शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

पुलवामा घटनेआड मोदींकडून जमिनींचे सौदे, मेधा पाटकर यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 21:22 IST

पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेत या घटनेआडून आदिवासी व दलितांच्या जमिनी खाण मालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला

 सांगली - पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेत या घटनेआडून आदिवासी व दलितांच्या जमिनी खाण मालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला, अशी टीका नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी सांगलीत केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आघाडीच्यावतीने सांगलीच्या स्टेशन चौकात महिला मेळावा पार पडला. यावेळी महिला काँग्रेसच्या प्रभारी सोनलबेन पटेल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या अध्यक्षा पूजा मोरे, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील उपस्थित होत्या. पाटकर म्हणाल्या की, देशातील सरकार हे जाती-जातीत विष पेरणारे, महिलांविरोधी, आदिवासी, दलितांना उद्ध्वस्त करणारे, देशात कंपनीराज आणू पाहणारे आहे. त्यामुळे त्यांना सत्तेवरून हटविणे भारतीयांचे कर्तव्य आहे. पुलवामाची घटना घडल्यानंतर त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न सरकारने केला. या घटनेने देश हादरला असताना, तब्बल १ लाख ७0 हजार हेक्टर जमिनींचा सौदा खाण कंपन्यांशी करण्यात आला. निवडणुका संपताच गोरगरीब आदिवासी, दलितांच्या जमिनी या कंपन्या ताब्यात घेतील. निसर्गाची नको तेवढी हानी करून आपल्या देशाचे, भौगोलिक परिस्थितीचे शोषण करतील. या सौद्याबरोबरच अदानीच्या कंपनीला आठ विमानतळही त्यांनी विकून टाकली. अशाप्रकारच्या देशविरोधी गोष्टी हे सरकार करीत आहे. ब्रिटिश जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांनी एक कंपनी आणली होती. मात्र नरेंद्र मोदी या देशात हजारो कंपन्या आणून कंपनीराज करू पाहताहेत. या देशात कंपन्या कधीही कर्जबाजारी होत नाहीत, मात्र कष्टकरी, शेतकरी नेहमीच कर्जबाजारी राहतो, हे दुर्दैव आहे. देशातील १ टक्का लोकांकडेच देशाची ८0 टक्के संपत्ती एकवटण्याचे हेच एकमेव कारण आहे. जनआंदोलने आणि पक्ष जेव्हा एकत्र येतात, तेव्हा देशविरोधी गोष्टींना रोखण्याचा विषय असतो. त्याचप्रमाणे देशाच्या हिताविरोधात काम करणाºयांना रोखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असेही पाटकर म्हणाल्या. सोनलबेन पटेल म्हणाल्या की, मोदींनी ज्या गुजरात पॅटर्नचा गाजावाजा देशभर केला, तो निव्वळ फसवा होता. याठिकाणच्या महिलांच्या, सामान्य लोकांच्या समस्या अन्य राज्यांप्रमाणेच आहेत. कोणताही विकास न करता विकासाचा दावा ते करीत आहेत. शिक्षण व्यवस्था महाग करून गरिबांच्या मुला-मुलींना या प्रवाहापासून रोखण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. त्यामुळे त्यास मतांमधून विरोध केला पाहिजे. पूजा मोरे म्हणाल्या की, मुलींना पळवून नेण्याची भाषा करणारे, मुलींवर अत्याचार करणारे आणि मराठा समाजाच्या मोर्चाची, त्यांच्या मुलींची थट्टा करणारे हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे. या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात आता केवळ शेतकरीच आत्महत्या करीत नसून, त्यांच्या मुलीसुद्धा आत्महत्या करू लागल्या आहेत. या परिस्थितीतही या सरकारला या गोष्टीची खंत व शरम वाटत नाही. त्यामुळे झाशीच्या राणीप्रमाणे आता महिलांनी पेटून उठावे आणि भाजप सरकारला सत्तेवरून खेचावे, असे आवाहन त्यांनी केले. कॉँग्रेसच्या मनीषा तिवारी, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा रोटे, राष्टÑवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विनया पाठक, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा मंगला सराफ, पूजा पाटील यांनी भाषणे केली. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, नगरसेविका रोहिणी पाटील, मालन मोहिते, सुवर्णा पाटील, शुभांगी साळुंखे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरNarendra Modiनरेंद्र मोदीsangli-pcसांगलीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक