाच्यामदतीने आॅटो तपासणी सुरू करण्यात आली. यात आतापर्यंत ७१ आॅटोंना नोटीस देण्यात आले, तर ३० आॅटो जप्त करण्यात आले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले, आॅटो मीटरने चालावा हा नियम आहे.
प्रवाशाच्या मागणी नंतरही आॅटो मीटरने चालत नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जात आहे. यात एका आॅटोवर १५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीत सव्वा लाख रुपये यातून महसूल गोळा करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)