शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शाहू महाराज छत्रपतींनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; सरकारला पुन्हा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 14:45 IST

मराठा समाजाने शांततेने आंदोलन करावे. आपले ध्येय, धोरण काय हे लक्षात ठेऊन कामकाज केले पाहिजे असं शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

जालना – मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपतींनी भेट घेतली. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. बीडमध्ये काल मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. त्यात आमदार, खासदारांनाही मराठा आंदोलकांच्या आक्रोशाला तोंड द्यावे लागले. जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे मराठा समाज एकटवला आहे. मराठा समाजाने जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभं राहिले पाहिजे असं आवाहन शाहू महाराज छत्रपतींनी केले आहे.

शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, समाजात दुफळी न होता आरक्षणासाठी मराठा बांधवांनी एकत्र आले पाहिजे. जरांगे पाटील यांना सहकार्य केले पाहिजे. जाळपोळ कोण करतंय हे मला माहिती नाही. तरीपण मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे शांततेत आंदोलन केले पाहिजे. जेणेकरून मराठा समाजावर अन्याय आणि ठपका दोन्ही पडता कामा नये. आत्महत्या करून आरक्षण मिळणार नाही. फक्त जीव जातील. हे जीव राहिले तर जोमाने काम करता येईल. युवकांनी आत्महत्या करू नये असंही त्यांनी सांगितले.

तसेच मराठा समाजाने शांततेने आंदोलन करावे. आपले ध्येय, धोरण काय हे लक्षात ठेऊन कामकाज केले पाहिजे. समाजानं केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होतील. शासनाच्या बैठकीत आरक्षण मान्य करतील अशी अपेक्षा आहे. मनोज जरांगे पाटील यांना सहकार्य राहावे. जिल्हाजिल्ह्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांनी तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. पाणी प्यायले पाहिजे. आपल्यासाठी दिर्घकाळ मनोज जरांगे पाटील काम करतील या सदिच्छा आहेत असंही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती इथं आलेत, मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही. गोरगरिबांना न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत. विशेष अधिवेशन बोलावून सरकारने समितीचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाचा ओबीसीत सामावेश करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे द्यावे. अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही. निजामकालीन दस्तावेज शोधा, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अर्धवट दिले तर ते सरकारला जड जाईल. आज महाराज स्वत: येऊन आंदोलनाच्या पाठिशी उभे राहिलेत. सरकारने हे गांभीर्याने घ्यावे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण