शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

...मग आम्ही त्यांच्यासोबत का जायचं?; मनोज जरांगेंच्या उपोषणाला मराठ्यांचाच विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:49 IST

मराठा आरक्षणासाठी समाज व्याकुळलेला आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल होतेय असं मराठा आक्रोश मोर्चाने म्हटलं.

सोलापूर – जालना येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जनंतर संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरून वातावरण पेटले आहे. जालनातील अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोवर हे आंदोलन सुरूच राहील असा त्यांनी चंग बांधला आहे. त्यात आता सोलापूर येथील मराठा आक्रोश मोर्चातील समन्वयकांनी जरांगेंच्या आंदोलनाला उपोषणाला विरोध केला आहे.

सोलापूर मराठा आक्रोश मोर्चाचे किरण पाटील म्हणाले की, मनोज जरांगे हे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणून उपोषणाला बसले आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी ते बसले नाहीत. ते फक्त मराठवाड्या पुरते बसलेत. सोलापूरात ५८ मोर्चे निघाले होते. जोपर्यंत जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसी, कुणबी मराठा म्हणून घ्या म्हणत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही. मनोज जरांगे त्यांच्या प्रांतासाठी लढतायेत मग आम्ही त्यांच्यासाठी केसेस का घ्यायचे?आम्ही सोबत का जायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्याचसोबत जरांगे पाटील हैदराबद मुक्तीसंग्रामतील जी मराठा वंशावळ आहे त्यांच्यापुरते आरक्षण मागितले जात आहे. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. गेल्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले होते. परंतु दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याने तो मुद्दा रखडला. ८० वर्षाचे तरुण म्हणून जे आता बाहेर पडलेत त्यांनी मराठा समाजाचा वापर केवळ कुटुंबासाठी, पक्षासाठी केलाय हे समाजाला माहिती आहे. समाजाची कुणीही दिशाभूल करू नये. मराठा समाजाला आरक्षण देणारा कुणीही असू द्या नेतृत्व केले त्याचा पाठिंबा आम्ही देऊ असं विधान मराठा मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी केले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी समाज व्याकुळलेला आहे. त्यामुळे समाजाची दिशाभूल होतेय, कुणबी मराठा आमच्यासोबत आहेत. त्यांना ओबीसी आरक्षण आहे. जोपर्यंत राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही. राज्यातील इतर भागातील लोकांनी जे आंदोलन केले त्याचा फायदा केवळ मराठवाड्यातील मराठा समाजाला होणार आहे. हा राजकीय हेतून प्रेरित आंदोलन आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावे ही आमची मागणी आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी केवळ मराठवाड्यातील मराठा समाजापुरते आंदोलन न करता राज्यातील मराठा समाजासाठी करावं असं आवाहन मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने केले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण