शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीये"; मनोज जरांगेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:52 IST

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा जोर दिला आहे. जरांगेंनी परभणीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले. त्यावर फडणवीसांनी भाष्य केले. 

Devendra Fadnavis Manoj Jarange Maratha Reservation: मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून सरकारला घेरताना दिसत आहे. परभणीत बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. जरांगे यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. 

परभणी जिल्ह्यातील दामपुरी गावात मनोज जरांगे मुक्कामी थांबले होते. गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांशी बोलताना जरांगेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला. 25 जानेवारीपासून मी पुन्हा उपोषण सुरू करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

"काही लोक म्हणतात की, आता पहिले सरकार आहे, आरक्षण देतील का? पण आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याची... होऊ द्या आता... पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना. मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते", असे विधान मनोज जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता केलं.   

देवेंद्र फडणवीस यांनी काय दिले उत्तर?

"पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच आहे. यावर मजा काय आली पाहिजे? हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसांपासून मी असेन, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील. आमच्या भूमिकेत कुठलेच अंतर नाहीये. आमच्यामध्ये कुठला अंतर्विरोध नाहीये. जे निर्णय घेतले आहेत, तिघांनी मिळून घेतले आहेत. पुढेही जे निर्णय घेऊ, तिघे मिळून घेऊ", असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांनी केलेल्या विधानावर बोलताना दिले. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटल्यावर जरांगेंचा पुढचा प्लॅन काय?

"मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि धनगर, मुस्लीम आरक्षण कसे देत नाहीत, हे बघतोच. २५ जानेवारीपासून उपोषण सुरू करणार आहे. मी राहो न राहो पण आरक्षणासाठी लढा देणार आहे", असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे. 

२५ जानेवारी २०२५ पासून आम्ही आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहोत. २५ जानेवारीच्या आत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा सरकारला भयंकर आंदोलन बघावे लागेल. २५ जानेवारी रोजी राज्यभरातील मराठ्यांनी आंतरवलीकडे यायचं. त्यादिवशी कोणीही लग्नाची तारीख काढू नका, असे आवाहनही मनोज जरांगे यांनी केले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBCअन्य मागासवर्गीय जाती