शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना सर्वात जास्त झाडांचा खून - आशिष शेलार 

By प्रमोद सुकरे | Updated: June 11, 2025 14:40 IST

''त्यांना' बेईमानीची व्याख्या शिकवावी लागेल'

प्रमोद सुकरे कऱ्हाड: मुंबईतील सर्वात जास्त झाडांचा खून हा आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना झाला आहे. त्यांनी आपल्या महापालिकेतील विकासकाला जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून प्रत्येक वर्षी ६ ते ७ हजार झाडांची कत्तल केली आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे मत भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विट बाबत माध्यमांनी त्यांना प्रश्न केला होता.बुधवारी आशिष शेलार कराड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.शेलार म्हणाले, भारतीय जनता पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पक्षाची व्याप्ती वाढत आहे. भाजप मजबूत झाला तरच महायुती मजबूत होणार असून सबका साथ सबका विकास हीच भाजपची भूमिका राहिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी निधी देत नाही अशी टीका करणाऱ्यांना मी पैसे खिशात घेऊन फिरतो काय? असा सवाल केला आहे. याबाबत विचारताच, मी त्याबाबत काही ऐकलेले नाही. असे सांगत त्या प्रश्नाला बगल दिली.

त्यांना बेईमानीची व्याख्या शिकवावी लागेलमहाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत केलेल्या प्रवेशबाबत संजय राऊत यांनी टीका केली आहे. याबाबत छेडले असता शेलार म्हणाले, खरंतर त्यांना बेईमानी ची व्याख्या शिकवावी लागेल. कारण चंद्रहार पाटील यांनी केलेला प्रवेश हा स्वतःच्या मर्जीने केलेला प्रवेश आहे .या उलट महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली. त्याचे मूळ संजय राऊत आहेत. ते आमच्या बरोबर राहिले, निवडणूक लढले आणि त्यानंतर सत्तेसाठी निघून गेले. त्यांना खरंतर 'बेईमान ऑफ महाराष्ट्र' हा किताब दिला पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAshish Shelarआशीष शेलारAditya Thackreyआदित्य ठाकरे