शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बीड: 'अशा वेळेला ते एकनाथ शिंदेच पाहिजे होते', मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रि‍पदाबद्दल मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:44 IST

Manoj Jarange Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी असमाधान व्यक्त केले. त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते, अशी भूमिका मांडली.  

Manoj Jarange on Eknath Shinde Devendra fadnavis: "सरकार आपल्यासोबत असून आपल्याला न्याय नाही म्हटल्यावर... सोबत नसतं तर ठीक आहे की, आंदोलन करावं लागेल. पण, यापेक्षा कोणते संवेदनशील प्रकरण हवंय सरकारला? अशा वेळेला ते शिंदे साहेबच पाहिजे होते", असे मोठे विधान मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी मस्साजोग येथे केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मस्साजोग येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. 

एकनाथ शिंदेंबद्दल बोलताना फडणवीसांवर निशाणा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. "अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे होते. त्यांनी खपाखप तुरुंगात टाकले असते. तंगड्या धरून आपटले असते. ही काय तिरस्कारासारखी वागणूक आहे. देशमुख कुटुंबाला उपोषणाला बसावं लागतंय म्हणजे तिरस्काराची वागणूक आहे."

"मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला की नाही? आजही देताहेत. तुम्हाला एकदाही माया दया फुटत नाही. सरकारसोबत असून न्याय नाहीये", असे मनोज जरांगे म्हणाले. 

एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, जरांगेंनी काय दिले उत्तर?

तुम्ही म्हणालात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते, तर तुरुंगात टाकलं असतं. पण, ते सरकारमध्ये आहेत? असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. 

या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, "अरे बाबा, मुख्यमंत्री होते, तेव्हाच चालू दिलं नाही, आता उपमुख्यमंत्र्याचं केव्हा चालू द्यायचं. तेव्हा कामं झाली नाहीत. आमच्या दोन मागण्यांना आता दोन महिने होतील. मराठा आरक्षणाच्या. आठ मागण्या होत्या. म्हणाले, चार करतो. चारपैकी आता दोन वर आलेत. त्याही पूर्ण होईना. कुणाचाच कुणाला मेळ नाही. यातून लक्षात येतं की, गरिबांचा सरकारला किती तिरस्कार आहे", असे उत्तर मनोज जरांगेंनी दिले. 

एकनाथ शिंदे भेटीला आले नाहीत?

देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला एकनाथ शिंदे आले नाहीत, असा प्रश्नही जरांगेंना विचारण्यात आला. ते म्हणाले, "ते आले. नाही आले. तो त्यांचा विषय आहे. ते मला माहिती नाही. बाकीचे कुणीच येऊन गेले नाहीत, त्यांचं काय? फडणवीस पण आले नाहीत. देशमुख कुटुंबीयांनी काय हेलिकॉप्टर लावायचं होतं का? इकडे काय मुसळधार पाऊस होता, इकडचे सगळे पूल वाहून गेले होते? मी बरोबरी करत नाही, मी फरक सांगतोय. फडणवीसांचा द्वेष किंवा शिंदे लय चांगले, असं नाही. आम्ही दोघांच्या कामातील फरक सांगतोय", असे मनोज जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीSantosh Deshmukhसंतोष देशमुख