शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

निवडणुका लगेच जाहीर करण्यात अनेक अडचणी; सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही संदिग्धताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 10:12 IST

सध्याच्या परिस्थितीत ओबीसी आरक्षण वगळून या निवडणुका होतील, असे राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील पाऊस कमी असलेल्या भागात आता आणि पाऊस अधिक पडणाऱ्या भागात पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असले तरी पावसाळ्यापूर्वी निवडणूक घेण्यात अनंत अडचणी आहेत. 

पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नसल्याने सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, हवामान खाते, महसूल खाते, गृह खाते अशा विविध महत्वाच्या विभागांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ. पण अंतिम निर्णयाप्रत येईपर्यंत किती काळ लागेल, यावर आता भाष्य करता येणार नाही. मुंबईत पाऊस नसेल. पण, ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली तर परिस्थिती पाहून निर्णय घेऊ.

मुंबई, ठाण्यासह १४ महापालिका, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि २२० नगर पालिका व नगर पंचायतींची मुदत संपल्याने निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांच्या तारखांच्या दिवशी किंवा निवडणुकांच्या काळात मुसळधार पावसाची शक्यता असल्यास तुम्ही निर्णय घ्या, असे आदेशात नमूद केले आहे.  आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेऊ शकतो, असेही मदान यांनी सांगितले.

तूर्त ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका : मदान

मुंबईसह चौदा महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठीची प्रक्रिया जूनअखेरपर्यंत संपेल, तर मतदार यादी, आरक्षण  व प्रभाग  पुनर्रचनेबाबतची  जिल्हा परिषदांची प्रक्रिया ३१ जुलैपर्यंत संपेल. सध्याच्या परिस्थितीत ओबीसी आरक्षण वगळून या निवडणुका होतील. एससी, एसटी व महिला अशी तीनच आरक्षण असतील. दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात समर्पित आयोगाचा अहवाल आला तर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रक्रिया पार पाडू, असे मदान यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय