शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

दहावी, बारावीच्या नियोजित परीक्षांसाठी मॅरेथॉन बैठका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:18 IST

शिक्षण विभागाकडून येत्या तीन दिवसांत निर्णयाची अपेक्षा

मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध आणि शनिवार, रविवारी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचा निर्णयही कायम ठेवण्यात आला आहे. मात्र दहावी, बारावीच्या नियाेजित ऑफलाइन परीक्षांबाबत काय, असा संभ्रम विद्यार्थी, पालकांमध्ये आहे. दरम्यान, या परीक्षांसंदर्भातील निर्णय येत्या ३ ते ४ दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.दहावी, बारावी बाेर्डाची परीक्षा देणारे राज्यभरातील ३० लाख विद्यार्थी आहेत. वाढत्या काेराेनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांचे आयाेजन कसे करायचे, यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. याच विषयावर अधिक चर्चेसाठी आणखी काही बैठका होणार असून या बैठकांना शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित राहतील. शनिवार, रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे शनिवारी होणाऱ्या पेपरचे काय, त्याचे नियाेजन करायचे, की परीक्षा पुढे ढकलायच्या? बोर्डाच्या परीक्षांना हजर राहणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षकांच्या लसीकरणाचे काय? वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केंद्रावर करणे गरजेचे आहे? याचे कसे नियोजन करायचे, अशा सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याचे समजते.दहावी, बारावीच्या परीक्षांचे यापूर्वीजाहीर झालेले नियोजनदहावी, बारावी बाेर्डाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होतील. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, त्यांच्या आरोग्याची, सुरक्षिततेची काळजी घेता यावी म्हणून यंदा त्यांच्याच शाळा, महाविद्यालयांत परीक्षेचे केंद्र असेल. विद्यार्थ्यांमध्ये योग्य सामाजिक अंतर राखून लेखी परीक्षेसाठी यंदा अर्ध्या तासाची वेळ वाढवून देण्यात आली आहे. संसर्ग किंवा इतर कोणत्याही कारणास्तव परीक्षा देता न आल्यास जूनमधील विशेष परीक्षेची संधी विद्यार्थ्यांना मिळू शकेल.राज्यातील परीक्षांची सद्य:स्थितीपहिली ते आठवी सर्व परीक्षा रद्द - वर्गाेन्नतीने थेट पुढच्या वर्षात प्रवेश. वर्गोन्नतीच्या मार्गदर्शक सूचना एससीईआरटी करणार जाहीरनववी व अकरावी - लवकरच निर्णय अपेक्षितशिक्षक पर्यवेक्षक चाचण्या किती वेळा करणार?दहावी बारावीच्या परीक्षांना यातून वगळले असले तरी शाळा पातळीवर शिक्षकांनाही काही निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने इ. १० व इ. १२ वीच्या परीक्षेच्यावेळी उपस्थित रहाताना आरटी पीसीआर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र हे प्रमाणपत्र फक्त ४८ तासच वैद्य असल्याने परीक्षेसाठी कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पर्यवेक्षक यांनी ही चाचणी दर २ दिवसांनी करावी असे शासनाला वाटते का असा प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत. त्याऐवजी विद्यार्थ्यांसोबत सर्व वयोगटातील शिक्षकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकापालकवर्गाकडून करण्यात येत आहे.परीक्षेला येणार्‍या विद्यार्थ्यांची कोविडची लक्षणे ओळखून, लक्षणे आढळणार्‍या विद्यार्थ्याला स्वतंत्र खोलीत बसवण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. मात्र कोविडची लक्षणे शिक्षक कसे ओळखणार? त्यांना यंत्रणा उपलब्ध करून देणार का ? सर्व शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण नाही मग अशात काय करणार असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित आहेत.