शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

कुणबी प्रमाणपत्रावर मतभेद पण मनभेद नाही; आरक्षणावर २ दिवसांत तोडगा काढा, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 13:41 IST

आम्हाला मराठा म्हणून ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी स्पष्ट आहे असं मराठा क्रांती मोर्चाने सांगितले.

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल? विरोधक आणि सत्ताधारी हे एका माळेचे मणी आहे. सरकार आणि विरोधी पक्षांनी मराठा समाजाचा छळ थांबवावा. महाराष्ट्रात आता जे काही वातावरण आहे ते राज्यासाठी पोषक नाही. मराठा समाजाचा अंत पाहू नका अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाने राजकारण्यांना इशारा दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा समाजाने सर्वच राजकीय नेत्यांना लक्ष्य केले.

मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी म्हटलं की, मनोज जरांगे गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करतायेत, मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण ओबीसीतून द्यावे अशी त्यांची मागणी आहे. आज त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरातील मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटलांना माझा सॅल्यूट आहे. कारण आज स्वत: उपाशी राहून समाजाच्या न्यायहक्कासाठी ते लढतायेत. परंतु मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे द्या यावर मराठा समाजात अंतर्गत मतभेद असतील पण मनभेद नाहीत. सरकार आणि विरोधकांनी मराठा समाजात फूट पाडण्याचा अजिबात प्रयत्न करू नये असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत आम्हाला मराठा म्हणून ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी स्पष्ट आहे. परंतु जे सरकारसमोर पर्याय आहे. सरकारने सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल केलीय त्याचा खुलासा करावा. यात टास्कफोर्स तयार करून तात्काळ जलदगतीने आरक्षण द्यावे हा एकमेव मार्ग आहे. सरकार मराठा समाजातील आत्महत्या वाढाव्यात असं सरकारला वाटते. सरकारने येत्या २ दिवसांत निर्णय नाही घेतला तर मुंबईत लाँगमार्च काढू हे सरकारला परवडणारे नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा, गेल्या १५ दिवसांत ८ जणांनी आत्महत्या केली. एकूण ५३ बांधव मराठा समाजाने गमावले आहेत. आणखी किती बांधव गमवायचे? आम्हाला आमचे आरक्षण पुढच्या पिढीसाठी आणि भविष्यासाठी आहोत. आम्ही सामाजिक, आर्थिक मागासलेले आहोत. क्युरेटिव्ह पिटिशनवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे अन्यथा आम्हाला सरसकट ५० टक्क्यांतील आतमध्ये ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे अशी मागणी मराठा समाजाने केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील