शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

शहिदांच्या भूमीत मराठ्यांची वज्रमूठ

By admin | Updated: September 26, 2016 17:08 IST

कोपर्डी घटनेचा जाहीर निषेध करीत आणि असंतोषाचा आक्रोश मौनातून व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाचा लाखोंचा जनसागर पोहचला

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 26 - बाल शहिदांच्या भूमीत सोमवारी मराठा समाजाचा जनसागर उसळला. कोपर्डी घटनेचा जाहीर निषेध करीत आणि असंतोषाचा आक्रोश मौनातून व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा समाजाचा लाखोंचा जनसागर पोहचला. मोर्चातील जिजाऊच्या सहा लेकींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कोपर्डी घटनेचा निषेध करण्यासाठी आणि त्यातील नराधामांना तातडीने शिक्षा करण्यासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे सोमवार, २६ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चासाठी सकाळी नऊ वाजेपासूनच हजारो समाजबांधव विविध वाहनांनी नंदुरबारात दाखल होत होते. दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास सहा तरुणींनी पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चातील मार्गावर असलेल्या पालिकेतील शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळला, पंडित नेहरू, म.गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मोर्चाचे पहिले टोक ते शेवटचे टोक असे जवळपास अडीच ते तीन किलोमिटरचे लांब अंतर होते. मोर्चेकरी महिला, तरुण, तरुणी, वृद्ध यांच्या हातात निषेधाचे काळे झेंडे, भगवे झेंडे, विविध घोषणा लिहिलेले फलक होते. नि:शब्द हुंकार व्यक्त करीत दुपारी दोन वाजता मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले. अडीच वाजता जिल्हाधिकाऱ्यांना सहा तरुणींनी निवेदन दिले. त्यानंतर पावणेतीन वाजता आठ फूट उंचीच्या व्यासपीठावरून पाच तरुणींनी निवेदन वाचण्यास सुरुवात केली. सर्वात आधी कोपर्डीच्या मुलीची आत्मकथा, नंतर मराठीतून व त्यानंतर अहिराणीतून निवेदनाचे वाचन करण्यात आले. उपस्थितांबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.