शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मविआला कर्नाटकी बूस्टर; कर्नाटकच्या काँग्रेसी कशिद्याने भाजपवर चिंतनाची वेळ; काँग्रेसचे मनोधैर्य वाढले

By यदू जोशी | Updated: May 14, 2023 06:25 IST

राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. 

 

मुंबई : कर्नाटकमधील काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे. आपसातील मतभेद दूर सारून या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र राहिले तर, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजप-शिंदे युतीसमोर मोठे आव्हान उभे राहील, असे मानले जात आहे. 

राष्ट्रवादी, काँग्रेसशिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. 

एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याचे नाट्य घडले. त्यावरूनही राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी एकमेकांवर काही आरोप केले. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी ठाकरे यांचे विश्वासू खा. संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले. मात्र, आता कर्नाटकच्या निकालानंतर मविआचे मनोबळ वाढेल व आपसातील वाद कमी करून भाजपविरोधात ठामपणे उभे राहण्याचा नेत्यांवरही दबाव येईल, असे म्हटले जाते.

कर्नाटकातील पराभवामुळे राज्यातील भाजपवरही चिंतनाची वेळ आणली आहे. लोकसभा निवडणुकीत किमान ४२ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निर्धारित केले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) हे वेगवेगळे लढले होते. मात्र, त्यांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपला उचलता आला नाही. महाराष्ट्रात भाजपविरोधात तीन प्रमुख पक्षांची वज्रमूठ आजतरी कायम आहे. त्यात काही फूट पडू शकेल का, यावर भाजप लक्ष केंद्रित करेल, असा अंदाज आहे. 

सरकारची कामगिरी उंचवावी लागेल आघाडीत बिघाडी होऊ नये, याची काळजी मविआला घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारचे अपयश हिंदुत्वाचा मुद्दा समोर करून झाकण्याचा प्रयत्न कर्नाटकात भाजपने केला. पण, त्यात यश आले नाही. महाराष्ट्रातही तसे करता येणार नाही; सरकारची कामगिरी उंचवावी लागेल, असा संदेशही या निकालाने भाजपला दिला आहे. 

भाजप-सेना युतीवर हल्ले तीव्र होतीलभाजपची कोंडी करण्याची संधीही या निकालाने मविआच्या नेत्यांना मिळवून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजप-शिवसेना युतीवर विरोधकांचे हल्ले अधिक तीव्र होतील, असे मानले जात आहे. त्यासाठी या युतीला तयार राहावे लागणार आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस