शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

संमेलनातील ठराव, मागण्या हवेत विरल्या, साहित्यिक, अभ्यासकांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 06:10 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित साहित्य संमेलन आणि त्यात होणारे ठराव व मागण्यांना वेगळी परंपरा आहे. मात्र बऱ्याचदा हे ठराव व मागण्या संमेलन पार पडले की कुणाच्याही लक्षात राहत नाहीत.

- स्नेहा मोरेमुंबई  - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित साहित्य संमेलन आणि त्यात होणारे ठराव व मागण्यांना वेगळी परंपरा आहे. मात्र बऱ्याचदा हे ठराव व मागण्या संमेलन पार पडले की कुणाच्याही लक्षात राहत नाहीत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडोदा येथील ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी महत्त्वाची घोषणा केली होती. परंतु, या घोषणेला पाच महिने उलटले तरीही मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात ‘ब्र’सुद्धा उच्चारलेला नाही; त्यामुळे याविषयी साहित्यिक व अभ्यासकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील संमेलनांतील मागण्या व ठराव एक महिन्याच्या आत बैठक घेऊन मार्गी लावण्यात येतील, अशी घोषणा केली होती. त्यासंदर्भात महामंडळासोबत बैठक घेण्यात येईल, असेही नमूद केले होते. परंतु, त्यानंतर सरकारने याविषयी काहीच कार्यवाही केली नाही. शिवाय, महामंडळ पाठपुरावा करत असूनही त्यांना प्रत्युत्तर दिले नाही, अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षडॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली आहे.संमेलनात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीदेखील साहित्यिकांचे शिष्टमंडळ अभिजात भाषेच्या दर्जाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यावर पुढे कोणतीच पावले उचलली गेली नाही. तसेच, मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी सुचविलेली तज्ज्ञ समिती स्थापन केली जातआहे, अशा आशयाचे लेखी तावडे यांनी महामंडळ अध्यक्षांना कळविले होते, त्याविषयी काही हालचाल झालेली नाही. या मागण्यांप्रमाणेच, भाषा संचालक पद निर्माणकरावे, मराठी भाषा विभागासाठीची किमान १०० कोटींची तरतूद करावी, मराठी शिक्षण कायद्याचे प्रारूपतयार झाले त्याविषयी अंमलबजावणी करावी, अनुवाद अकादमीची स्थापना करावी, मराठी भाषा धोरणाचामसुदा ‘धूळखात’ पडला आहे तोमंजूर करण्यात यावा, अशा अनेक ‘मायमराठी’शी संलग्न मागण्या शासन दरबारी दुर्लक्षितच आहेत, अशी माहिती भाषातज्ज्ञांनी दिली.औचित्य म्हणूनच घोषणा?मराठी भाषा आणि साहित्यविषयक प्रलंबित मागण्या आणि वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा महामंडळ करीत आहे. त्याचाच महत्त्वाचा भाग म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांना आम्ही आठवण करून देत आहोत की, बडोदा साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी मागील संमेलनातील ठराव व मागण्यांविषयी महत्त्वाची घोषणा केली. मात्र राज्यकर्ते केवळ घोषणाच करतात, या उक्तीप्रमाणे ही घोषणा केवळ सोहळ्याचे औचित्य म्हणून केली गेली. त्यानंतर त्याचा पाठपुरावा आम्ही केला; मात्र शासनाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.- डॉ. श्रीपाद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ‘मायमराठी’साठी सरकारकडे वेळ नाहीसाहित्य महामंडळ, भाषातज्ज्ञ आणि भाषाविषयक संस्था या सलग शासनाकडे मराठी भाषा व साहित्याविषयीच्या मागण्या लावून धरत आहेत. त्यासाठी निवेदन, लेखी पत्र याची सरबत्ती सुरू आहे. मात्र या मागण्यांना मुख्यमंत्री वा त्यांचे सरकार गंभीरपणे घेताना दिसत नाही. संमेलनाला इतके महिने उलटूनही वेळोवेळी सातत्याने याचा पाठपुरावा करूनही मुख्यमंत्र्यांना मायमराठीसाठी अजिबातच वेळ नसल्याचे यातून उघड झाले आहे.- अ‍ॅड. प्रकाश परब, भाषातज्ज्ञ

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या