Rajesh Tope On NCP Merger: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात असतानाच, आता राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार राजेश टोपे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. अजितदादा जिवंत असतानाच दोन्ही गट एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले होते, असे टोपे यांनी म्हटले आहे.
"विलीनीकरणाचा निर्णय झालाच होता..."
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना राजेश टोपे म्हणाले की, "अजितदादांच्या उपस्थितीतच विलीनीकरणाचा निर्णय जवळपास झाला होता. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. अगदी शेवटच्या बैठकाही पार पडल्या होत्या. फक्त अधिकृत घोषणा बाकी होती, जी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर केली जाणार होती." टोपे यांच्या या विधानामुळे, पडद्यामागे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात एकत्र येण्याबाबत शिक्कामोर्तब झालं होतं अशी चर्चा सुरु झाली आहे.
बारामतीत नेमकं काय घडलं?
बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर अजित पवार यांचे विमान उतरत असताना भीषण अपघात झाला. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही. पहिल्या प्रयत्नात लँडिंग अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात विमान कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह त्यांच्यासोबत असलेले सुरक्षा अधिकारी आणि क्रू मेंबर्स अशा एकूण ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पुढील नेतृत्व कोणाकडे? सुनेत्रा पवारांकडे सूत्रे देण्याची मागणी
अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या गटाचे भवितव्य काय? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा सांभाळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नरहरी झिरवाळ यांच्यासह अनेक नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
विलीनीकरणाच्या चर्चेने जोर धरला
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ज्या पद्धतीने कुटुंबाला सावरले, त्यावरून दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता अधिक वाढली आहे. जर विलीनीकरण झाले, तर सुप्रिया सुळे केंद्रात आणि सुनेत्रा पवार राज्यात पक्षाचे नेतृत्व करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Web Summary : Rajesh Tope revealed that NCP factions were set to merge before Ajit Pawar's death. The decision was finalized, awaiting announcement post-election. Following Pawar's tragic passing, talks of unification have resurfaced, potentially positioning Supriya Sule nationally and Sunetra Pawar in Maharashtra leadership.
Web Summary : राजेश टोपे ने खुलासा किया कि अजित पवार के निधन से पहले एनसीपी गुटों का विलय होने वाला था। फैसला चुनाव के बाद घोषणा के लिए लंबित था। पवार के निधन के बाद, एकीकरण की बातें फिर से शुरू हो गई हैं, जिससे सुप्रिया सुले को राष्ट्रीय और सुनेत्रा पवार को महाराष्ट्र नेतृत्व में स्थापित किया जा सकता है।