शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

मराठा आरक्षण: राज्य सरकारने दिलेल्या १६ टक्के आरक्षणासाठीच मराठा क्रांती मोर्चा प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 17:13 IST

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नसून सर्वोच्च न्यायालयात लढा देण्यासंदर्भात रुपरेषा ठरविण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबाद - अनेक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण या घटनांची गंभीर दखल घेत शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केला होता. हे आरक्षण कायदेशीर असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच नोकरीत १२ आणि शिक्षणात १३ टक्के आरक्षण देता येईल असे नमूद केले. मात्र मराठा समाजाला १६ टक्केच आरक्षणा कसे मिळवता येईल यावर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे विचारमंथन सुरू आहे.

न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर औरंगाबाद येथील सिंचन भवन येथे मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळाने दिलेले १६ टक्के आरक्षणच कसे मिळवता येईल यावर चर्चा झाल्याचे किशोर चव्हाण यांनी सांगितले. तसेच आगामी काळात मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणात आणखी जाती सामील केल्यास, आरक्षण पुन्हा विभागले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नसून सर्वोच्च न्यायालयात लढा देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. येत्या ७ जुलै रोजी राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठीच्या मूक मोर्चांना औरंगाबादमधून सुरुवात झाली होती. मराठा क्रांती मोर्चाचं औरंगाबाद मध्यवर्ती ठिकाण असून येथेच राज्यव्यापी बैठक घ्यावी या संदर्भात देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला राजेंद्र दाते, योगेश केवारे, सतीष वेताळ, सुनील कोटकर, प्रकाश हेंगडे, शिवाजी जगताप, रवींद्र वाहटुळे, कृष्णा अडगळ, प्रदीप हरदे, मनोज गायके आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा