शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

जरांगेंच्या उपोषणावरून अखेर अंतरवाली सराटीत ग्रामसभेचा ठराव; बाजूने अन् विरोधात किती मतं पडली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 14:05 IST

पोलिसांनीही जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे. मात्र या मुद्द्यावर आज अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीत ठराव घेण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी रणशिंग फुंकलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं जरांगे पाटील यांनी आजपासून आमरण उपोषण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र गावातीलच काही नागरिकांनी विरोध करत या उपोषणाला परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनीही जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे. मात्र या मुद्द्यावर आज अंतरवाली सराटीच्या ग्रामपंचायतीत ठराव घेण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी देण्यात यावी का, याबाबत घेण्यात आलेल्या ठरावाच्या बाजूने ५ सदस्यांनी मतदान केले, तर इतर ५ सदस्यांनी विरोधात मतदान केले. अखेर गावच्या सरपंचांनी आपलं निर्णायक मत जरांगे यांच्या उपोषणाच्या बाजूने दिल्याने हा ठराव मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामसेवकांनी दिली आहे.

ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावानंतर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "मागील दोन दिवसात आम्ही उपोषणाबाबत गावात सह्यांची मोहीम राबवली. यावेळी गावातील सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी आम्ही उपोषण करावं, यासाठी सहमती दर्शवत सह्या दिल्या आहेत. त्यामध्ये सर्वच जातीतील लोकांचा समावेश आहे. या गावकऱ्यांचे मी आभार मानतो. असं उपोषण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या परवानगीची गरज नसते. त्यामुळे ठराव घेण्याची गरज नाही, असं माझं म्हणणं होतं. मात्र आता ठरावही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो."

"मी मागे हटणार नाही"

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची चर्चा असल्याने याबाबत जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे. "आपण शांततेत आंदोलन करू शकता असा अधिकार घटनेनं जनतेला दिलेला आहे. त्यामुळे शांततेत आमरण उपोषण मी करतोय. मी घटनेला मानायला लागलो. कायदा चालवून घेणाऱ्यांना आता मी मानत नाही. जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसवलंय, ते कायदा पायदळी तुडवायला लागलेत," असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली सराटीत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. "४ जूनला आचारसंहिता होती, मी त्याचा सन्मान केला. मी माझं आंदोलन ८ तारखेला पुढे ढकललं. पुन्हा पुन्हा नाकारणार असाल, तर मी तुम्ही नाकारलेल्या परवानगीला मानत नाही. कायद्याला मी मानतो आणि घटनेनं, कायद्यानं मला तो अधिकार दिलेला आहे. मी ८ जूनला सकाळी आमरण उपोषणाला बसणार आहे आणि मी मागे हटणार नाही," असंही त्यांनी काल स्पष्ट केलं होतं.

राजकारण्यांना दिला इशारा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शनिवारी ८ जून रोजी अन्नपाण्याचा त्याग करून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. "राजकारण माझा मार्ग नाही आणि मला त्यात जायचेही नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हीच मागणी असून, ती पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण करणार आहे. सरकारने तातडीने सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. मागणीनुसार प्रमाणपत्र द्यावे. मागणी मान्य झाली नाही तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार आणि तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalna Policeजालना पोलीसMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष