शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मराठी भाषा गौरव दिन: भाजप-सेनेच्या राजकारणात अडकले अभिजातपण

By अतुल कुलकर्णी | Updated: February 27, 2022 05:41 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न तब्बल १२ वर्षांपासून मुंबई-दिल्ली प्रवासातच अडकला आहे.

अतुल कुलकर्णी, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न तब्बल १२ वर्षांपासून मुंबई-दिल्ली प्रवासातच अडकला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषेच्या संवर्धनासाठी निधी मिळतो. शिवाय अनेक विद्यापीठांत हा विषय शिकवता येतो. मात्र भाजप-शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात अभिजात भाषेचा दर्जा अडकून पडला आहे.

राज्य सरकारचे उपसचिव गोदिपनाथ अल्लाट यांनी २३ मार्च २०१० रोजी भाषा विषयाच्या केंद्र सरकारमधील सहसचिव अनिता भटनागर यांना सगळ्यात पहिले पत्र पाठवून, निकषही काय आहेत, अशी विचारणा केली होती. हा दर्जा मिळावा म्हणून हिंदी, इंग्रजी भाषेत पत्रव्यवहार केला गेला ही सुद्धा यामागची एक गंमतच आहे. काही दिवसातच केंद्र सरकारने निकषही कळवले होते. मात्र तेव्हापासून आजपर्यंत राज्य सरकारने केंद्राकडे ३५ वेळा पत्रव्यवहार केला आहे. सुरुवातीच्या काळात राज्य सरकारने मराठीत पत्रव्यवहार केला. निकष मागवल्यानंतर दोन वर्षे काहीही हालचाल राज्य सरकारने केली नाही. त्यानंतर १० जानेवारी २०१२ रोजी महाराष्ट्र सरकारने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी केंद्राच्या निकषानुसार प्रस्ताव तयार करण्याकरिता १६ जणांची समिती स्थापन केली. या समितीने २०१३ मध्ये आपला अहवाल राज्य सरकारला दिला. त्यानंतर हा विषय फुटबॉलसारखा राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये फिरत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेनेच्या काळातही या प्रस्तावाला म्हणावी तशी गती मिळाली नाही. केंद्राला पत्र पाठवणे, विचारणा करणे यापलीकडे या विषयात काही घडले नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हा विषय मराठी भाषा विभागाचे मंत्री म्हणून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्याकडे आला. मराठीचा विषय शिवसेनेसाठी कायमच राजकारणाचा आणि अभिमानाचा राहिलेला आहे. त्यामुळे सुभाष देसाई यांनी हा विषय पुन्हा केंद्राकडे लावून धरला. भाजपने याविषयी ठाम भूमिका घेतली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असला तरी, भाजपने या विषयावर मौन बाळगणे पसंत केले आहे.

मुंबईसह राज्यात प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मुंबईत हा विषय शिवसेनेच्या फायद्याचा आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई यासाठी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटून आले. शिवसेनेला या विषयात राजकारण करायचे नाही असे सांगत, शिवसेनेने आपणच हा विषय लावून धरला आहे, असा संदेश जाण्याची व्यवस्था केली. 

शिवसेनेला या निर्णयाचा फायदा मिळू नये म्हणून या विषयाला गती मिळत नसल्याचे सांगितले जाते. अडीच हजार वर्षांपूर्वीची एक भाषा स्वतःच्या अभिजातपणासाठी झगडत असताना तीही पक्षीय राजकारणातून सुटलेली नाही हे मराठी भाषा दिनाच्या दिवशीचे कटू वास्तव आहे. 

टॅग्स :marathiमराठीCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार