शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

...मग आम्ही त्यांच्यासोबत का जायचं?; मनोज जरांगेंच्या उपोषणाला मराठ्यांचाच विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:49 IST

मराठा आरक्षणासाठी समाज व्याकुळलेला आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल होतेय असं मराठा आक्रोश मोर्चाने म्हटलं.

सोलापूर – जालना येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून वातावरण पेटले आहे. जालनातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहील असा त्यांनी चंग बांधला आहे. त्यात आता सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चातील समन्वयकांनी जरांगेंच्या आंदोलनाला उपोषणाला विरोध केला आहे.

सोलापूर मराठा आक्रोश मोर्चाचे किरण पाटील म्हणाले की, मनोज जरांगे हे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणून उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी ते बसले नाहीत. ते फक्त मराठवाड्या पुरते बसलेत. सोलापूरात ५८ मोर्चे निघाले होते. जोपर्यंत जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसी, कुणबी मराठा म्हणून घ्या म्हणत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही. मनोज जरांगे त्यांच्या प्रांतासाठी लढतायेत मग आम्ही त्यांच्यासाठी केसेस का घ्यायचे?आम्ही सोबत का जायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्याचसोबत जरांगे पाटील हैदराबद मुक्तीसंग्रामतील जी मराठा वंशावळ आहे त्यांच्यापुरते आरक्षण मागितले जात आहे. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले होते. परंतु दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने तो मुद्दा रखडला. ८० वर्षाचे तरुण म्हणून जे आता बाहेर पडलेत त्यांनी मराठा समाजाचा वापर केवळ कुटुंबासाठी, पक्षासाठी केलाय हे समाजाला माहिती आहे. समाजाची कुणीही दिशाभूल करू नये. मराठा समाजाला आरक्षण देणारा कुणीही असू द्या नेतृत्व केले त्याचा पाठिंबा आम्ही देऊ असं विधान मराठा मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी केले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी समाज व्याकुळलेला आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल होतेय, कुणबी मराठा आमच्यासोबत आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण आहे. जोपर्यंत राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही. राज्यातील इतर भागातील लोकांनी जे आंदोलन केले त्याचा फायदा केवळ मराठवाड्यातील मराठा समाजाला होणार आहे. हा राजकीय हेतून प्रेरित आंदोलन आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी केवळ मराठवाड्यातील मराठा समाजापुरते आंदोलन न करता राज्यातील मराठा समाजासाठी करावं असं आवाहन मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने केले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण