शहरं
Join us  
Trending Stories
1
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
2
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
3
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
4
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
5
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
6
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
7
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
8
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
9
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
10
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
11
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
12
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
13
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
14
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
15
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
17
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
18
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
19
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
20
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका

'एक मराठा, लाख मराठा' घोषणा ठरली निर्णायक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 16:14 IST

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे राज्यातील मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस असून या लढ्यामध्ये अनेकांनी आपले बलिदान दिले आहे.

मुंबई - अनेक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण या घटनांची गंभीर दखल घेत शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केला होता. या आरक्षणाला आक्षेप घेत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायलयाने मराठा समाजाचे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण वैध ठरवले आहे. या विजयात मराठा समाजाचे शिस्तप्रिय ५८ मोर्चे, ५० हून अधिक युवकांचे बलिदान आणि विविध संघटनांनी केलेल्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.

मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे राज्यातील मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस असून या लढ्यामध्ये अनेकांनी आपले बलिदान दिले आहे.

एक मराठा लाख मराठा असा नारा देत औरंगाबादमध्ये पहिला मूक मोर्चा निघाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एकत्र आला आणि महाराष्ट्रभर एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा समाज एक झाला. त्यासाठी राज्यात आणि राज्याबाहेर तब्बल ५८ मोर्चे निघाले होते. या शिस्तप्रिय मोर्चाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली होती. त्यामुळे सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण झाला होता. त्याची परिणीती म्हणजेच आजचा निर्णय म्हणावा लागले.

आघाडी सरकारने २०१४ मध्ये निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ते आरक्षण टीकू शकले नव्हते. त्यानंतर मराठा समाजाने आरक्षणाची लावून धरलेली मागणी आणि नव्या सरकराने मराठा आरक्षणासाठी न्यायालयात दिलेला लढ यामुळे आरक्षणाचा लढा जिंकण्यात मराठा समाजाला यश आले. न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डोंगरे यांनी निकाल दिला.

संघटनांचा पाठपुरव्याला यश

महाराष्ट्रातील अखिल भारतीय मराठा महासंघ, छावा, संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांनी केलेला पाठपुरावा मराठा आरक्षणाच्या लढ्यात महत्त्वपूर्ण ठरला. मागील २५ वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू होता. यामध्ये विविध संघटनांनी मराठा समाजात आरक्षणाची मागणी धगधगत ठेवली होती. तो लढा आज सार्थकी लागली.