शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 17:19 IST

Manoj Jarange Patil on Maharashtra Assembly election schedule: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगेंनी महायुती सरकारला दिला होता. 

Manoj Jarange Patil Vidhan Sabha Election 2024: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा, तसेच सगेसोयरेबद्दल अधिसूचना काढण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्या, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला होता. सरकारकडून याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यात आता विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन करत सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मराठ्यांना बेचिराख करण्याचं काम केलं आहे. आमची आयुष्ये उद्ध्वस्त झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न झाला. मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं करता येईल, यासाठी सगळा सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात केला."

सरकारने ती आशा संपवली -मनोज जरांगे

"गोरगरीब मराठ्यांना आशा होती की, सरकार आरक्षण देईल. मराठ्यांच्या लेकरांचे मुडदे पाडून पापाचे वाटेकरी कधीच हे सरकार होणार नाही, याची आशा होती. ती सरकारने स्वतःहून संपवली", अशी टीका जरांगे यांनी केली. 

"सत्ता मराठ्यांनी दिली होती, पण सत्तेचा गैरवापर करून पूर्णपणे मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी काम केलं. मराठ्यांची मुलं भिकारी झाली पाहिजे, या द्वेषाने, आकसाने देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी वागले. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली", असे जरांगे पाटील म्हणाले. 

...तोपर्यंत मी शांत बसणार नाही, जरांगेंनी महायुतीला दिला इशारा

"मराठ्यांना डिवचण्यासाठी १७ जाती ओबीसींमध्ये घातल्या, पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. मागण्या मान्य करायच्या की नाही, हे तुमच्या हातात होतं कारण सत्तेत तुम्ही होतात. पण, आता मतं द्यायची की नाही, हे मराठ्यांच्या हातात आहे. तुम्ही आमची लेकरं भिकारी बनण्यासाठी सगळी शक्ती लावली. आता तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं की नाही, हे मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपटा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही. आणि समाज सुद्ध बसत नाही", असा इशारा मनोज जरांगेंनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर महायुतीला दिला.  

मनोज जरांगे मराठा समाजाला काय म्हणाले?

"या सरकारनं जाणूनबुजून आपला अपमान केला. त्यांनी आपल्या विरोधात जाऊन ओबीसींमध्ये १७ जातींचा समावेश केला. तु्म्ही ठरवायचं आहे की, आता जात मोठी करायाची की, तुमचा आमदार मोठा करायचा आहे. त्यांना तुमची लेकरं मेली तरी काही घेणं देणं नाही. सरकारनं मराठ्यांच्या पोरांना उन्हात टाकायचं ठरवलं आहे. ही शेवटची लाट असेल, तुम्हाला मनात आणि मतात दोन्हीमध्येही परिवर्तन करावं लागणार", असे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती