शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 17:19 IST

Manoj Jarange Patil on Maharashtra Assembly election schedule: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगेंनी महायुती सरकारला दिला होता. 

Manoj Jarange Patil Vidhan Sabha Election 2024: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा, तसेच सगेसोयरेबद्दल अधिसूचना काढण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्या, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला होता. सरकारकडून याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यात आता विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन करत सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मराठ्यांना बेचिराख करण्याचं काम केलं आहे. आमची आयुष्ये उद्ध्वस्त झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न झाला. मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं करता येईल, यासाठी सगळा सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात केला."

सरकारने ती आशा संपवली -मनोज जरांगे

"गोरगरीब मराठ्यांना आशा होती की, सरकार आरक्षण देईल. मराठ्यांच्या लेकरांचे मुडदे पाडून पापाचे वाटेकरी कधीच हे सरकार होणार नाही, याची आशा होती. ती सरकारने स्वतःहून संपवली", अशी टीका जरांगे यांनी केली. 

"सत्ता मराठ्यांनी दिली होती, पण सत्तेचा गैरवापर करून पूर्णपणे मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी काम केलं. मराठ्यांची मुलं भिकारी झाली पाहिजे, या द्वेषाने, आकसाने देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी वागले. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली", असे जरांगे पाटील म्हणाले. 

...तोपर्यंत मी शांत बसणार नाही, जरांगेंनी महायुतीला दिला इशारा

"मराठ्यांना डिवचण्यासाठी १७ जाती ओबीसींमध्ये घातल्या, पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. मागण्या मान्य करायच्या की नाही, हे तुमच्या हातात होतं कारण सत्तेत तुम्ही होतात. पण, आता मतं द्यायची की नाही, हे मराठ्यांच्या हातात आहे. तुम्ही आमची लेकरं भिकारी बनण्यासाठी सगळी शक्ती लावली. आता तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं की नाही, हे मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपटा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही. आणि समाज सुद्ध बसत नाही", असा इशारा मनोज जरांगेंनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर महायुतीला दिला.  

मनोज जरांगे मराठा समाजाला काय म्हणाले?

"या सरकारनं जाणूनबुजून आपला अपमान केला. त्यांनी आपल्या विरोधात जाऊन ओबीसींमध्ये १७ जातींचा समावेश केला. तु्म्ही ठरवायचं आहे की, आता जात मोठी करायाची की, तुमचा आमदार मोठा करायचा आहे. त्यांना तुमची लेकरं मेली तरी काही घेणं देणं नाही. सरकारनं मराठ्यांच्या पोरांना उन्हात टाकायचं ठरवलं आहे. ही शेवटची लाट असेल, तुम्हाला मनात आणि मतात दोन्हीमध्येही परिवर्तन करावं लागणार", असे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती