शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण OBC मधून नाही तर स्वतंत्र देणार; विशेष अधिवेशनात सरकार घोषणा करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 12:09 IST

राज्यात मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण केले असून त्या अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे

मुंबई - गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यात मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. मात्र ओबीसीतून आरक्षणाला अनेकांनी विरोध केला आहे. त्यात आता सरकार राज्य मागासवर्गीय आयोगाला अहवाल स्वीकारणार आहे. येत्या विशेष अधिवेशनात सरकार हा अहवाल स्वीकारणार त्यासोबत मराठा समाजाला ओबीसीतून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण देण्याची शक्यता आहे. 

राज्यात मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण केले असून त्या अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे. हा अहवाल विशेष अधिवेशनात मांडला जाईल. मात्र माहितीनुसार, मनोज जरांगेंच्या मागणीनुसार मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण असणार नाही. तर स्वतंत्र आरक्षणाची घोषणा या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वीही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले होते. परंतु ते सुप्रीम कोर्टात टिकले नाही. त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाचा तिढा कसा सोडवणार हा प्रश्न आहे. 

गेल्या १५ दिवसांपासून राज्यात मागासवर्गीय आयोग सर्वेक्षणाचे काम करत आहे. त्यात मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण तपासले जात आहे. याबाबत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड म्हणाले की, सरकारला कुठलेही स्वतंत्र आरक्षण देण्याचा अधिकार नाही. मागासवर्गीय आयोगाला ओबीसीत समावेश करण्याचा आणि ओबीसीतून वगळण्याचा अधिकार आहे. स्वतंत्र आरक्षण द्या अशी शिफारस देण्याचाही अधिकार नाही. मराठा समाज किती आहेत ते आयोगाला सांगावे लागेल. इम्पिरिकल डेटा मिळाला तर आरक्षणाची मर्यादा वाढवता येते. हा राज्य सरकारचा अधिकार आहे असं त्यांनी सांगितले. तसेच सरकार वेळकाढूपणा करून मराठा समाजाची फसवणूक करत आहे. २०१७-१८ मध्येही एसईबीसी म्हणून समाजाला आरक्षण दिले. लोकांना मुर्ख बनवण्याचं काम सरकार करतंय असा आरोपही राठोड यांनी केला. 

दरम्यान, ओबीसी आणि एसईबीसी हा शब्द एकच आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अनुकूल येतोय की प्रतिकूल हे पाहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय त्यातील निरिक्षणे लक्षात ठेवून सरकारला पुढील कार्यवाही करावी लागेल. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यायचे झाले तर १९ टक्क्यांमधून द्यावे लागेल. ओबीसीत ५३७ जाती आहेत. त्यामुळे ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करून मार्ग काढावा लागेल. कारण इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या समाजाला त्यात आरक्षण दिले तर ते आरक्षण पुरेसे होणार नाही असं मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील