शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जरांगेंच्या उपोषणावरून अखेर अंतरवाली सराटीत ग्रामसभेचा ठराव; बाजूने अन् विरोधात किती मतं पडली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 14:05 IST

पोलिसांनीही जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे. मात्र या मुद्द्यावर आज अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीत ठराव घेण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी रणशिंग फुंकलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र गावातीलच काही नागरिकांनी विरोध करत या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनीही जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे. मात्र या मुद्द्यावर आज अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीत ठराव घेण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी देण्यात यावी का, याबाबत घेण्यात आलेल्या ठरावाच्या बाजूने ५ सदस्यांनी मतदान केले, तर इतर ५ सदस्यांनी विरोधात मतदान केले. अखेर गावच्या सरपंचांनी आपलं निर्णायक मत जरांगे यांच्या उपोषणाच्या बाजूने दिल्याने हा ठराव मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामसेवकांनी दिली आहे.

ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावानंतर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मागील दोन दिवसात आम्ही उपोषणाबाबत गावात सह्यांची मोहीम राबवली. यावेळी गावातील सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी आम्ही उपोषण करावं, यासाठी सहमती दर्शवत सह्या दिल्या आहेत. त्यामध्ये सर्वच जातीतील लोकांचा समावेश आहे. या गावकऱ्यांचे मी आभार मानतो. असं उपोषण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या परवानगीची गरज नसते. त्यामुळे ठराव घेण्याची गरज नाही, असं माझं म्हणणं होतं. मात्र आता ठरावही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो."

"मी मागे हटणार नाही"

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची चर्चा असल्याने याबाबत जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे. "आपण शांततेत आंदोलन करू शकता असा अधिकार घटनेनं जनतेला दिलेला आहे. त्यामुळे शांततेत आमरण उपोषण मी करतोय. मी घटनेला मानायला लागलो. कायदा चालवून घेणाऱ्यांना आता मी मानत नाही. जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसवलंय, ते कायदा पायदळी तुडवायला लागलेत," असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली सराटीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. "४ जूनला आचारसंहिता होती, मी त्याचा सन्मान केला. मी माझं आंदोलन ८ तारखेला पुढे ढकललं. पुन्हा पुन्हा नाकारणार असाल, तर मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. कायद्याला मी मानतो आणि घटनेनं, कायद्यानं मला तो अधिकार दिलेला आहे. मी ८ जूनला सकाळी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि मी मागे हटणार नाही," असंही त्यांनी काल स्पष्ट केलं होतं.

राजकारण्यांना दिला इशारा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शनिवारी ८ जून रोजी अन्नपाण्याचा त्याग करून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. "राजकारण माझा मार्ग नाही आणि मला त्यात जायचेही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहे. सरकारने तातडीने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. मागणीनुसार प्रमाणपत्र द्यावे. मागणी मान्य झाली नाही तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार आणि तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalna Policeजालना पोलीसMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष