शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 17:36 IST

एखादा न्याय मिळवायचा असेल तर सातत्य ठेवायला लागते. आमच्यावर खूप अन्याय झालाय ही खदखद आहे असं जरांगे पीटाल यांनी सांगितले.

जालना – माझ्या तब्येतीची काळजी करण्याची आवश्यकता नाही. तब्येत ठणठणीत आहे. १ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील गावोगावी साखळी उपोषण सुरू करावं. आपल्या आरक्षणाचा आणि लेकरांच्या न्यायाचा दिवस जवळ आलाय. लेकरांच्या भविष्याचा विचार डोक्यात ठेवायचा आहे. शेती आणि आरक्षण दोन्हीही कामे आपल्याला करायची आहे. न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवायचे नाही. आमरण उपोषण स्थगित केले तरी अंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरू आहे. हे उपोषण आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांनी उग्र आंदोलन करू नये, आत्महत्या करू नये. खांद्याला खांदा लावून आरक्षणासाठी लढायचे आहे. लवकरच मी महाराष्ट्र दौरा करणार असून समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी जाणार आहे. २४ डिसेंबरपर्यंत गावागावातील मराठा समाज जागरूक ठेवायचा आहे. माझी तब्येत बरी आहे. डॉक्टरांनी युद्धपातळीवर उपचार करून मला ठणठणीत करून टाकलं असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच एखादा न्याय मिळवायचा असेल तर सातत्य ठेवायला लागते. आमच्यावर खूप अन्याय झालाय ही खदखद आहे. पिढ्यानपिढ्या अन्याय झाला आहे. आम्हाला शेती आणि लेकरांचे भविष्यही बघायचे आहे. राज्यात तिन्हीही समिती आरक्षणासाठी काम करतंय. केवळ मराठवाड्यात नाही तर राज्यभरात समितीला काम करायला भाग पाडले. एक भाऊ नाराज नाही करायचा. त्यामुळे विभागवार वैगेरे नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, आमच्या जातीवर हक्काच्या आरक्षणावर प्रचंड अन्याय झाला, आता यापुढे होऊ द्यायचे नाही. अहवाल राज्याचा गेल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. निजामकालीन दस्तावेज जमा करून मराठवाड्यासह राज्यात आरक्षण द्या अशी आमची मागणी होती. सरकारही ताकदीने काम करायला लागले आहे. बाबासाहेबांचे विचार घेतल्याशिवाय कुठल्याही वंचित घटकांना न्याय मिळणार नाही. आरक्षणाचा दिवस जवळ आलेला असताना आत्महत्या करतायेत, मग त्या आरक्षणाचं करायचे काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारले.

तरुणांनो, आत्महत्या करू नका

सरकार रात्रंदिवस काम करतंय, प्रत्येक जिल्ह्यात कक्ष उभा राहिला आहे. जिल्हाधिकारी कामाला लावलेत. दिवसातून २-३ बैठका मराठा आरक्षणावर होतायेत. त्यामुळे निराश न होता तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. मराठ्यांच्या एकजुटीचा विजय होतोय. मनोज जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून लढायचे. एकाही भावाने आत्महत्या करायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या तरुणांना केले आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा