शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही; जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 17:36 IST

एखादा न्याय मिळवायचा असेल तर सातत्य ठेवायला लागते. आमच्यावर खूप अन्याय झालाय ही खदखद आहे असं जरांगे पीटाल यांनी सांगितले.

जालना – माझ्या तब्येतीची काळजी करण्याची आवश्यकता नाही. तब्येत ठणठणीत आहे. १ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील गावोगावी साखळी उपोषण सुरू करावं. आपल्या आरक्षणाचा आणि लेकरांच्या न्यायाचा दिवस जवळ आलाय. लेकरांच्या भविष्याचा विचार डोक्यात ठेवायचा आहे. शेती आणि आरक्षण दोन्हीही कामे आपल्याला करायची आहे. न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवायचे नाही. आमरण उपोषण स्थगित केले तरी अंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरू आहे. हे उपोषण आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांनी उग्र आंदोलन करू नये, आत्महत्या करू नये. खांद्याला खांदा लावून आरक्षणासाठी लढायचे आहे. लवकरच मी महाराष्ट्र दौरा करणार असून समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी मी जाणार आहे. २४ डिसेंबरपर्यंत गावागावातील मराठा समाज जागरूक ठेवायचा आहे. माझी तब्येत बरी आहे. डॉक्टरांनी युद्धपातळीवर उपचार करून मला ठणठणीत करून टाकलं असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच एखादा न्याय मिळवायचा असेल तर सातत्य ठेवायला लागते. आमच्यावर खूप अन्याय झालाय ही खदखद आहे. पिढ्यानपिढ्या अन्याय झाला आहे. आम्हाला शेती आणि लेकरांचे भविष्यही बघायचे आहे. राज्यात तिन्हीही समिती आरक्षणासाठी काम करतंय. केवळ मराठवाड्यात नाही तर राज्यभरात समितीला काम करायला भाग पाडले. एक भाऊ नाराज नाही करायचा. त्यामुळे विभागवार वैगेरे नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, आमच्या जातीवर हक्काच्या आरक्षणावर प्रचंड अन्याय झाला, आता यापुढे होऊ द्यायचे नाही. अहवाल राज्याचा गेल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. निजामकालीन दस्तावेज जमा करून मराठवाड्यासह राज्यात आरक्षण द्या अशी आमची मागणी होती. सरकारही ताकदीने काम करायला लागले आहे. बाबासाहेबांचे विचार घेतल्याशिवाय कुठल्याही वंचित घटकांना न्याय मिळणार नाही. आरक्षणाचा दिवस जवळ आलेला असताना आत्महत्या करतायेत, मग त्या आरक्षणाचं करायचे काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारले.

तरुणांनो, आत्महत्या करू नका

सरकार रात्रंदिवस काम करतंय, प्रत्येक जिल्ह्यात कक्ष उभा राहिला आहे. जिल्हाधिकारी कामाला लावलेत. दिवसातून २-३ बैठका मराठा आरक्षणावर होतायेत. त्यामुळे निराश न होता तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. मराठ्यांच्या एकजुटीचा विजय होतोय. मनोज जरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून लढायचे. एकाही भावाने आत्महत्या करायची नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या तरुणांना केले आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणmarathaमराठा