शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा नेत्यांना समोर बॅकवर्ड असे लावायचे नाही : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 17:56 IST

कोल्हापूर : राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे बॅकवर्ड असे लिहिले जाऊ नये असे वाटते; परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे ...

ठळक मुद्देमराठा नेत्यांना समोर बॅकवर्ड असे लावायचे नाही : चंद्रकांत पाटीलराजकारणासाठी कृषी विधेयकांना विरोध; शरद पवारांची भूमिका अनाकलनीय

कोल्हापूर : राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे बॅकवर्ड असे लिहिले जाऊ नये असे वाटते; परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे जगणे मुश्किल होत आहे, याची जाणीव त्यांना नाही. आपला समाज केवळ आपल्यामागे फरफटत यावा, असेच यातील अनेकांची इच्छा आहे. गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्रात दोन्ही कॉग्रेसची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही, यातूनच त्यांची मानसिकता दिसून येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

ज्या कॉग्रेसने २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मांडले होते, तेच कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहेत. असे असताना कॉग्रेस केवळ आणि केवळ राजकारणासाठी या विधेयकाला विरोधाची भूमिका घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला.या विधेयकांबाबत सोमवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी कोल्हापूर जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, भाजपच्या किसान आघाडीचे प्रमुख भगवान काटे, विजय आगरवाल, शंतनू मोहिते उपस्थित होते.ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या भल्यासाठीचे कायदे असतानाही शरद पवार राज्यसभेत अनुपस्थित राहिले. त्यांची ही भूमिका अनाकलनीय आहे. या कायद्यांनुसार शेतकऱ्यांची बंधने कमी केली आहेत. शेतकऱ्यांना आता बाजार समितीप्रमाणेच कोणत्याही कंपनीलाही, कोणत्याही राज्यात माल विकता येणार आहे.

खासगी व्यापाऱ्यालाही देण्याची मुभा आहे. त्यांचे कोणतेही अधिकार काढून घेतलेले नाहीत. उलट बाजार समित्या, अडते, दलाल यांच्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होत होते. ते टाळण्यासाठी ही विधेयके आणली गेली आहेत. जिथे दर जास्त तिथे माल विकण्याची परवानगी दिली असतानाही हा विरोध सुरू आहे.पंजाबमध्ये बहुतांश बाजार समित्या अकाली दलाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध होता; परंतु त्यांना आम्ही हे विधेयक शेतकरीविरोधी नसल्याचे समजून सांगितले आहेत. ते ह्यएनडीएह्णतून बाहेर पडलेले नाहीत, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. कंपन्यांशी करार करायचा काही नाही, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यावर बंधन नाही.पवारांच्या दट्ट्यानंतर शिवसेना बदललीलोकसभेत शिवसेनेने शेतकरीहिताच्या या विधेयकांना पाठिंबा दिला. मात्र शरद पवार यांचा दट्ट्या आल्यानंतर त्यांनी राज्यसभेत उलटी भूमिका घेतली. शिवसेनेचा हा नेहमीचा गोंधळ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.पाटील म्हणाले,

  • कंगना काय बोलतात, त्याचे दुष्परिणाम त्यांना कळत नाहीत. त्यांच्या सर्वच विधानांशी आम्ही सहमत आहोत असे नाही.
  • कंगनांप्रमाणेच गृहमंत्री अनिल देशमुख हे विचार न करताच बोलतात, हे त्यांच्या विधानांवरून स्पष्ट झाले आहे.
  • या सरकारचे सल्लागार कोण हेच समजत नाही. १३ टक्के मराठ्यांना आरक्षण ठेवून भरती केली तरी नंतरही १३ टक्क्यांमध्ये सर्व आरक्षणे द्यावी लागणार.
  • मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाला ठाकरे सरकारने लावले कुलुप.
टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkolhapurकोल्हापूर