शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 14:56 IST

गेल्या १५ वर्षापासून अब्दुल सत्तार हिंदू लोकांची मते घेतात आणि हिंदूंवर अत्याचार करतात त्याविरोधात आमचा मोर्चा असल्याचं आंदोलकांनी म्हटलं.

सिल्लोड - छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड इथं शिंदे गटाचे आमदार आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपाच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला आहे. या मोर्चात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे घेऊन अब्दुल सत्तारांविरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती. सिल्लोड आणि सोयगावमध्ये सत्तारांची हुकुमशाही असल्याचा आरोप या आंदोलकांकडून केला जात होता. काही दिवसांपूर्वी सत्तार समर्थकांनी भाजपाचेरावसाहेब दानवे यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून हा मोर्चा काढल्याचं बोललं जाते. 

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. सिल्लोडला मिनी पाकिस्तान म्हटल्यामुळे दानवेंविरोधात याठिकाणी मोर्चा निघाला होता. आता सत्तार समर्थकांच्या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी संघटनांनी अब्दुल सत्तारांविरोधात मोर्चा काढला. या मोर्चात आंदोलकांनी वेगवेगळे बॅनर्स हातात घेतले होते. गेल्या १५ वर्षापासून अब्दुल सत्तार हिंदू लोकांची मते घेतो आणि हिंदूंवर अत्याचार करतो त्याविरोधात आमचा मोर्चा असल्याचं आंदोलकांनी म्हटलं.

काय आहे आरोप?

अब्दुल सत्तार यांनी महिनाभरात त्यांच्याकडील बळाचा वापर करून पोलिसांवर दबाव आणून आमच्या ५० लोकांवर गुन्हा दाखल करायला लावले. गोरगरिबांच्या जमिनी हडपण्याचं काम सत्तारांनी केले. लोकांच्या कोट्यवधीच्या संपत्ती कवडीमोल दराने खरेदी केल्या. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा आहे. या मोर्चात भाजपा नेत्यांनी सहभाग घेतल्याचं आंदोलकांनी सांगितले. महाराष्ट्रात युवकांना नोकरी मिळावी यासाठी आरक्षणाचा लढा सुरू असताना दुसरीकडे या तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री वेगवेगळ्या जातीतील हिंदू तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. त्यात मराठा, माळी, कोळी अठरापगड जातीतील मुले आहेत त्यामुळे सत्तारांविरोधात हा मोर्चा आहे असंही आंदोलक म्हणाले.

रावसाहेब दानवेंविरोधात निघाला होता मोर्चा

सिल्लोडचा वारंवार पाकिस्तान म्हणून उल्लेख करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या गुरुवारी सिल्लोडमध्ये मोर्चा निघाला होता.  दानवे यांनी बेताल वक्तव्य थांबवावे ,सिल्लोड तालुक्याची बदनामी करू नये नसता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील घरावर मोर्चा काढू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता.  

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारraosaheb danveरावसाहेब दानवेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा