शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मातोश्रीवर येऊन गैरसमज दूर करावा!

By admin | Updated: October 15, 2015 10:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याकरिता भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याकरिता भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या अपमानाबाबतचे गैरसमज दूर करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर येऊन भेट घ्यावी, असा निरोप शिवसेनेच्या चार मंत्र्यांनी बुधवारी त्यांना दिला. मात्र त्यावर फडणवीस यांनी चक्क मौन बाळगले.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन करण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण ठाकरे यांना दिले गेले नाही याबद्दल मंत्र्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांना राजशिष्ठाचारानुसार व्यासपीठावर कसे बसवणार, असा प्रश्न सरकारने उपस्थित केला. परिणामी निमंत्रण पाठवण्यास विलंब झाला व अखेरच्या क्षणी निमंत्रणाची औपचारिकता पूर्ण केली गेली हा सर्व प्रकार अपमानास्पद असल्याचे मंत्र्यांनी फडणवीस यांच्या कानावर घातले.मुंबईतील विमानतळाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाला होता तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यासपीठावर बसले होते. तत्कालीन काँग्रेस सरकारमधील मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजशिष्टाचाराचा बाऊ केला नव्हता. आता शिवसेना सरकारमध्ये असताना अचानक राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे उद्धव ठाकरे दुखावले असून झालेले गैरसमज दूर करण्याकरिता मातोश्रीवर येऊ भेटा, असा निरोप मंत्र्यांनी फडणवीस यांना दिला. त्यावर फडणवीस यांनी कुठलीच प्रतिक्रिया न दिल्याने शिवसेनेचे मंत्री अस्वस्थ झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)>>राज्यातील सरकारला वर्ष पूर्ण होत असताना भाजपा-शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपाच्या राज्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक दादर येथील वसंत स्मृती येथे उद्या(गुरुवारी) बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या बैठकीत युती तोडून तीन पायांची शर्यत संपवण्याची मागणी झाली होती. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत शिवसेनेबाबत आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष काय भूमिका घेतात याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.