शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

मविआला कर्नाटकी बूस्टर; कर्नाटकच्या काँग्रेसी कशिद्याने भाजपवर चिंतनाची वेळ; काँग्रेसचे मनोधैर्य वाढले

By यदू जोशी | Updated: May 14, 2023 06:25 IST

राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. 

 

मुंबई : कर्नाटकमधील काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे. आपसातील मतभेद दूर सारून या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र राहिले तर, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजप-शिंदे युतीसमोर मोठे आव्हान उभे राहील, असे मानले जात आहे. 

राष्ट्रवादी, काँग्रेसशिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. 

एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याचे नाट्य घडले. त्यावरूनही राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी एकमेकांवर काही आरोप केले. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी ठाकरे यांचे विश्वासू खा. संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले. मात्र, आता कर्नाटकच्या निकालानंतर मविआचे मनोबळ वाढेल व आपसातील वाद कमी करून भाजपविरोधात ठामपणे उभे राहण्याचा नेत्यांवरही दबाव येईल, असे म्हटले जाते.

कर्नाटकातील पराभवामुळे राज्यातील भाजपवरही चिंतनाची वेळ आणली आहे. लोकसभा निवडणुकीत किमान ४२ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निर्धारित केले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) हे वेगवेगळे लढले होते. मात्र, त्यांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपला उचलता आला नाही. महाराष्ट्रात भाजपविरोधात तीन प्रमुख पक्षांची वज्रमूठ आजतरी कायम आहे. त्यात काही फूट पडू शकेल का, यावर भाजप लक्ष केंद्रित करेल, असा अंदाज आहे. 

सरकारची कामगिरी उंचवावी लागेल आघाडीत बिघाडी होऊ नये, याची काळजी मविआला घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारचे अपयश हिंदुत्वाचा मुद्दा समोर करून झाकण्याचा प्रयत्न कर्नाटकात भाजपने केला. पण, त्यात यश आले नाही. महाराष्ट्रातही तसे करता येणार नाही; सरकारची कामगिरी उंचवावी लागेल, असा संदेशही या निकालाने भाजपला दिला आहे. 

भाजप-सेना युतीवर हल्ले तीव्र होतीलभाजपची कोंडी करण्याची संधीही या निकालाने मविआच्या नेत्यांना मिळवून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजप-शिवसेना युतीवर विरोधकांचे हल्ले अधिक तीव्र होतील, असे मानले जात आहे. त्यासाठी या युतीला तयार राहावे लागणार आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस