शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 08:39 IST

ओबीसींना ‘जीआर’चा धक्का नाही, ओबीसी आरक्षणाला कोणताही फटका बसणार नसल्याची ग्वाही, वैध पुरावे असलेल्यांनाच लाभ  

मुंबई : मराठा समाजासंदर्भात राज्य सरकारने जो जीआर काढलेला आहे त्यामुळे इतर मागास प्रवर्गांना (ओबीसी) कोणताही फटका बसणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले. तसेच, सरसकट ओबीसीची मागणी सरकारने स्वीकारलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरील उपोषण संपविण्याआधी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी विखे पाटील यांनी सरकारच्या वतीने दिलेल्या आश्वासनानुसार हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींनुसार मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा जो जीआर काढला आहे, त्यावरून काही ओबीसी नेत्यांनी विरोधाचा सूर लावला आहे.

याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही काढलेल्या जीआरचा कोणताही परिणाम ओबीसी आरक्षणावर होणार नाही. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी सरकारने स्वीकारलेली नाही. ज्यांच्याकडे वैध पुरावे आहेत अशांना ओबीसीमध्ये जाण्यासाठीचा मार्ग जीआरद्वारे उपलब्ध करून दिला आहे. या जीआरचा अभ्यास केल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्याला मान्यता दिलेली आहे. भुजबळ यांनाही मी समजावून सांगितले आहे.

हे राज्य आहे तोवर ओबीसींवर अन्याय नाहीमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा सरसकट जीआर नसून पुराव्यांचाच जीआर आहे. त्यामुळे ओबीसी समाजावर कुठेही अन्याय होणार नाही. हे राज्य आहे तोवर ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. मराठवाड्यात इंग्रज नाही तर निजामाचे राज्य होते. त्यामुळे इंग्रज राज्यातील पुरावे इतर ठिकाणी मिळतात. मराठवाड्यात मिळत नाहीत. तिथे निजामकाळातील म्हणजे हैदराबाद गॅझेटच्या नोंदी मिळतात. तेच आपण ग्राह्य धरले आहे.

जे खरे कुणबी त्यांनाच मिळणार लाभजे खरे कुणबी असतील त्यांनाच ते मिळणार. पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही असाच हा जीआर आहे. एका समाजाचे काढून दुसऱ्याला देणार नाही. दोन समाजांना समोरासमोर आणणार नाही. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री  

ओबीसींच्या १४ पैकी १२ मागण्या मंजूर, महिनाभरात जीआर काढणार; ओबीसींचे उपोषण मागेराष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपुरातील संविधान चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला ओबीसी विकासमंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी भेट दिली. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, अशी हमी देत ओबीसींच्या १४ पैकी १२ मागण्यांना सरकारतर्फे मंजुरी देत या सर्व मागण्यांचे जीआर महिनाभरात काढले जातील, असे त्यांनी आश्वस्त केले. यानंतर सावे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना पाणी पाजून उपोषणाची सांगता केली.

मंत्री सावे यांच्यासह आ. डॉ. परिणय फुके यांनी सरकारच्या वतीने आंदोलकांशी चर्चा केली. डॉ. तायवाडे यांनी ओबीसी कल्याणाच्या १४ मागण्यांचा प्रस्ताव मंत्री  सावे यांच्याकडे सादर केला. मंत्री सावे यांनी प्रत्येक मागणीवर चर्चा करीत यातील १२ मागण्या मंजूर केल्या. मंगळवारी मुंबईत ओबीसी संघटनांचीबैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यानंतर डॉ. तायवाडे यांनी उपोषण थांबविण्याची घोषणा करीत सर्व जिल्ह्यातील आंदोलनांना तशी सूचना केली.

दोन मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमात १०० टक्के शिष्यवृत्ती लागू करावी. तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. या दोन मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवल्या जातील, असे आश्वासन मंत्री सावे यांनी दिले.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण