शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

'एक मराठा, लाख मराठा' घोषणा ठरली निर्णायक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 16:14 IST

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे राज्यातील मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस असून या लढ्यामध्ये अनेकांनी आपले बलिदान दिले आहे.

मुंबई - अनेक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण या घटनांची गंभीर दखल घेत शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केला होता. या आरक्षणाला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायलयाने मराठा समाजाचे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण वैध ठरवले आहे. या विजयात मराठा समाजाचे शिस्तप्रिय ५८ मोर्चे, ५० हून अधिक युवकांचे बलिदान आणि विविध संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे राज्यातील मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस असून या लढ्यामध्ये अनेकांनी आपले बलिदान दिले आहे.

एक मराठा लाख मराठा असा नारा देत औरंगाबादमध्ये पहिला मूक मोर्चा निघाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एकत्र आला आणि महाराष्ट्रभर एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा समाज एक झाला. त्यासाठी राज्यात आणि राज्याबाहेर तब्बल ५८ मोर्चे निघाले होते. या शिस्तप्रिय मोर्चाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली होती. त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला होता. त्याची परिणीती म्हणजेच आजचा निर्णय म्हणावा लागले.

आघाडी सरकारने २०१४ मध्ये निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ते आरक्षण टीकू शकले नव्हते. त्यानंतर मराठा समाजाने आरक्षणाची लावून धरलेली मागणी आणि नव्या सरकराने मराठा आरक्षणासाठी न्यायालयात दिलेला लढ यामुळे आरक्षणाचा लढा जिंकण्यात मराठा समाजाला यश आले. न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांनी निकाल दिला.

संघटनांचा पाठपुरव्याला यश

महाराष्ट्रातील अखिल भारतीय मराठा महासंघ, छावा, संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांनी केलेला पाठपुरावा मराठा आरक्षणाच्या लढ्यात महत्त्वपूर्ण ठरला. मागील २५ वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता. यामध्ये विविध संघटनांनी मराठा समाजात आरक्षणाची मागणी धगधगत ठेवली होती. तो लढा आज सार्थकी लागली.