शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Mansukh Hiren Death Case: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी 'या' ५ मुद्द्यांचे अद्यापही कोडे; ATS चे धक्कादायक खुलासे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 16:23 IST

Mansukh Hiren Death Case: या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला असून, ATS ने आपल्या प्राथमिक अहवालात हिरेन यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देमनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाला नाट्यमय वळणएटीएससमोर गूढ वाढवणाऱ्या बाबी उघडएटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासे

मुंबई : जागतिक पातळीवर सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आघाडीवर असलेले उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. या स्फोटकांसह धमकीचे पत्रही होते. या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू (Mansukh Hiren Death Case) झाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला असून, ATS ने आपल्या प्राथमिक अहवालात हिरेन यांच्या हत्येचा संशय व्यक्त केला आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत काही धक्कादायक खुलासे केल्याचे सांगितले जात आहे. (mansukh hiren death case maharashtra ats theory and 5 shocking points)

ATS गोळा केलेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन दोन मोबाईल वापरत होते. मृत्यूपूर्वी दोन्ही मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणांहून स्वीच ऑन आणि स्वीट ऑफ करण्यात आले. एका मोबाईचे लोकेशन वसईतील मांडवी तर दुसऱ्याचे लोकेशन तुंगारेश्वर असून, दोन्ही मोबाईल स्वीच ऑफ आणि स्वीच ऑन होण्याआधी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय एटीएसकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास NIA कडे; एटीएसने केले स्पष्ट

पुरावे नष्ट करण्यास मिळाला वेळ

दुसरे म्हणजे आत्महत्या करणारी व्यक्ती कोरोनाच्या भीतीने तोंडावर मास्क किंवा रुमाल लावते, हे न पटणारे आहे. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाली असावी, हा संशय बळावतो आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तोंडावाटे पाणी शरीरात जाऊन काही वेळातच मृतदेह पाण्यावर तरंगला असता, यासाठी मनसुख हिरेन यांच्या तोंडात रुमालाचे बोळे होते. यामुळे मारेकऱ्यांना पसार होण्यास आणि पुरावे नष्ट करण्यास वेळ मिळाला, असे सांगितले जात आहे. 

तपास यंत्रणा भरकटवण्यासाठी केलेला भाग

हिरेन यांचा मृत्यू त्यांचा मृतदेह पाण्यात फेकण्याच्या १२ ते १६ तास आधी झाला असावा, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल ऑन ऑफ करण्याचे तंत्र हा तपास यंत्रणा भरकटवण्यासाठी केलेला भाग असावा, असा संशय एटीएसच्या अधिकाऱ्यांना आहे, असे म्हटले जाते आहे. 

दरम्यान, हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र एटीएसने गुन्हा नोंद केला आहे. मात्र, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांसंदर्भातील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आला आहे. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडेच राहणार आहे, असे एटीएसकडून स्पष्ट करण्यात आले. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणAnti Terrorist SquadएटीएसMukesh Ambaniमुकेश अंबानीPoliceपोलिस