शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

संमेलन भरीव असावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 04:24 IST

अनेक नाटकांचे फक्त उल्लेख आपण चर्चेत किंवा नाट्यविषयक पुस्तकांमध्ये वाचतो. अशा नाटकांच्या संहिता आणि नाट्यविषयक साहित्य मिळण्यासाठी संमेलन एक महत्त्वाचं ठिकाण असायला हरकत नाही. तसंच वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय आणि दर्जेदार कलाकृतींचे आणि बॅकस्टेज ते निर्माता ते बुकिंग क्लर्क या साखळीतल्या सगळ्यांच्या कामगिरीबद्दल परिषदेकडून या भव्य संमेलनात कौतुक झाले तर पुढे आणखी जोमाने कामाला लागता येईल.

- प्राजक्त देशमुखमुलुंडमध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे वेगळेपण म्हणजे नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसाद कांबळी या तरुण शिलेदारची झालेली निवड. मुंबई-पुण्याच्या चाकोरीबाहेर नाट्यचळवळ नेण्याची ही सुरूवात मानली जाते. त्यामुळे नव्या पिढीतील तरुण रंगकर्मींना यंदाच्या नाट्यसंमेलनाकडून, रसिकांकडून खूप अपेक्षा आहेत. अशाच रंगकर्मींपैकी एक म्हणजे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख. त्यांचे ‘संगीत देवबाभळी’ हे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर गाजते आहे. त्यांनी या संमेलनाविषयी व्यक्त केलेल्या भावना...शिकला कुंभमेळा भरतो. त्याविषयी एकदा वाचण्यात आलं होतं. प्राचीन काळी सर्व राज्यकर्ते, विद्वान, पंडित, अभ्यासक, शास्त्रज्ञ या लोकांचं ते संमेलन असायचं. ज्यात १२ वर्षांत आपापल्या भागात होत असलेल्या किंवा झालेल्या नव्या गोष्टींचं, ज्ञानाचं आदानप्रदान केलं जाई. आता तत्कालीन विद्वान म्हणजे सगळे ऋषीमुनी आणि तत्सम पंडित ते त्यांची दिनचर्या बरहुकूम पाळायचे. स्नानादी, होमहवन, पूजाअर्चा इ. नित्यनियम उरकून पुन्हा संमेलनात भाग घ्यायचे. भाविक लोक ऐकिवात असलेल्या विद्वान मंडळींना पाहायला, ऐकायला मिळणार म्हणून गर्दी करत असत. कालांतराने हे आदानप्रदान मागे पडलं आणि फक्त काही पुराणकालीन कथांचं अमृत वगैरे तेवढं राहिलं. आधीच धोक्याची पातळी ओलांडलेल्या नदीत नवी गर्दी धोका पत्करून आपल्या अनेक वर्षांच्या धूळमाखल्या जटांचे धोके त्यात मिसळून पुन्हा निर्जन स्थळी मार्गस्थ होतात. शहराचा मुठीतला जीव पुन्हा काठावर येतो.हे सगळं आठवायचं कारण म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन येऊ घातलंय. संमेलनाकडून माझ्यासारख्या रंगकर्मीला काय अपेक्षा आहेत, हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा मी आठवलं मी शेवटचं संमेलनात कधी गेलो होतो. यापूर्वी दोन वेळा एकांकिका सादरीकरणाच्या निमित्ताने संमेलनात सहभागी झालो होतो. पण त्याला जवळपास तीनेक वर्षं झाली असतील. संमेलन म्हणजे सादरीकरण, वैचारिक आदानप्रदान, पुरस्कार आणि साहित्य प्रदर्शन या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव असावा असं मला वाटतंसादरीकरणाबाबतीत बोलायचे झाल्यास, मराठी रंगभूमीला यंदा १७५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने जुन्या-नव्याचा प्रवास पाहायला मिळावा. जेणेकरून सगळ्यांना आपण ज्या पालखीचे भोई आहोत त्याचे मूळ माहीत असावे. इतिहास माहीत असला की भविष्याकडे आणखी जोमाने प्रवास करता येतो. मराठी रंगभूमी या एका छत्राखाली अनेक रंगभूमी नांदत आहेत. जसे की व्यावसायिक, प्रायोगिक, झाडीपट्टी, दशावतार, पथनाट्ये, एकांकिका, दीर्घांक, बालनाट्य, लोकनाट्य, संगीत नाटक इ. या सगळ्यांचा एकत्रित संगम पाहायला मिळावा. अनेकांनी या नाटकांचा केवळ उल्लेख ऐकलेला असतो. अनेक जण चौकट मोडून नवं काही घडवण्याची चर्चा करतात. मग चौकट माहीत असणंही गरजेचं असतं. या सगळ्याच (किंवा जास्तीत जास्त, कारण कमी वेळेत सगळ्यांनाच व्यासपीठ उपलब्ध करून देणं जिकिरीचं ठरू शकतं) प्रतिनिधी नाटकांचे सादरीकरण ज्या संस्था सध्या तशा पद्धतीची नाटकं करत आहेत आणि तो तो नाटकप्रकार जिवंतच ठेवत नाही तर त्यात भर घालत आहेत, त्यात प्रयोगशीलता आणत आहेत.चर्चासत्र, अधिवेशन अशा कार्यक्रमातून वेगवेगळ्या प्रतिनिधींची चर्चा घडवून त्यांच्या क्षेत्रातल्या येणाºया अडचणी आणि त्याचे निरसन करण्यासाठीच्या शक्यता वैचारिक आदानप्रदानामार्फत होतात. वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगाच्या अनुभवातून तेथील प्रेक्षक आणि नाट्यगृहांबद्दलची सद्य:स्थिती याबद्दल ऊहापोह गरजेचा वाटतो. जो मराठी रंगभूमीला निर्णायक दिशेला घेऊन जाऊ शकेल. प्रातिनिधिक स्वरूपात प्रेक्षकांनाही यात समाविष्ट केलं तर ज्यांच्यासाठी हे सर्व चालू आहे त्या मायबाप रसिकांचं मतही लक्षात येईल.जे कुंभमेळ्याच्या बाबतीत झालं ते संमेलनाच्या बाबतीत होऊ नये. शेवटी संमेलन हेही एकाअर्थी नाटकांचा कुंभमेळाच. वार्षिक अहवालापुरतं संम्ंोलन न होता ते भूतकाळाचा आढावा, वर्तमानाचा गौरव आणि भविष्याची नांदी असणारं असं भरीव असावं. यंदाच्या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली आहे. त्यात हे सगळे मुद्दे वाचायला मिळाल्याने अत्यंत आनंद झाला. आता ते अनुभवायला मी त्या दिवसाची वाट पाहतोय .हे झालं संमेलनाच्या रंगकर्मींकडून असलेल्या अपेक्षांबाबत. पण रंगभूमीच्याही रसिक आणि रंगकर्मींकडून संमेलनाच्या अनुषंगाने काही अपेक्षा असतात. त्या जास्त महत्त्वाच्या. रसिकांची आणि रंगकर्मींची उपस्थिती आणि सहभाग हा मोलाचा आहे. ज्यांच्यासाठी हा घाट घातला जातोय त्यांनी तो पाहावा, अनुभवावा, सक्रिय सहभाग नोंदवावा. कारण हेच होणार नसेल तर नंतरच्या तक्रारींना अर्थच नसेल.