शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

मराठवाड्याच्या पाण्यावर पुन्हा दरोडा!

By admin | Updated: July 28, 2015 02:14 IST

दारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात

- संजय जाधव,  पैठणदारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वी सोडलेले १० हजार ५०० क्युसेक्सने पाणी केवळ १ हजार क्युसेक्सने दाखल होत आहे. जायकवाडीच्या मृत साठ्यातून जवळपास १७.३१७ दलघमी पाणी उपसण्यात आले आहे. या साठ्यात ४० टक्के गाळ साचलेला असल्याने धरणावर अवलंबून असलेल्या मराठवाड्यावर पाणीटंचाईचे गंभीर सावट पसरलेले आहे. यंदाची परिस्थिती लक्षात घेता धरणात पाणी आले नाही, तर मोठी पाणीकपात करूनही वर्षभर पाण्याचे नियोजन करणे अवघड जाणार आहे. त्यातच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडविले जात आहे. काय आहे नियम?समन्यायी पाणीवाटपासंदर्भात जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने केलेल्या नियमानुसार जायकवाडीत पाणी सोडल्यानंतर कोणत्याही कालव्याद्वारे पाणी वळविण्यात येऊ नये, तसेच उच्चपातळी बंधारे मोकळे ठेवावेत, असे स्पष्ट म्हटले आहे. मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाने जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमास धाब्यावर बसवून अन्याय केला आहे.तब्बल ५२ तासांनी पाणीदारणा धरणातून सोडलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पात जमा होऊन पुढे गोदावरी पात्रातून जायकवाडीकडे धावते. जायकवाडी धरणापर्यंत गोदावरी पात्रात १२ उच्चपातळी बंधारे आहेत. त्यात तांदळज, मजूर, दत्त, सागर, हिंगणा, डाऊख या बंधाऱ्यांचा समावेश आहे. त्यांचे दरवाजे १ जुलैनंतर उघडे ठेवणे बंधनकारक आहे; परंतु जवळपास सर्वच बंधाऱ्यांच्या दरवाजात फळ्या टाकून आडकाठी निर्माण करण्यात आली. बंधाऱ्यांतच मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात आले. त्यामुळे नांदूर मधमेश्वर ते पैठण २६ तासांत पोहोचणारे पाणी तब्बल ५२ तासांनी जायकवाडीत दाखल झाले आहे. - १५ आॅक्टोबरनंतर आढावा घेऊन वापरलेले पाणी व प्रकल्पात शिल्लक असलेला साठा विचारात घेऊन खाली पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातो. दारणा धरणातून पाणी कसे सुटले याबाबत मला माहीत नाही. तेथील मुख्य अभियंत्यांना विचारा, ते माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बिराजदार यांनी सांगितले.