शहरं
Join us  
Trending Stories
1
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
2
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
3
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
4
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
5
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
6
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
7
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
8
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
9
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
10
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
11
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
12
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
13
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
14
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
15
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
17
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
18
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
19
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
20
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 07:04 IST

शासनावर जबाबदारी टाकून पळ काढणे योग्य नाही...

दुर्गेश सोनार -

मुंबई : मराठी भाषा टिकवण्यासाठी शासनावर अवलंबून राहाणे पुरेसे नाही, ते योग्यही नाही. हे मराठी माणसाचे स्वत:चे काम आहे, ते आपले आपणच केले पाहिजे' अशी स्पष्ट भुमिका सातारा येथे आजपासून सुरु होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियिजित अध्यक्ष, ख्यातनाम कादंबरीकार, 'पानीपत'कार विश्वास पाटील यांनी मांडली आहे. 

शासनावर जबाबदारी टाकून पळ काढणे योग्य नाही- संमेलनाच्या पूर्वसंध्येला ' लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत 'साहित्य संस्कृती जगवण्याचे काम हे समाजाचे असते, लोकांनी फक्त शासनाच्या अंगावर जबाबदारी टाकून स्वत: पळ काढणे योग्य नाही' असे ते म्हणाले.

इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा देखण्या, पोषाखी, आधुनिक चेहेऱ्याच्या असतात हे खरे, पण त्या चकचकाटाला न भुलता खरेखुरे ज्ञान कुठल्या शाळेत मिळते ते पाहणे महत्वाचे आहे, असा  आग्रही सल्लाही विश्वास पाटील यांनी दिला.

'मराठी भाषा टिकवण्याची ही जबाबदारी समाजाला कशी पार पाडता येईल, यावर काही उपाययोजना दिसतात का?'- या प्रश्नावर ते म्हणाले, 'मला जे सुचते, ते मी माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे. मराठी ही लोकांनीच वाचवली पाहिजे, ती लोकांचीच चळवळ बनली पाहिजे; हेच माझ्या भाषणाचे मुख्य सूत्र असेल!'

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi language must be saved by Marathi people: Vishwas Patil

Web Summary : Marathi language preservation is the responsibility of Marathi people, not just the government. People should focus on real knowledge, not superficial school appearances. Patil will address this in his speech.