शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

मराठी भाषा यायलाच हवी; अन्यथा राजद्रोह

By admin | Published: May 30, 2017 5:28 AM

मीरा-भार्इंदर निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा मराठीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : मीरा-भार्इंदर निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा मराठीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. रहिवासी दाखल्यासह महाराष्ट्राची राजभाषा मराठी लिहिता, वाचता आणि बोलता यायलाच हवी, अशी अट या निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना सक्तीची करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने निवडणूक आयोगासह पालिका आयुक्तांना केली आहे. तसेच मराठी भाषा डावलणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई करण्याची मागणीदेखील केली आहे.मराठीतून १०० टक्के कामकाज चालवणे मीरा-भार्इंदर महापालिकेला बंधनकारक असतानाही अगदी महापौर गीता जैन यांच्यासह अनेक नगरसेवक कामकाजात मराठीचा वापर पूर्णपणे करत नाहीत. पालिका अधिकारीदेखील मराठीला डावलताना दिसतात. दैनंदिन कामकाजात, जाहिराती, प्रसिद्धी, बॅनर, सूचना फलकांवरदेखील मराठी भाषेचा १०० टक्के वापर होत नाही. उलट, अन्य भाषांचा बेकायदेशीर वापर होत असल्याचा आरोप एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केला आहे.पालिकेत अनेक अमराठी नगरसेवक असून त्यांना मराठी येत नाही. काही अमराठी नगरसेवकांना मराठी चांगली येते आणि ते आवर्जून बोलतातदेखील. तरीही, मतांच्या राजकारणापोटी मराठीला सर्रास डावलले जाते. पालिकेत आणि पालिका कामकाजात मराठीची नियोजनबद्ध गळचेपी करून अन्य भाषेचा वापर केला जात आहे.आॅगस्टमध्ये पालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत निवडून येणाऱ्या नगरसेवकांना राजभाषा मराठी ही लिहिता, बोलता आणि वाचता येणे आवश्यकच आहे. अशाप्रकारे सक्ती केली तरच पालिकेचे कामकाज पुर्णपणे मराठी भाषेतुन चालणे शक्य होणार आहे. त्यामुळे मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत मराठी बोलता, वाचता व लिहिता येण्याची तसेच रहिवास दाखल्याची सक्तीची अट टाकण्यात यावी, अशी मागणी केल्याचे देशमुख म्हणाले. पालिकेत अनेक अमराठी नगरसेवक असून त्यांना मराठी येत नाही. काही अमराठी नगरसेवक आवर्जून मराठीत बोलतातदेखील. तरीही, मतांच्या राजकारणापोटी मराठीला सर्रास डावलले जाते.