शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘मनोज जरांगेंचा आरक्षणावरचा फोकस हललाय, त्यांची विधानं परस्परविरोधी’, सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 15:13 IST

Maratha Reservation: मला असं वाटतं की मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढताहेत, असं आम्हाला सुरुवातीला निश्चित वाटत होतं. परंतु मागच्या आठ-पंधरा दिवसांतल्या त्यांच्या भूमिका आहेत त्या पाहिल्या तर कुठेतरी त्यांचा आरक्षणावरचा फोकस हललेला दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. त्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. तसेच त्याला प्रचंड प्रतिसादही मिळत आहे. मात्र मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांच्यासह अनेकओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे.  त्यामुळे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.  त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे यांनी आरक्षणाबाबतची आंदोलनं आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की,  मला असं वाटतं की मनोज जरांगे हे आरक्षणासाठी लढताहेत, असं आम्हाला सुरुवातीला निश्चित वाटत होतं. परंतु मागच्या आठ-पंधरा दिवसांतल्या त्यांच्या भूमिका आहेत त्या पाहिल्या तर कुठेतरी त्यांचा आरक्षणावरचा फोकस हललेला दिसत आहे. आरक्षणावरचा फोकस हलून व्यक्तिगत टीकाटिप्पणी करणे हे शोभत नाही. एकीकडे आपण मागास म्हणता, दुसरीकडे जरांगे आडनावाला जोडून पुढे पाटील लावायचा प्रयत्न करता. एकीकडे तुम्ही आर्थिक मागाससलेले म्हणता दुसरीकडे शंभर शंभर जेसीबीतून फुलांची उधळण करून देता. एकीकडे आमच्याकडे काहीच नाही म्हणता, दुसरीकडे तुमच्या सभेसाठी दीडशे एकर मोसंबीची बाग तोडली जाते. एकीकडे तुम्ही म्हणता आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे. मग दुसरीकडे त्याची काय लायकी माझ्या हाताखाली काम करण्याची असंही म्हणता, ही विधानं चुकीची आहेत, असं स्पष्ट मत सुषमा अंधारे यांनी मांडला.

त्या पुढे म्हणाल्या की, मराठ्यांना आरक्षण मिळावं का, तर नक्की मिळालं पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागावा का? तर तो लागू नये. कारण तेही गरजेचं आहे. या दोन्हीतून मार्ग काढण्याची कुवत निव्वळ आणि निव्वळ केंद्र सरकारमध्ये आहे. कारण आरक्षणाचा प्रश्न हा मुलभूत हक्कातील कलम १६ शी संबंधित आहे. तसेच मुलभूत हक्कांमध्ये जर घटनादुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार कलम ३६८ क नुसार केंद्र सरकारला आहे. म्हणजेच भाजपचा आहे. त्यामुळे यात सरळ साधी गोष्ट आहे. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे बसावं आणि विधिमंडळाचा एक ठराव पास करून घ्यावा. तो केंद्राकडे पाठवावं. त्यानंतर केंद्रानं विशेष अधिवेशन बोलावून हा प्रश्न निकाली काढावा, असा सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला.

मात्र केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला भाजपा या प्रश्नावरून जाणीवपूर्वक दाणे टाकून कोंबडी झुंजवतात, तसे झुंजवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण भाजपाला हे माहिती आहे की, महाराष्ट्रातील महिला सुरक्षा, आरोग्याची दुरवस्था, कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा, कंत्राटी भरती, बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती या सगळ्या प्रश्नांवर भाजपा सपशेल अपयशी ठरला आहे. या अपयशी भाजपाने हे सगळे मुद्दे वळवून आरक्षण हा एकच मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आणला आहे. पण त्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे. तर या निमित्ताने त्यांना वेगवेगळ्या जातींमध्ये झुंजी लावायच्या आहेत, असा सनसनाटी आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

जरांगे एकीकडे भुजबळ यांची काय लायकी आहे. त्याची काय लायकी आहे. ते मराठ्यांच्या हाताखाली काम करत होते, अशी विधानं करतात. याचा अर्थ या विधानांमधून जरांगे हे त्यांचीच विधानं खोडून काढत आहेत. आम्हाला काम मिळत नाही, असं ते म्हणतात आणि आमच्या हाताखाली काम करतात, असंही ते म्हणतात, ही दोन्ही विधानं परस्परविरोधी आहेत. मला वाटतं जरांगे यांनीही यासंदर्भात तारतम्या बाळगलं पाहिजे, असा सल्लाही सुषमा अंधारे यांनी दिला.

त्या शेवटी म्हणाल्या की, दोनही समुहांनी आरक्षण मिळवणं हा जर आपला प्रधान हेतू असेल तर तो फोकस हलू न देता व्यक्तिगट टीकाटिप्पणी, चिखलफेक टाळावी आणि महाराष्ट्राच्या गावगाड्याची वीण उसवू नये, असे आवाहनही सुषमा अंधारे यांनी केलं.   

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण