शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

खोटे गुन्हे दाखल केले तरी मराठा समाज मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 21:51 IST

राज्यातले, जालनातील अंतरवाली सराटी इथले गुन्हे मागे घेण्याची भूमिका सरकारची असेल तर विनाकारण आता पुन्हा गुन्हे दाखल का करतायेत? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.

जालना – मराठा मुलांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारने दिले होते. परंतु अद्याप गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यात आणखी काही गुन्हे विनाकारण नोंदवले जातायेत, या केसेसनं आमची पोरं मागे हटणार नाहीत आणि घाबरणारही नाहीत. राज्यभर मराठा पोरांवर खोटे गुन्हे दाखल केले तरी मराठा समाज मागे हटणार नाही. खोट्या गुन्ह्याला घाबरलो तर आमच्या लेकरांचे वाटोळे होईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे,

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यानंतर जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात दुसराही अहवाल मांडा. अधिवेशनात कायदा पारित करून मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्रे द्या, मराठा समाज मागे हटणार नाही, रस्त्यावर येऊ, शांततेत आंदोलन करू. २४ तारखेपर्यंत आमची डेडलाईन आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, २४ नंतर पुन्हा अधिवेशन घ्या, कायदा पारित करा असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच बीड, नांदेड, माझलगावच्या पोरांनी सांगितले, आतापर्यंत ३ हजार जणांची चौकशी झालीय, प्रत्येक जण हाणलंय म्हणतोय, आमचे लोक फौजदारी गुन्हे दाखल करू शकतो. आम्ही घाबरणार नाही. आपण आपल्या पक्षाच्या नेत्याला जातीचा प्रश्न मांडा, मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय? अधिवेशनात मराठा समाजाची बाजू मांडायला सांगा, जर कोणत्याही नेत्याच्या फराळाला जाणार असाल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरणार का हे नेत्यांना विचारा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्यातले, जालनातील अंतरवाली सराटी इथले गुन्हे मागे घेण्याची भूमिका सरकारची असेल तर विनाकारण आता पुन्हा गुन्हे दाखल का करतायेत? ओबीसी नेते मिळून मराठा मुलांना टार्गेट केले जातंय. साखळी उपोषण करणाऱ्यांना गुन्हे दाखल करत आहेत. आम्हाला त्रास देऊ नका, जर शांततेत आंदोलन करताना तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देत असाल तर आम्हालाही रस्त्यावर यावे लागेल. आरक्षणापासून आमचे मन विचलित होणार नाही. आरक्षण मिळवणारच यावर ठाम आहे असंही जरांगे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण