शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

बीड: 'अशा वेळेला ते एकनाथ शिंदेच पाहिजे होते', मनोज जरांगेंचं मुख्यमंत्रि‍पदाबद्दल मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:44 IST

Manoj Jarange Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी असमाधान व्यक्त केले. त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते, अशी भूमिका मांडली.  

Manoj Jarange on Eknath Shinde Devendra fadnavis: "सरकार आपल्यासोबत असून आपल्याला न्याय नाही म्हटल्यावर... सोबत नसतं तर ठीक आहे की, आंदोलन करावं लागेल. पण, यापेक्षा कोणते संवेदनशील प्रकरण हवंय सरकारला? अशा वेळेला ते शिंदे साहेबच पाहिजे होते", असे मोठे विधान मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी मस्साजोग येथे केले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मस्साजोग येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. 

एकनाथ शिंदेंबद्दल बोलताना फडणवीसांवर निशाणा

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. "अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे होते. त्यांनी खपाखप तुरुंगात टाकले असते. तंगड्या धरून आपटले असते. ही काय तिरस्कारासारखी वागणूक आहे. देशमुख कुटुंबाला उपोषणाला बसावं लागतंय म्हणजे तिरस्काराची वागणूक आहे."

"मुख्यमंत्र्यांना देशमुख कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला की नाही? आजही देताहेत. तुम्हाला एकदाही माया दया फुटत नाही. सरकारसोबत असून न्याय नाहीये", असे मनोज जरांगे म्हणाले. 

एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत, जरांगेंनी काय दिले उत्तर?

तुम्ही म्हणालात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते, तर तुरुंगात टाकलं असतं. पण, ते सरकारमध्ये आहेत? असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. 

या प्रश्नाला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, "अरे बाबा, मुख्यमंत्री होते, तेव्हाच चालू दिलं नाही, आता उपमुख्यमंत्र्याचं केव्हा चालू द्यायचं. तेव्हा कामं झाली नाहीत. आमच्या दोन मागण्यांना आता दोन महिने होतील. मराठा आरक्षणाच्या. आठ मागण्या होत्या. म्हणाले, चार करतो. चारपैकी आता दोन वर आलेत. त्याही पूर्ण होईना. कुणाचाच कुणाला मेळ नाही. यातून लक्षात येतं की, गरिबांचा सरकारला किती तिरस्कार आहे", असे उत्तर मनोज जरांगेंनी दिले. 

एकनाथ शिंदे भेटीला आले नाहीत?

देशमुख कुटुंबीयांच्या भेटीला एकनाथ शिंदे आले नाहीत, असा प्रश्नही जरांगेंना विचारण्यात आला. ते म्हणाले, "ते आले. नाही आले. तो त्यांचा विषय आहे. ते मला माहिती नाही. बाकीचे कुणीच येऊन गेले नाहीत, त्यांचं काय? फडणवीस पण आले नाहीत. देशमुख कुटुंबीयांनी काय हेलिकॉप्टर लावायचं होतं का? इकडे काय मुसळधार पाऊस होता, इकडचे सगळे पूल वाहून गेले होते? मी बरोबरी करत नाही, मी फरक सांगतोय. फडणवीसांचा द्वेष किंवा शिंदे लय चांगले, असं नाही. आम्ही दोघांच्या कामातील फरक सांगतोय", असे मनोज जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीSantosh Deshmukhसंतोष देशमुख