शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 14:43 IST

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी ४ जूनपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याचा तर ८ जून रोजी सभेचं आयोजन करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र आता ८ जून रोजी बीड येथे होणारी मनोज जरांगे पाटील यांची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी ४ जूनपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याचा तर ८ जून रोजी सभेचं आयोजन करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र आता ८ जून रोजी बीड येथे होणारी मनोज जरांगे पाटील यांची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने जरांगे पाटील यांची ही सभा रद्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मनोज जरांगे पाटील यांची सभा ८ जून रोजी बीडमधील नारायणगड येथे होणार होती. या सभेसाठी मराठा आंदोलकांकडून जोरदार तयारीही सुरू होती. मात्र जरांगे पाटील यांच्या या सभेवर दुष्काळाचं सावट पडलं आहे. उन्हाची तीव्रता आणि पाणी नसल्याने ही सभा रद्द करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांची ही सभा ऐतिहासिक होईल असा दावा करण्यात येत होता. या सभेसाठी ९०० एकरवर तयारी सुरू होती. दरम्यान, सध्या बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई असून, उन्हाची तीव्रताही अधिक आहे. ही बाब लक्षात घेत ८ जून रोजी होणारी सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आठ जून रोजी बीडमधील नारायण गड येथे होणाऱ्या सभेस सुमारे सहा कोटी मराठे जमतील, असा दावा करण्यात येत होता. तसेच त्यादृष्टीने नियोजनही सुरू होते. मात्र येथे येणाऱ्या मराठा आंदोलकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी ही सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता ही सभा जून महिन्यानंतर होईल, असं सांगण्यात येत आहे. तसेच याबाबत एक बैठक होणार असून, त्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे सभेच्या पुढच्या तारखेबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBeedबीडMaharashtraमहाराष्ट्र