शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

मराठा आणि कुणबी एकच; भुजबळांसमोरच राजेश टोपेंनी मांडली ठाम भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 19:17 IST

राज्यात नव्याने २५ ते ३० लाख कुटुंबांच्या नोंदी या कुणबीमध्ये सापडल्या आहेत असून कुणबी व मराठा हे एकच आहे आणि त्या दृष्टीने आरक्षण असायला हवे, असं राजेश टोपे म्हणाले.

नागपूर : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटून मराठ्यांचं ओबीसीकरण करणं चुकीचं असल्याचं सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले आहेत. मात्र असं असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी मराठे हे मूळ कुणबीच असल्याचं सांगितलं आहे. विशेष म्हणजे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात छगन भुजबळ यांच्यासमोर टोपे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

मराठा आरक्षणाबद्दल बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारे हे राज्य आहे. अशा या राज्यात समाजा- समाजामध्ये दरी निर्माण होऊ नये, सलोख्याने व गुणा- गोविंद्याने नांदण्याची वृत्ती त्यांच्यात असावी. या विचारांना समर्थन करत असताना ज्या काही समाजाच्या रास्त मागण्या आहेत, त्यांना शासनाने न्याय दिला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण हे दिलेच पाहिजे; याबाबतीत कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. शिवकालीन काळामध्ये ज्या लढाया होत होत्या, त्या काळात मर कर भी न हटनेवाला ओ मराठा है असा उल्लेख मराठा समाजाचा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा या समाजाला आरक्षणासाठी सवलती दिल्या आहेत. आम्ही मराठवाडा भागातून येतो; हा विभाग निजाम राजवटीतील आहे. या राजवटीत मराठा समाजाला आरक्षण असायचेच, कुणबी व मराठे हे एकच आहे. १९५० साली घटनेतून SC आणि ST पुरते आरक्षण आपण दिले, त्यानंतर हे आरक्षण बंद झाले. १९६७ साली मागासवर्गीयांसाठी झालेल्या निर्णयामध्ये मराठा, कुणबी असा उल्लेख आहे, ज्यात मराठा समाज आहे. यानंतर घटना समितीचे सदस्य पंजाबराव देशमुख यांनी त्यांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घरोघरी प्रचार केल्यानंतर विदर्भात त्यांच्या नोंदण्या झाल्या आहेत व मराठवाडा त्यापासून वंचित राहिले. त्यांना आरक्षण मिळावे हिच तिथल्या जनतेची मागणी आहे," असं टोपे यांनी म्हटलं आहे.

"कुणबी व मराठा हे एकच, त्यादृष्टीने आरक्षण हवे"

मराठा आरक्षणाबद्दल पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समिती मार्फत हे प्रमाणपत्र शोधण्याची मोहीम जी सुरु आहे, त्यात २५ ते ३० लाख कुटुंबांच्या नोंदी या कुणबीमध्ये सापडल्या आहेत. कुणबी व मराठा हे एकच आहे त्या दृष्टीने आरक्षण असायला हवे. आरक्षणा संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार केंद्राने राज्य सरकारला दिले आहे. सरकारने मागच्या त्रुटींची दुरुस्ती करावी. सुप्रीम कोर्टाच्या मागच्या निरीक्षणाचा अभ्यास सरकारने करावा आणि असा निकाल द्यावा की ते आरक्षण कोर्टात टिकले पाहिजे; त्या दृष्टीने सरकारने सकारात्मक पाऊले टाकायला हवे," अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.

दरम्यान, मराठा समाज कुणबी असल्याचं सांगत आरक्षणाची मागणी केल्याने राजेश टोपे यांचा आगामी काळात छगन भुजबळ यांच्याशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीChhagan Bhujbalछगन भुजबळ