शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

"मोठा धक्का बसेल अन् आश्चर्य होईल असे पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट लवकरच होतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 14:10 IST

आमच्याकडे धुसफूस नाही तर मविआकडे धुसफूस आहे असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केला.

मुंबई - भाजपा येण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार, खासदार बरेच इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतील पक्षात पुढच्या काळात खिंडार पडणार नाही. २०२४ मध्ये लोकसभा, विधानसभा लढवण्यासाठीही मविआकडे उमेदवार शिल्लक राहणार नाही. प्राथमिक पातळीवर अनेकांशी चर्चा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकारच्या विकासकामावर जनतेचा विश्वास बसत आहे. भारत जोडो यात्रेवेळीच १५०० काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. आगामी काळात प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार आहे. अनेकांना धक्के बसतील. जनताही आश्चर्यचकीत होईल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीबाबत भाजपा-शिंदे यांच्यात नाराजी नाही. प्रत्येक ठिकाणी दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित निर्णय घेत आहेत. नागपूरचा उमेदवार ठाकरे गटाला दिल्याने मविआत भांडणे सुरू आहे. ठाकरेंना उमेदवारी दिल्यावर काँग्रेस नेत्यांनी बैठक घेण्याचं कारण काय? आमच्याकडे भांडणे नाहीत. कोकणाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मी आणि उदय सामंत यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. आमच्याकडे धुसफूस नाही तर मविआकडे धुसफूस आहे असं त्यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरेंनाच स्वपक्षातील लोकच सोडून जातातउद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपद राहते की जाते हे निवडणूक आयोगाच्या कक्षेत आहे तेच होईल. मुंबईला उद्धव ठाकरेंनी पाण्यात बुडवले. मुंबईसाठी शिंदे-फडणवीस सरकारने काही विकासकामे आणली आहे. त्याचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होईल. शिवसेना संपवण्यासाठी मोदींना मुंबईत येण्याची गरज नाही. आम्ही छोटे कार्यकर्तेच पुरेसे आहोत. त्यांच्याकडील राहिलेले आमदार, खासदारच पुढील काळात आमच्याकडे येतील. संजय राऊतांमुळे अनेक आमच्याकडे येतील आणि काही शिंदेंकडे जातील. संजय राऊतच शिवसेना संपवण्यासाठी पुरेसे आहेत. उद्धव ठाकरेंचे आमदारच स्वत:ला सांभाळायला येत नाही ते मित्रपक्षांना कसे सांभाळतील. पक्षाचे लोक तुम्हाला सोडून जातात दुसरे तुमच्याकडे का येतील? असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे. 

उद्धव ठाकरेंना जमत नाहीउद्धव ठाकरे केवळ निवडणुकीपुरतं जवळ येतील आणि त्यानंतर दूर जातील हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. स्वार्थासाठी उद्धव ठाकरे  काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित आलेत. भाजपा-शिंदे गट आणि अजून कुणी पक्ष आमच्यासोबत येतील त्यांना योग्यप्रकारे न्याय देणे, सन्मान देणे हे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना जमते. ते उद्धव ठाकरेंना जमत नाही. ते कधीच युतीला न्याय देऊ शकत नाहीत असं बावनकुळे यांनी सांगितले. 

वाचाळवीर कोण हे महाराष्ट्राला माहितीवाचाळवीर कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही हे अजितदादांना सभागृहात बोलणे शोभतं का? ते राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते हे मान्य आहे मग धर्मवीर नव्हते हे का म्हटलं? तुम्ही अपमान करतायेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवाचे हाल झाले पण कधीही त्यांनी धर्मासाठी तडजोड केली नाही. धर्मवीर नाही याला भाजपाला आक्षेप नाही. भाजपाने कधी महापुरुषांचा अपमान केला नाही. महापुरुषांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी. संस्कृती जपणे ही आमची जबाबदारी आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाcongressकाँग्रेस