शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मातोश्रीवर येऊन गैरसमज दूर करावा!

By admin | Updated: October 15, 2015 10:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याकरिता भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याकरिता भूमिपूजनाच्या निमंत्रणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या अपमानाबाबतचे गैरसमज दूर करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर येऊन भेट घ्यावी, असा निरोप शिवसेनेच्या चार मंत्र्यांनी बुधवारी त्यांना दिला. मात्र त्यावर फडणवीस यांनी चक्क मौन बाळगले.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन करण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण ठाकरे यांना दिले गेले नाही याबद्दल मंत्र्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांना राजशिष्ठाचारानुसार व्यासपीठावर कसे बसवणार, असा प्रश्न सरकारने उपस्थित केला. परिणामी निमंत्रण पाठवण्यास विलंब झाला व अखेरच्या क्षणी निमंत्रणाची औपचारिकता पूर्ण केली गेली हा सर्व प्रकार अपमानास्पद असल्याचे मंत्र्यांनी फडणवीस यांच्या कानावर घातले.मुंबईतील विमानतळाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाला होता तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यासपीठावर बसले होते. तत्कालीन काँग्रेस सरकारमधील मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजशिष्टाचाराचा बाऊ केला नव्हता. आता शिवसेना सरकारमध्ये असताना अचानक राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे उद्धव ठाकरे दुखावले असून झालेले गैरसमज दूर करण्याकरिता मातोश्रीवर येऊ भेटा, असा निरोप मंत्र्यांनी फडणवीस यांना दिला. त्यावर फडणवीस यांनी कुठलीच प्रतिक्रिया न दिल्याने शिवसेनेचे मंत्री अस्वस्थ झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)>>राज्यातील सरकारला वर्ष पूर्ण होत असताना भाजपा-शिवसेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपाच्या राज्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक दादर येथील वसंत स्मृती येथे उद्या(गुरुवारी) बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारांच्या बैठकीत युती तोडून तीन पायांची शर्यत संपवण्याची मागणी झाली होती. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत शिवसेनेबाबत आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष काय भूमिका घेतात याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.