शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

मराठा आरक्षण: राज्य सरकारने दिलेल्या १६ टक्के आरक्षणासाठीच मराठा क्रांती मोर्चा प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 17:13 IST

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नसून सर्वोच्च न्यायालयात लढा देण्यासंदर्भात रुपरेषा ठरविण्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबाद - अनेक वर्षांची मागणी, राज्यभरात निघालेले मूक मोर्चे आणि नंतर मराठा मोर्चांना लागलेलं हिंसक वळण या घटनांची गंभीर दखल घेत शैक्षणिक क्षेत्रात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधीचा कायदा राज्य सरकारने ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंजूर केला होता. हे आरक्षण कायदेशीर असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच नोकरीत १२ आणि शिक्षणात १३ टक्के आरक्षण देता येईल असे नमूद केले. मात्र मराठा समाजाला १६ टक्केच आरक्षणा कसे मिळवता येईल यावर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे विचारमंथन सुरू आहे.

न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर औरंगाबाद येथील सिंचन भवन येथे मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळाने दिलेले १६ टक्के आरक्षणच कसे मिळवता येईल यावर चर्चा झाल्याचे किशोर चव्हाण यांनी सांगितले. तसेच आगामी काळात मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणात आणखी जाती सामील केल्यास, आरक्षण पुन्हा विभागले जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला नसून सर्वोच्च न्यायालयात लढा देण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले. येत्या ७ जुलै रोजी राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

मराठा आरक्षणासाठीच्या मूक मोर्चांना औरंगाबादमधून सुरुवात झाली होती. मराठा क्रांती मोर्चाचं औरंगाबाद मध्यवर्ती ठिकाण असून येथेच राज्यव्यापी बैठक घ्यावी या संदर्भात देखील बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला राजेंद्र दाते, योगेश केवारे, सतीष वेताळ, सुनील कोटकर, प्रकाश हेंगडे, शिवाजी जगताप, रवींद्र वाहटुळे, कृष्णा अडगळ, प्रदीप हरदे, मनोज गायके आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा