शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

कुणबी प्रमाणपत्रावर मतभेद पण मनभेद नाही; आरक्षणावर २ दिवसांत तोडगा काढा, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 13:41 IST

आम्हाला मराठा म्हणून ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी स्पष्ट आहे असं मराठा क्रांती मोर्चाने सांगितले.

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल? विरोधक आणि सत्ताधारी हे एका माळेचे मणी आहे. सरकार आणि विरोधी पक्षांनी मराठा समाजाचा छळ थांबवावा. महाराष्ट्रात आता जे काही वातावरण आहे ते राज्यासाठी पोषक नाही. मराठा समाजाचा अंत पाहू नका अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाने राजकारण्यांना इशारा दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाने सर्वच राजकीय नेत्यांना लक्ष्य केले.

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी म्हटलं की, मनोज जरांगे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करतायेत, मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण ओबीसीतून द्यावे अशी त्यांची मागणी आहे. आज त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटलांना माझा सॅल्यूट आहे. कारण आज स्वत: उपाशी राहून समाजाच्या न्यायहक्कासाठी ते लढतायेत. परंतु मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या यावर मराठा समाजात अंतर्गत मतभेद असतील पण मनभेद नाहीत. सरकार आणि विरोधकांनी मराठा समाजात फूट पाडण्याचा अजिबात प्रयत्न करू नये असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत आम्हाला मराठा म्हणून ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी स्पष्ट आहे. परंतु जे सरकारसमोर पर्याय आहे. सरकारने सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल केलीय त्याचा खुलासा करावा. यात टास्कफोर्स तयार करून तात्काळ जलदगतीने आरक्षण द्यावे हा एकमेव मार्ग आहे. सरकार मराठा समाजातील आत्महत्या वाढाव्यात असं सरकारला वाटते. सरकारने येत्या २ दिवसांत निर्णय नाही घेतला तर मुंबईत लाँगमार्च काढू हे सरकारला परवडणारे नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा, गेल्या १५ दिवसांत ८ जणांनी आत्महत्या केली. एकूण ५३ बांधव मराठा समाजाने गमावले आहेत. आणखी किती बांधव गमवायचे? आम्हाला आमचे आरक्षण पुढच्या पिढीसाठी आणि भविष्यासाठी आहोत. आम्ही सामाजिक, आर्थिक मागासलेले आहोत. क्युरेटिव्ह पिटिशनवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अन्यथा आम्हाला सरसकट ५० टक्क्यांतील आतमध्ये ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी मराठा समाजाने केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील