शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 17:19 IST

Manoj Jarange Patil on Maharashtra Assembly election schedule: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगेंनी महायुती सरकारला दिला होता. 

Manoj Jarange Patil Vidhan Sabha Election 2024: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा, तसेच सगेसोयरेबद्दल अधिसूचना काढण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्या, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला होता. सरकारकडून याबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यात आता विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन करत सरकारला इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मराठ्यांना बेचिराख करण्याचं काम केलं आहे. आमची आयुष्ये उद्ध्वस्त झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न झाला. मराठ्यांनी त्यांना सत्तेवर बसवलं, त्याच मराठ्यांना बेचिराख कसं करता येईल, यासाठी सगळा सत्तेचा वापर देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांच्या विरोधात केला."

सरकारने ती आशा संपवली -मनोज जरांगे

"गोरगरीब मराठ्यांना आशा होती की, सरकार आरक्षण देईल. मराठ्यांच्या लेकरांचे मुडदे पाडून पापाचे वाटेकरी कधीच हे सरकार होणार नाही, याची आशा होती. ती सरकारने स्वतःहून संपवली", अशी टीका जरांगे यांनी केली. 

"सत्ता मराठ्यांनी दिली होती, पण सत्तेचा गैरवापर करून पूर्णपणे मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांनी काम केलं. मराठ्यांची मुलं भिकारी झाली पाहिजे, या द्वेषाने, आकसाने देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी वागले. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची चाल यशस्वी केली", असे जरांगे पाटील म्हणाले. 

...तोपर्यंत मी शांत बसणार नाही, जरांगेंनी महायुतीला दिला इशारा

"मराठ्यांना डिवचण्यासाठी १७ जाती ओबीसींमध्ये घातल्या, पण मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. मागण्या मान्य करायच्या की नाही, हे तुमच्या हातात होतं कारण सत्तेत तुम्ही होतात. पण, आता मतं द्यायची की नाही, हे मराठ्यांच्या हातात आहे. तुम्ही आमची लेकरं भिकारी बनण्यासाठी सगळी शक्ती लावली. आता तुम्हाला खुर्चीवर बसू द्यायचं की नाही, हे मराठ्यांच्या हातात आहे. तुमचा सुपटा साफ केल्याशिवाय मी शांत बसत नाही. आणि समाज सुद्ध बसत नाही", असा इशारा मनोज जरांगेंनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर महायुतीला दिला.  

मनोज जरांगे मराठा समाजाला काय म्हणाले?

"या सरकारनं जाणूनबुजून आपला अपमान केला. त्यांनी आपल्या विरोधात जाऊन ओबीसींमध्ये १७ जातींचा समावेश केला. तु्म्ही ठरवायचं आहे की, आता जात मोठी करायाची की, तुमचा आमदार मोठा करायचा आहे. त्यांना तुमची लेकरं मेली तरी काही घेणं देणं नाही. सरकारनं मराठ्यांच्या पोरांना उन्हात टाकायचं ठरवलं आहे. ही शेवटची लाट असेल, तुम्हाला मनात आणि मतात दोन्हीमध्येही परिवर्तन करावं लागणार", असे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती