शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दहावी, बारावीच्या नियोजित परीक्षांसाठी मॅरेथॉन बैठका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:18 IST

शिक्षण विभागाकडून येत्या तीन दिवसांत निर्णयाची अपेक्षा

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध आणि शनिवार, रविवारी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णयही कायम ठेवण्यात आला आहे. मात्र दहावी, बारावीच्या नियाेजित ऑफलाइन परीक्षांबाबत काय, असा संभ्रम विद्यार्थी, पालकांमध्ये आहे. दरम्यान, या परीक्षांसंदर्भातील निर्णय येत्या ३ ते ४ दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.दहावी, बारावी बाेर्डाची परीक्षा देणारे राज्यभरातील ३० लाख विद्यार्थी आहेत. वाढत्या काेराेनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांचे आयाेजन कसे करायचे, यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. याच विषयावर अधिक चर्चेसाठी आणखी काही बैठका होणार असून या बैठकांना शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित राहतील. शनिवार, रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे शनिवारी होणाऱ्या पेपरचे काय, त्याचे नियाेजन करायचे, की परीक्षा पुढे ढकलायच्या? बोर्डाच्या परीक्षांना हजर राहणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षकांच्या लसीकरणाचे काय? वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केंद्रावर करणे गरजेचे आहे? याचे कसे नियोजन करायचे, अशा सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याचे समजते.दहावी, बारावीच्या परीक्षांचे यापूर्वीजाहीर झालेले नियोजनदहावी, बारावी बाेर्डाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होतील. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची काळजी घेता यावी म्हणून यंदा त्यांच्याच शाळा, महाविद्यालयांत परीक्षेचे केंद्र असेल. विद्यार्थ्यांमध्ये योग्य सामाजिक अंतर राखून लेखी परीक्षेसाठी यंदा अर्ध्या तासाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. संसर्ग किंवा इतर कोणत्याही कारणास्तव परीक्षा देता न आल्यास जूनमधील विशेष परीक्षेची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकेल.राज्यातील परीक्षांची सद्य:स्थितीपहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द - वर्गाेन्नतीने थेट पुढच्या वर्षात प्रवेश. वर्गोन्नतीच्या मार्गदर्शक सूचना एससीईआरटी करणार जाहीरनववी व अकरावी - लवकरच निर्णय अपेक्षितशिक्षक पर्यवेक्षक चाचण्या किती वेळा करणार?दहावी बारावीच्या परीक्षांना यातून वगळले असले तरी शाळा पातळीवर शिक्षकांनाही काही निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इ. १० व इ. १२ वीच्या परीक्षेच्यावेळी उपस्थित रहाताना आरटी पीसीआर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र हे प्रमाणपत्र फक्त ४८ तासच वैद्य असल्याने परीक्षेसाठी कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षक यांनी ही चाचणी दर २ दिवसांनी करावी असे शासनाला वाटते का असा प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत. त्याऐवजी विद्यार्थ्यांसोबत सर्व वयोगटातील शिक्षकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकापालकवर्गाकडून करण्यात येत आहे.परीक्षेला येणार्‍या विद्यार्थ्यांची कोविडची लक्षणे ओळखून, लक्षणे आढळणार्‍या विद्यार्थ्याला स्वतंत्र खोलीत बसवण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. मात्र कोविडची लक्षणे शिक्षक कसे ओळखणार? त्यांना यंत्रणा उपलब्ध करून देणार का ? सर्व शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण नाही मग अशात काय करणार असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित आहेत.