शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

तुम्ही ज्ञान पाजळायची गरज नाही; मनोज जरांगे मंत्री तानाजी सावंतांवर का संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 19:36 IST

आम्ही पूर्वीपासून ओबीसीत आहोत, कित्येक पुरावे आहेत, जास्तीचे आरक्षण खात होते ते बोलतायेत असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला.

जालना – गोरगरिबांच्या घरात जाऊन बघा, तुम्हाला मराठा समाजाची वेदना काय माहिती?, तुम्ही ज्ञान पाजळण्याची गरज नाही, मराठ्यांना वेड्यात काढून स्वत: खूप शहाणे हे दाखवण्याची गरज नाही. मोघम गप्पा मारण्यापेक्षा आरक्षण का टिकलं नाही हे विचारा, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? समाजाची ज्यांना जाण नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचे, वेळ आल्यावर आरक्षण कसं मिळतंय ते सांगू अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्यावर संताप व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गोरगरिबांची टिंगळटवाळी करणारे हे लोक, पैसा खूप आहे, मराठ्यांच्या जीवावर सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत. त्यांच्याकडे भरपूर आहे. तुमची मस्ती आम्हाला दाखवू नका. श्रीमंत नेत्यांना गरीब मराठ्यांची व्यथा कळणार नाही. गोरगरिबांच्या अडचणी तुम्हाला माहिती नाही. आरक्षण कसं द्यायचे हे सरकारला कळते, टिकणारे द्यायचे की नाही, मराठ्यांनाही कळते. श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांपाशी दाखवू नका असं त्यांनी सांगितले.

तसेच आम्ही टीका करायची म्हणून करत नाही. जी सत्य परिस्थिती आहे, बीडमध्ये त्यांच्याच लोकांनी जाळपोळ, तोडफोड केली आणि मराठ्यांच्या पोरांवर डाग लावला. विनाकारण पोलिसांनी गरीब मराठा पोरांना मारले हे सत्य आहे. मी सगळे पुरावे देईन, आम्ही पूर्वीपासून ओबीसीत आहोत, कित्येक पुरावे आहेत, जास्तीचे आरक्षण खात होते ते बोलतायेत, पुरावे सापडलेत. त्यामुळे ओबीसींच्या गोरगरिबांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. आम्ही ओबीसीतच आहोत असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, आम्ही जाळपोळीचं समर्थन केले नाही. जे चुकीचे आहे ते चूकच, परंतु शांततेच्या आंदोलनाला डाग लावायचा होता म्हणून मराठा गोरगरिबांच्या पोरांना त्रास दिला जातो, सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. १९९४ पासून आमचे आरक्षण घेतलं कुणी? आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला आता मिळतंय, ओबीसी नेत्यांनी खोटे बोलून राजकीय पोळी भाजली, मराठा आणि सामान्य ओबीसीत दुरावा निर्माण करण्याचे काम राजकीय नेत्यांनी केली. ४०-५० वर्ष गोरगरीब मराठा पोरांचे वाटोळे या नेत्यांनी केले असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

काय म्हणाले होते तानाजी सावंत?

जर तर भूमिकेवर बोलायला मी पचांग घेऊन बसलो नाही. हा आरक्षणाचा लढा आहे, त्यात कायदेशीर बाबी आहेत. सरकारला दमछाक करून तुम्ही आत्ताच्या आता आरक्षण द्या असं म्हणाल, परंतु सरकारच्या दृष्टीने कायद्याच्या चौकटीत बसून जे काही मिळेल ते टिकलेही पाहिजे. आंदोलनाचे नेतृत्व कोण करतंय? आंदोलन का करतायेत? आरक्षण रद्द झाल्यानंतर वर्ष-दोन वर्ष कुणीही काही बोललं नव्हते. आरक्षणाचे वादळ अचानक का उठलं? आत्महत्या हे आरक्षणावरील तोडगा नाही. हायकोर्टात टिकलेले आरक्षण का गेले? त्या सरकारला आरक्षण का टिकवता आले नाही असा सवाल तानाजी सावंत यांनी केला होता.

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील