शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

मातोश्रीवर येऊन गैरसमज दूर करावा!

By admin | Updated: October 15, 2015 10:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याकरिता भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याकरिता भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या अपमानाबाबतचे गैरसमज दूर करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर येऊन भेट घ्यावी, असा निरोप शिवसेनेच्या चार मंत्र्यांनी बुधवारी त्यांना दिला. मात्र त्यावर फडणवीस यांनी चक्क मौन बाळगले.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन करण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण ठाकरे यांना दिले गेले नाही याबद्दल मंत्र्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांना राजशिष्ठाचारानुसार व्यासपीठावर कसे बसवणार, असा प्रश्न सरकारने उपस्थित केला. परिणामी निमंत्रण पाठवण्यास विलंब झाला व अखेरच्या क्षणी निमंत्रणाची औपचारिकता पूर्ण केली गेली हा सर्व प्रकार अपमानास्पद असल्याचे मंत्र्यांनी फडणवीस यांच्या कानावर घातले.मुंबईतील विमानतळाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाला होता तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यासपीठावर बसले होते. तत्कालीन काँग्रेस सरकारमधील मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजशिष्टाचाराचा बाऊ केला नव्हता. आता शिवसेना सरकारमध्ये असताना अचानक राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे उद्धव ठाकरे दुखावले असून झालेले गैरसमज दूर करण्याकरिता मातोश्रीवर येऊ भेटा, असा निरोप मंत्र्यांनी फडणवीस यांना दिला. त्यावर फडणवीस यांनी कुठलीच प्रतिक्रिया न दिल्याने शिवसेनेचे मंत्री अस्वस्थ झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)>>राज्यातील सरकारला वर्ष पूर्ण होत असताना भाजपा-शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपाच्या राज्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक दादर येथील वसंत स्मृती येथे उद्या(गुरुवारी) बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या बैठकीत युती तोडून तीन पायांची शर्यत संपवण्याची मागणी झाली होती. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत शिवसेनेबाबत आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष काय भूमिका घेतात याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.