शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
2
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
3
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी
4
गायिका मैथिली ठाकूर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार? विनोद तावडेंची घेतली भेट
5
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
6
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
7
Gautami Patil: अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
8
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
9
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
10
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
11
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
12
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
13
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
14
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
15
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
16
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
17
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
18
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

मराठवाड्याच्या पाण्यावर पुन्हा दरोडा!

By admin | Updated: July 28, 2015 02:14 IST

दारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात

- संजय जाधव,  पैठणदारणा धरणातून जायकवाडी धरणासाठी गोदावरी पात्रात सोडलेले पाणी नाशिक ते पैठणदरम्यान असलेल्या १२ उच्चपातळी बंधाऱ्यात व अहमदनगर जिल्ह्यातील कालव्याद्वारे वळविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन दिवसांपूर्वी सोडलेले १० हजार ५०० क्युसेक्सने पाणी केवळ १ हजार क्युसेक्सने दाखल होत आहे. जायकवाडीच्या मृत साठ्यातून जवळपास १७.३१७ दलघमी पाणी उपसण्यात आले आहे. या साठ्यात ४० टक्के गाळ साचलेला असल्याने धरणावर अवलंबून असलेल्या मराठवाड्यावर पाणीटंचाईचे गंभीर सावट पसरलेले आहे. यंदाची परिस्थिती लक्षात घेता धरणात पाणी आले नाही, तर मोठी पाणीकपात करूनही वर्षभर पाण्याचे नियोजन करणे अवघड जाणार आहे. त्यातच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अडविले जात आहे. काय आहे नियम?समन्यायी पाणीवाटपासंदर्भात जलसंपत्ती नियामक प्राधिकरणने केलेल्या नियमानुसार जायकवाडीत पाणी सोडल्यानंतर कोणत्याही कालव्याद्वारे पाणी वळविण्यात येऊ नये, तसेच उच्चपातळी बंधारे मोकळे ठेवावेत, असे स्पष्ट म्हटले आहे. मात्र नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील जलसंपदा विभागाने जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमास धाब्यावर बसवून अन्याय केला आहे.तब्बल ५२ तासांनी पाणीदारणा धरणातून सोडलेले पाणी नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पात जमा होऊन पुढे गोदावरी पात्रातून जायकवाडीकडे धावते. जायकवाडी धरणापर्यंत गोदावरी पात्रात १२ उच्चपातळी बंधारे आहेत. त्यात तांदळज, मजूर, दत्त, सागर, हिंगणा, डाऊख या बंधाऱ्यांचा समावेश आहे. त्यांचे दरवाजे १ जुलैनंतर उघडे ठेवणे बंधनकारक आहे; परंतु जवळपास सर्वच बंधाऱ्यांच्या दरवाजात फळ्या टाकून आडकाठी निर्माण करण्यात आली. बंधाऱ्यांतच मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात आले. त्यामुळे नांदूर मधमेश्वर ते पैठण २६ तासांत पोहोचणारे पाणी तब्बल ५२ तासांनी जायकवाडीत दाखल झाले आहे. - १५ आॅक्टोबरनंतर आढावा घेऊन वापरलेले पाणी व प्रकल्पात शिल्लक असलेला साठा विचारात घेऊन खाली पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातो. दारणा धरणातून पाणी कसे सुटले याबाबत मला माहीत नाही. तेथील मुख्य अभियंत्यांना विचारा, ते माझ्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बिराजदार यांनी सांगितले.