शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तुम्ही ज्ञान पाजळायची गरज नाही; मनोज जरांगे मंत्री तानाजी सावंतांवर का संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 19:36 IST

आम्ही पूर्वीपासून ओबीसीत आहोत, कित्येक पुरावे आहेत, जास्तीचे आरक्षण खात होते ते बोलतायेत असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.

जालना – गोरगरिबांच्या घरात जाऊन बघा, तुम्हाला मराठा समाजाची वेदना काय माहिती?, तुम्ही ज्ञान पाजळण्याची गरज नाही, मराठ्यांना वेड्यात काढून स्वत: खूप शहाणे हे दाखवण्याची गरज नाही. मोघम गप्पा मारण्यापेक्षा आरक्षण का टिकलं नाही हे विचारा, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? समाजाची ज्यांना जाण नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचे, वेळ आल्यावर आरक्षण कसं मिळतंय ते सांगू अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर संताप व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गोरगरिबांची टिंगळटवाळी करणारे हे लोक, पैसा खूप आहे, मराठ्यांच्या जीवावर सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्यांच्याकडे भरपूर आहे. तुमची मस्ती आम्हाला दाखवू नका. श्रीमंत नेत्यांना गरीब मराठ्यांची व्यथा कळणार नाही. गोरगरिबांच्या अडचणी तुम्हाला माहिती नाही. आरक्षण कसं द्यायचे हे सरकारला कळते, टिकणारे द्यायचे की नाही, मराठ्यांनाही कळते. श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांपाशी दाखवू नका असं त्यांनी सांगितले.

तसेच आम्ही टीका करायची म्हणून करत नाही. जी सत्य परिस्थिती आहे, बीडमध्ये त्यांच्याच लोकांनी जाळपोळ, तोडफोड केली आणि मराठ्यांच्या पोरांवर डाग लावला. विनाकारण पोलिसांनी गरीब मराठा पोरांना मारले हे सत्य आहे. मी सगळे पुरावे देईन, आम्ही पूर्वीपासून ओबीसीत आहोत, कित्येक पुरावे आहेत, जास्तीचे आरक्षण खात होते ते बोलतायेत, पुरावे सापडलेत. त्यामुळे ओबीसींच्या गोरगरिबांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आम्ही ओबीसीतच आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, आम्ही जाळपोळीचं समर्थन केले नाही. जे चुकीचे आहे ते चूकच, परंतु शांततेच्या आंदोलनाला डाग लावायचा होता म्हणून मराठा गोरगरिबांच्या पोरांना त्रास दिला जातो, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. १९९४ पासून आमचे आरक्षण घेतलं कुणी? आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला आता मिळतंय, ओबीसी नेत्यांनी खोटे बोलून राजकीय पोळी भाजली, मराठा आणि सामान्य ओबीसीत दुरावा निर्माण करण्याचे काम राजकीय नेत्यांनी केली. ४०-५० वर्ष गोरगरीब मराठा पोरांचे वाटोळे या नेत्यांनी केले असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

काय म्हणाले होते तानाजी सावंत?

जर तर भूमिकेवर बोलायला मी पचांग घेऊन बसलो नाही. हा आरक्षणाचा लढा आहे, त्यात कायदेशीर बाबी आहेत. सरकारला दमछाक करून तुम्ही आत्ताच्या आता आरक्षण द्या असं म्हणाल, परंतु सरकारच्या दृष्टीने कायद्याच्या चौकटीत बसून जे काही मिळेल ते टिकलेही पाहिजे. आंदोलनाचे नेतृत्व कोण करतंय? आंदोलन का करतायेत? आरक्षण रद्द झाल्यानंतर वर्ष-दोन वर्ष कुणीही काही बोललं नव्हते. आरक्षणाचे वादळ अचानक का उठलं? आत्महत्या हे आरक्षणावरील तोडगा नाही. हायकोर्टात टिकलेले आरक्षण का गेले? त्या सरकारला आरक्षण का टिकवता आले नाही असा सवाल तानाजी सावंत यांनी केला होता.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील