शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

निवडणुका लगेच जाहीर करण्यात अनेक अडचणी; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही संदिग्धताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 10:12 IST

सध्याच्या परिस्थितीत ओबीसी आरक्षण वगळून या निवडणुका होतील, असे राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील पाऊस कमी असलेल्या भागात आता आणि पाऊस अधिक पडणाऱ्या भागात पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असले तरी पावसाळ्यापूर्वी निवडणूक घेण्यात अनंत अडचणी आहेत. 

पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नसल्याने सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, हवामान खाते, महसूल खाते, गृह खाते अशा विविध महत्वाच्या विभागांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ. पण अंतिम निर्णयाप्रत येईपर्यंत किती काळ लागेल, यावर आता भाष्य करता येणार नाही. मुंबईत पाऊस नसेल. पण, ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.

मुंबई, ठाण्यासह १४ महापालिका, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि २२० नगर पालिका व नगर पंचायतींची मुदत संपल्याने निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांच्या तारखांच्या दिवशी किंवा निवडणुकांच्या काळात मुसळधार पावसाची शक्यता असल्यास तुम्ही निर्णय घ्या, असे आदेशात नमूद केले आहे.  आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकतो, असेही मदान यांनी सांगितले.

तूर्त ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका : मदान

मुंबईसह चौदा महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठीची प्रक्रिया जूनअखेरपर्यंत संपेल, तर मतदार यादी, आरक्षण  व प्रभाग  पुनर्रचनेबाबतची  जिल्हा परिषदांची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत संपेल. सध्याच्या परिस्थितीत ओबीसी आरक्षण वगळून या निवडणुका होतील. एससी, एसटी व महिला अशी तीनच आरक्षण असतील. दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात समर्पित आयोगाचा अहवाल आला तर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रक्रिया पार पाडू, असे मदान यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय