शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

खोटे गुन्हे दाखल केले तरी मराठा समाज मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 21:51 IST

राज्यातले, जालनातील अंतरवाली सराटी इथले गुन्हे मागे घेण्याची भूमिका सरकारची असेल तर विनाकारण आता पुन्हा गुन्हे दाखल का करतायेत? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.

जालना – मराठा मुलांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारने दिले होते. परंतु अद्याप गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यात आणखी काही गुन्हे विनाकारण नोंदवले जातायेत, या केसेसनं आमची पोरं मागे हटणार नाहीत आणि घाबरणारही नाहीत. राज्यभर मराठा पोरांवर खोटे गुन्हे दाखल केले तरी मराठा समाज मागे हटणार नाही. खोट्या गुन्ह्याला घाबरलो तर आमच्या लेकरांचे वाटोळे होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे,

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यानंतर जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात दुसराही अहवाल मांडा. अधिवेशनात कायदा पारित करून मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्रे द्या, मराठा समाज मागे हटणार नाही, रस्त्यावर येऊ, शांततेत आंदोलन करू. २४ तारखेपर्यंत आमची डेडलाईन आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, २४ नंतर पुन्हा अधिवेशन घ्या, कायदा पारित करा असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच बीड, नांदेड, माझलगावच्या पोरांनी सांगितले, आतापर्यंत ३ हजार जणांची चौकशी झालीय, प्रत्येक जण हाणलंय म्हणतोय, आमचे लोक फौजदारी गुन्हे दाखल करू शकतो. आम्ही घाबरणार नाही. आपण आपल्या पक्षाच्या नेत्याला जातीचा प्रश्न मांडा, मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय? अधिवेशनात मराठा समाजाची बाजू मांडायला सांगा, जर कोणत्याही नेत्याच्या फराळाला जाणार असाल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरणार का हे नेत्यांना विचारा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्यातले, जालनातील अंतरवाली सराटी इथले गुन्हे मागे घेण्याची भूमिका सरकारची असेल तर विनाकारण आता पुन्हा गुन्हे दाखल का करतायेत? ओबीसी नेते मिळून मराठा मुलांना टार्गेट केले जातंय. साखळी उपोषण करणाऱ्यांना गुन्हे दाखल करत आहेत. आम्हाला त्रास देऊ नका, जर शांततेत आंदोलन करताना तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देत असाल तर आम्हालाही रस्त्यावर यावे लागेल. आरक्षणापासून आमचे मन विचलित होणार नाही. आरक्षण मिळवणारच यावर ठाम आहे असंही जरांगे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण