शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा गौरव दिन: भाजप-सेनेच्या राजकारणात अडकले अभिजातपण

By अतुल कुलकर्णी | Updated: February 27, 2022 05:41 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न तब्बल १२ वर्षांपासून मुंबई-दिल्ली प्रवासातच अडकला आहे.

अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न तब्बल १२ वर्षांपासून मुंबई-दिल्ली प्रवासातच अडकला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषेच्या संवर्धनासाठी निधी मिळतो. शिवाय अनेक विद्यापीठांत हा विषय शिकवता येतो. मात्र भाजप-शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात अभिजात भाषेचा दर्जा अडकून पडला आहे.

राज्य सरकारचे उपसचिव गोदिपनाथ अल्लाट यांनी २३ मार्च २०१० रोजी भाषा विषयाच्या केंद्र सरकारमधील सहसचिव अनिता भटनागर यांना सगळ्यात पहिले पत्र पाठवून, निकषही काय आहेत, अशी विचारणा केली होती. हा दर्जा मिळावा म्हणून हिंदी, इंग्रजी भाषेत पत्रव्यवहार केला गेला ही सुद्धा यामागची एक गंमतच आहे. काही दिवसातच केंद्र सरकारने निकषही कळवले होते. मात्र तेव्हापासून आजपर्यंत राज्य सरकारने केंद्राकडे ३५ वेळा पत्रव्यवहार केला आहे. सुरुवातीच्या काळात राज्य सरकारने मराठीत पत्रव्यवहार केला. निकष मागवल्यानंतर दोन वर्षे काहीही हालचाल राज्य सरकारने केली नाही. त्यानंतर १० जानेवारी २०१२ रोजी महाराष्ट्र सरकारने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी केंद्राच्या निकषानुसार प्रस्ताव तयार करण्याकरिता १६ जणांची समिती स्थापन केली. या समितीने २०१३ मध्ये आपला अहवाल राज्य सरकारला दिला. त्यानंतर हा विषय फुटबॉलसारखा राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये फिरत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेनेच्या काळातही या प्रस्तावाला म्हणावी तशी गती मिळाली नाही. केंद्राला पत्र पाठवणे, विचारणा करणे यापलीकडे या विषयात काही घडले नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हा विषय मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याकडे आला. मराठीचा विषय शिवसेनेसाठी कायमच राजकारणाचा आणि अभिमानाचा राहिलेला आहे. त्यामुळे सुभाष देसाई यांनी हा विषय पुन्हा केंद्राकडे लावून धरला. भाजपने याविषयी ठाम भूमिका घेतली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असला तरी, भाजपने या विषयावर मौन बाळगणे पसंत केले आहे.

मुंबईसह राज्यात प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मुंबईत हा विषय शिवसेनेच्या फायद्याचा आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यासाठी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटून आले. शिवसेनेला या विषयात राजकारण करायचे नाही असे सांगत, शिवसेनेने आपणच हा विषय लावून धरला आहे, असा संदेश जाण्याची व्यवस्था केली. 

शिवसेनेला या निर्णयाचा फायदा मिळू नये म्हणून या विषयाला गती मिळत नसल्याचे सांगितले जाते. अडीच हजार वर्षांपूर्वीची एक भाषा स्वतःच्या अभिजातपणासाठी झगडत असताना तीही पक्षीय राजकारणातून सुटलेली नाही हे मराठी भाषा दिनाच्या दिवशीचे कटू वास्तव आहे. 

टॅग्स :marathiमराठीCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार