शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

...मग आम्ही त्यांच्यासोबत का जायचं?; मनोज जरांगेंच्या उपोषणाला मराठ्यांचाच विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:49 IST

मराठा आरक्षणासाठी समाज व्याकुळलेला आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल होतेय असं मराठा आक्रोश मोर्चाने म्हटलं.

सोलापूर – जालना येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून वातावरण पेटले आहे. जालनातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहील असा त्यांनी चंग बांधला आहे. त्यात आता सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चातील समन्वयकांनी जरांगेंच्या आंदोलनाला उपोषणाला विरोध केला आहे.

सोलापूर मराठा आक्रोश मोर्चाचे किरण पाटील म्हणाले की, मनोज जरांगे हे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणून उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी ते बसले नाहीत. ते फक्त मराठवाड्या पुरते बसलेत. सोलापूरात ५८ मोर्चे निघाले होते. जोपर्यंत जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसी, कुणबी मराठा म्हणून घ्या म्हणत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही. मनोज जरांगे त्यांच्या प्रांतासाठी लढतायेत मग आम्ही त्यांच्यासाठी केसेस का घ्यायचे?आम्ही सोबत का जायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्याचसोबत जरांगे पाटील हैदराबद मुक्तीसंग्रामतील जी मराठा वंशावळ आहे त्यांच्यापुरते आरक्षण मागितले जात आहे. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले होते. परंतु दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने तो मुद्दा रखडला. ८० वर्षाचे तरुण म्हणून जे आता बाहेर पडलेत त्यांनी मराठा समाजाचा वापर केवळ कुटुंबासाठी, पक्षासाठी केलाय हे समाजाला माहिती आहे. समाजाची कुणीही दिशाभूल करू नये. मराठा समाजाला आरक्षण देणारा कुणीही असू द्या नेतृत्व केले त्याचा पाठिंबा आम्ही देऊ असं विधान मराठा मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी केले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी समाज व्याकुळलेला आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल होतेय, कुणबी मराठा आमच्यासोबत आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण आहे. जोपर्यंत राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही. राज्यातील इतर भागातील लोकांनी जे आंदोलन केले त्याचा फायदा केवळ मराठवाड्यातील मराठा समाजाला होणार आहे. हा राजकीय हेतून प्रेरित आंदोलन आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी केवळ मराठवाड्यातील मराठा समाजापुरते आंदोलन न करता राज्यातील मराठा समाजासाठी करावं असं आवाहन मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने केले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण