शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मराठा नेत्यांना समोर बॅकवर्ड असे लावायचे नाही : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 17:56 IST

कोल्हापूर : राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे बॅकवर्ड असे लिहिले जाऊ नये असे वाटते; परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे ...

ठळक मुद्देमराठा नेत्यांना समोर बॅकवर्ड असे लावायचे नाही : चंद्रकांत पाटीलराजकारणासाठी कृषी विधेयकांना विरोध; शरद पवारांची भूमिका अनाकलनीय

कोल्हापूर : राज्य सरकारमधील बड्या मराठा नेत्यांनाच आपल्या नावापुढे बॅकवर्ड असे लिहिले जाऊ नये असे वाटते; परंतु गरीब मराठ्यांचे यामुळे जगणे मुश्किल होत आहे, याची जाणीव त्यांना नाही. आपला समाज केवळ आपल्यामागे फरफटत यावा, असेच यातील अनेकांची इच्छा आहे. गेल्या १५ वर्षांत महाराष्ट्रात दोन्ही कॉग्रेसची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षण दिले नाही, यातूनच त्यांची मानसिकता दिसून येत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

ज्या कॉग्रेसने २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मांडले होते, तेच कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहेत. असे असताना कॉग्रेस केवळ आणि केवळ राजकारणासाठी या विधेयकाला विरोधाची भूमिका घेतल्याचा आरोप पाटील यांनी केला.या विधेयकांबाबत सोमवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी कोल्हापूर जिल्हा महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, भाजपच्या किसान आघाडीचे प्रमुख भगवान काटे, विजय आगरवाल, शंतनू मोहिते उपस्थित होते.ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या भल्यासाठीचे कायदे असतानाही शरद पवार राज्यसभेत अनुपस्थित राहिले. त्यांची ही भूमिका अनाकलनीय आहे. या कायद्यांनुसार शेतकऱ्यांची बंधने कमी केली आहेत. शेतकऱ्यांना आता बाजार समितीप्रमाणेच कोणत्याही कंपनीलाही, कोणत्याही राज्यात माल विकता येणार आहे.

खासगी व्यापाऱ्यालाही देण्याची मुभा आहे. त्यांचे कोणतेही अधिकार काढून घेतलेले नाहीत. उलट बाजार समित्या, अडते, दलाल यांच्यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होत होते. ते टाळण्यासाठी ही विधेयके आणली गेली आहेत. जिथे दर जास्त तिथे माल विकण्याची परवानगी दिली असतानाही हा विरोध सुरू आहे.पंजाबमध्ये बहुतांश बाजार समित्या अकाली दलाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांचा विरोध होता; परंतु त्यांना आम्ही हे विधेयक शेतकरीविरोधी नसल्याचे समजून सांगितले आहेत. ते ह्यएनडीएह्णतून बाहेर पडलेले नाहीत, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. कंपन्यांशी करार करायचा काही नाही, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यांच्यावर बंधन नाही.पवारांच्या दट्ट्यानंतर शिवसेना बदललीलोकसभेत शिवसेनेने शेतकरीहिताच्या या विधेयकांना पाठिंबा दिला. मात्र शरद पवार यांचा दट्ट्या आल्यानंतर त्यांनी राज्यसभेत उलटी भूमिका घेतली. शिवसेनेचा हा नेहमीचा गोंधळ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.पाटील म्हणाले,

  • कंगना काय बोलतात, त्याचे दुष्परिणाम त्यांना कळत नाहीत. त्यांच्या सर्वच विधानांशी आम्ही सहमत आहोत असे नाही.
  • कंगनांप्रमाणेच गृहमंत्री अनिल देशमुख हे विचार न करताच बोलतात, हे त्यांच्या विधानांवरून स्पष्ट झाले आहे.
  • या सरकारचे सल्लागार कोण हेच समजत नाही. १३ टक्के मराठ्यांना आरक्षण ठेवून भरती केली तरी नंतरही १३ टक्क्यांमध्ये सर्व आरक्षणे द्यावी लागणार.
  • मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाला ठाकरे सरकारने लावले कुलुप.
टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाkolhapurकोल्हापूर