शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 17:36 IST

एखादा न्याय मिळवायचा असेल तर सातत्य ठेवायला लागते. आमच्यावर खूप अन्याय झालाय ही खदखद आहे असं जरांगे पीटाल यांनी सांगितले.

जालना – माझ्या तब्येतीची काळजी करण्याची आवश्यकता नाही. तब्येत ठणठणीत आहे. १ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील गावोगावी साखळी उपोषण सुरू करावं. आपल्या आरक्षणाचा आणि लेकरांच्या न्यायाचा दिवस जवळ आलाय. लेकरांच्या भविष्याचा विचार डोक्यात ठेवायचा आहे. शेती आणि आरक्षण दोन्हीही कामे आपल्याला करायची आहे. न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवायचे नाही. आमरण उपोषण स्थगित केले तरी अंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरू आहे. हे उपोषण आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांनी उग्र आंदोलन करू नये, आत्महत्या करू नये. खांद्याला खांदा लावून आरक्षणासाठी लढायचे आहे. लवकरच मी महाराष्ट्र दौरा करणार असून समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी जाणार आहे. २४ डिसेंबरपर्यंत गावागावातील मराठा समाज जागरूक ठेवायचा आहे. माझी तब्येत बरी आहे. डॉक्टरांनी युद्धपातळीवर उपचार करून मला ठणठणीत करून टाकलं असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच एखादा न्याय मिळवायचा असेल तर सातत्य ठेवायला लागते. आमच्यावर खूप अन्याय झालाय ही खदखद आहे. पिढ्यानपिढ्या अन्याय झाला आहे. आम्हाला शेती आणि लेकरांचे भविष्यही बघायचे आहे. राज्यात तिन्हीही समिती आरक्षणासाठी काम करतंय. केवळ मराठवाड्यात नाही तर राज्यभरात समितीला काम करायला भाग पाडले. एक भाऊ नाराज नाही करायचा. त्यामुळे विभागवार वैगेरे नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, आमच्या जातीवर हक्काच्या आरक्षणावर प्रचंड अन्याय झाला, आता यापुढे होऊ द्यायचे नाही. अहवाल राज्याचा गेल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. निजामकालीन दस्तावेज जमा करून मराठवाड्यासह राज्यात आरक्षण द्या अशी आमची मागणी होती. सरकारही ताकदीने काम करायला लागले आहे. बाबासाहेबांचे विचार घेतल्याशिवाय कुठल्याही वंचित घटकांना न्याय मिळणार नाही. आरक्षणाचा दिवस जवळ आलेला असताना आत्महत्या करतायेत, मग त्या आरक्षणाचं करायचे काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारले.

तरुणांनो, आत्महत्या करू नका

सरकार रात्रंदिवस काम करतंय, प्रत्येक जिल्ह्यात कक्ष उभा राहिला आहे. जिल्हाधिकारी कामाला लावलेत. दिवसातून २-३ बैठका मराठा आरक्षणावर होतायेत. त्यामुळे निराश न होता तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. मराठ्यांच्या एकजुटीचा विजय होतोय. मनोज जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून लढायचे. एकाही भावाने आत्महत्या करायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या तरुणांना केले आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा