शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सूचक इशारा; “मराठी भाषेला अभिजात दर्जा नाकारणाऱ्यांनो...”

By प्रविण मरगळे | Updated: February 26, 2021 17:03 IST

Marathi Bhasha Din, CM Uddhav Thackeray: गेली काही वर्षे आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. मुख्यमंत्री म्हणून हा माझ्यासाठी  हा दुसरा कार्यक्रम आहे

ठळक मुद्देकोरोना संकटामुळे आता आपण थेट भेटू शकत नाही. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भेटतो. याला आभासी भेट म्हणतात.मराठी भाषे प्रतीची आपली तळमळ, भावना मराठी भाषेबद्दलचे प्रेम अजिबात आभासी नाही.माझी भाषा कमकुवत नाही झाली पाहिजे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मुंबई - मराठी भाषा दिन म्हटलं की फक्त एकच दिवस मराठी भाषेचे प्रेम उचंबळून येणे चुकीचे. मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेलली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझे मातृभूमी.. माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा विषय असून हा गौरव जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा  मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या, मग पाहू छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) म्हटलं आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, गेली कित्येक वर्षे आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. केंद्रीय समितीपुढे हा विषय मान्यतेसाठी प्रलंबित आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाकारणारे जे कोणी आहेत त्यांना खडसावून सांगितले पाहिजे की, ही महाराष्ट्राची, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. ती नसती तर तुम्ही आज असता का? याचा विचार करा. माझ्या दृष्टीने मराठी भाषेला अभिजात भाषा देण्यासाठी हा एकच पुरावा पुरेसा आहे असं त्यांनी ठणकावलं.

त्याचसोबत गेली काही वर्षे आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. मुख्यमंत्री म्हणून हा माझ्यासाठी  हा दुसरा कार्यक्रम आहे. कोरोना संकटामुळे आता आपण थेट भेटू शकत नाही. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भेटतो. याला आभासी भेट म्हणतात. पण मी येथे स्पष्ट करू इच्छितो की, मराठी भाषे प्रतीची आपली तळमळ, भावना मराठी भाषेबद्दलचे प्रेम अजिबात आभासी नाही. इंग्रजी आली पाहिजे, आम्हाला दुसऱ्या भाषेचा दुस्वास करायचा नाही  पण त्यामुळे माझी भाषा कमकुवत नाही झाली पाहिजे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मला यानिमित्ताने  लोकमान्य टिळकांचे ही स्मरण होते. “सरकारचे डोके ठिकाणावर आहे का” असं विचारून इंग्रजांना हदरवणारा अग्रलेख त्यांनी लिहिला तो ही मराठी भाषेतच. भाषा म्हणजे संस्कृती. संस्कृती म्हणजे भाषा. या दोन्ही गोष्टी एकमेकास पुरक आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले.

 जो भाषा जपतो तो संस्कृती जपतो

इतर देशाचे राष्ट्राध्यक्ष त्यांचे दुभाषी सोबत घेऊन फिरतात. आपल्या मातृभाषेत बोलणे त्यांना कमीपणाचे वाटत नाही. आपल्यातला हा न्यूनगंड जात नाही तोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचाच नाही कुठलाच गौरव मिळणार नाही जो भाषा जपतो तो संस्कृती जपतो. या दोन्ही गोष्टी जपून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्या काळात मराठी भाषेत राजव्यवहार कोष तयार केला. आपल्याला आपल्या कारभारातील मराठी भाषा किती कळते? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी यावेळी विचारला(Marathi Bhasha Din)

भाषेचा अभिमान असावा- दुराभिमान नको

अनेकदा आजही आपण मराठीत बोलाताना लाजतो. आपण किती उच्चभ्रु आहोत दाखवायला बघतो आणि इंग्रजीत बोलतो. समोरच्या व्यक्तीने फाडफाड इंग्रजीत बोलले की आपण कमी पडतो. चीन, जपानमध्ये त्यांची भाषा ते ठामपणे आणि आत्मविश्वासाने बोलतात. काही ठिकाणी त्यामुळे आपल्याला अडचण येते. जगभरातील पर्यटक आपण आपल्याकडे आकर्षित करत असू तर इंग्रजी भाषेत बोलायला हरकत नाही. हे करताना भाषेचा अभिमान असावा- दुराभिमान नको असं ही मुख्यमंत्री म्हणाले. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन