शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या पाण्यावर पुन्हा दरोडा!

By admin | Updated: July 28, 2015 02:14 IST

दारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात

- संजय जाधव,  पैठणदारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वी सोडलेले १० हजार ५०० क्युसेक्सने पाणी केवळ १ हजार क्युसेक्सने दाखल होत आहे. जायकवाडीच्या मृत साठ्यातून जवळपास १७.३१७ दलघमी पाणी उपसण्यात आले आहे. या साठ्यात ४० टक्के गाळ साचलेला असल्याने धरणावर अवलंबून असलेल्या मराठवाड्यावर पाणीटंचाईचे गंभीर सावट पसरलेले आहे. यंदाची परिस्थिती लक्षात घेता धरणात पाणी आले नाही, तर मोठी पाणीकपात करूनही वर्षभर पाण्याचे नियोजन करणे अवघड जाणार आहे. त्यातच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडविले जात आहे. काय आहे नियम?समन्यायी पाणीवाटपासंदर्भात जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने केलेल्या नियमानुसार जायकवाडीत पाणी सोडल्यानंतर कोणत्याही कालव्याद्वारे पाणी वळविण्यात येऊ नये, तसेच उच्चपातळी बंधारे मोकळे ठेवावेत, असे स्पष्ट म्हटले आहे. मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाने जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमास धाब्यावर बसवून अन्याय केला आहे.तब्बल ५२ तासांनी पाणीदारणा धरणातून सोडलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पात जमा होऊन पुढे गोदावरी पात्रातून जायकवाडीकडे धावते. जायकवाडी धरणापर्यंत गोदावरी पात्रात १२ उच्चपातळी बंधारे आहेत. त्यात तांदळज, मजूर, दत्त, सागर, हिंगणा, डाऊख या बंधाऱ्यांचा समावेश आहे. त्यांचे दरवाजे १ जुलैनंतर उघडे ठेवणे बंधनकारक आहे; परंतु जवळपास सर्वच बंधाऱ्यांच्या दरवाजात फळ्या टाकून आडकाठी निर्माण करण्यात आली. बंधाऱ्यांतच मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात आले. त्यामुळे नांदूर मधमेश्वर ते पैठण २६ तासांत पोहोचणारे पाणी तब्बल ५२ तासांनी जायकवाडीत दाखल झाले आहे. - १५ आॅक्टोबरनंतर आढावा घेऊन वापरलेले पाणी व प्रकल्पात शिल्लक असलेला साठा विचारात घेऊन खाली पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातो. दारणा धरणातून पाणी कसे सुटले याबाबत मला माहीत नाही. तेथील मुख्य अभियंत्यांना विचारा, ते माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बिराजदार यांनी सांगितले.