शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मविआला कर्नाटकी बूस्टर; कर्नाटकच्या काँग्रेसी कशिद्याने भाजपवर चिंतनाची वेळ; काँग्रेसचे मनोधैर्य वाढले

By यदू जोशी | Updated: May 14, 2023 06:25 IST

राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. 

 

मुंबई : कर्नाटकमधील काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मोठे बळ मिळाले आहे. आपसातील मतभेद दूर सारून या तिन्ही पक्षांचे नेते एकत्र राहिले तर, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजप-शिंदे युतीसमोर मोठे आव्हान उभे राहील, असे मानले जात आहे. 

राष्ट्रवादी, काँग्रेसशिवसेना या तीन पक्षांच्या छत्रपती संभाजीनगर, मुंबई व नंतर नागपुरातील वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे भाजप-शिंदे युती बॅकफूटवर जात असतानाच मविआतील तीन पक्षांमधले मतभेद उफाळून आले. 

एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याचे नाट्य घडले. त्यावरूनही राष्ट्रवादी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी एकमेकांवर काही आरोप केले. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी ठाकरे यांचे विश्वासू खा. संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले. मात्र, आता कर्नाटकच्या निकालानंतर मविआचे मनोबळ वाढेल व आपसातील वाद कमी करून भाजपविरोधात ठामपणे उभे राहण्याचा नेत्यांवरही दबाव येईल, असे म्हटले जाते.

कर्नाटकातील पराभवामुळे राज्यातील भाजपवरही चिंतनाची वेळ आणली आहे. लोकसभा निवडणुकीत किमान ४२ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निर्धारित केले आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस व जनता दल (सेक्युलर) हे वेगवेगळे लढले होते. मात्र, त्यांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपला उचलता आला नाही. महाराष्ट्रात भाजपविरोधात तीन प्रमुख पक्षांची वज्रमूठ आजतरी कायम आहे. त्यात काही फूट पडू शकेल का, यावर भाजप लक्ष केंद्रित करेल, असा अंदाज आहे. 

सरकारची कामगिरी उंचवावी लागेल आघाडीत बिघाडी होऊ नये, याची काळजी मविआला घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारचे अपयश हिंदुत्वाचा मुद्दा समोर करून झाकण्याचा प्रयत्न कर्नाटकात भाजपने केला. पण, त्यात यश आले नाही. महाराष्ट्रातही तसे करता येणार नाही; सरकारची कामगिरी उंचवावी लागेल, असा संदेशही या निकालाने भाजपला दिला आहे. 

भाजप-सेना युतीवर हल्ले तीव्र होतीलभाजपची कोंडी करण्याची संधीही या निकालाने मविआच्या नेत्यांना मिळवून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजप-शिवसेना युतीवर विरोधकांचे हल्ले अधिक तीव्र होतील, असे मानले जात आहे. त्यासाठी या युतीला तयार राहावे लागणार आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस