शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 15:30 IST

मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

छत्रपती संभाजीनगर - Manoj Jarange Patil ( Marathi News )  सगेसोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य न झाल्यास मी मैदानात उतरणार, राज्यात सगळ्या जातींना सोबत घेत २८८ जागा लढवणार अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राजकारण माझा मार्ग नाही. मराठा एकत्र आल्याने तुमची लोकसभेला फजिती झाली, हे संकेत आहेत. माझ्या नादी लागू नका. सगेसोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य करा एवढीच माझं म्हणणं आहे. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. मला माझ्या समाजातील पोरं मोठी करायची आहे. समाजाला ताकद द्यायची आहे. जर तुम्ही हे नाही केले तर २८८ जागांवर मी सर्व जातीचे उमेदवार उतरून गोरगरिबांना निवडून आणणार. सर्व जातीधर्माचे लोक घेणार मग मी मागे हटणार नाही. त्यावेळी नाव घेऊन कुणाला पाडायचे हे सांगेन असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. 

तसेच मुस्लीम, दलित, मराठा यांच्या लेकरांना त्यांचं नुकसान व्हावं असं वाटत नाही. वेगवेगळ्या समुहाचे हाल आहेत. धनगरांना फसवलं, मराठ्यांना फसवलं. आमचे वैर नाही. पण मी कार्यक्रम लावणार, गोरगरिबांना निवडून आणणार. ४-५ जाती एकत्रित आल्या तर १०० टक्के सत्ता आणेन. मग होऊ द्या ७-८ उपमुख्यमंत्री, एक मुस्लीम, एक धनगर, एक दलित, लिंगायत समाज सगळ्यांचा एक एक उपमुख्यमंत्री करू. शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्री झाला तर दणादण शेतकऱ्यांची कामे करतील. मी मैदानात उतरलो, तर गोरगरिबांच्या हाती सत्ता द्या, निवडून येणारे कसे काम करणार नाहीत ते मी बघतो असं आवाहनही जरांगेंनी जनतेला केले. 

दरम्यान, मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही. त्यांच्या व्यासपीठावर बसणारे आज मला फोन करतायेत. समाजाचं काम सोडून मला इतर वेळ नाही. धनंजय मुंडे उपकार ठेवणारे आहेत असं वाटत होते. परंतु गेल्या २-३ दिवसांत मला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येतायेत. ही परतफेड आहे का, पुढे विधानसभा आहे बघू. तुमच्या नेत्यांना राज्यात फिरायचंय लक्षात ठेवा. मराठा एकजूट आहे. अन्याय सहन करत नाहीत. मराठा आणि वंजारी यांच्यात काही झालं नाही यासाठी सलोख्याची भूमिका बहिण भावाने म्हणायला हवं होते. मराठी वंजारी कुठेच काही झाले नाही. हे दोन्ही एकत्रित राहिले तर त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त होत नाही. निवडणूक गेल्यावर तुम्ही आता गुरगुर करायला लागलाय. जे झालं असेल ते झालं, पुढे एकत्रित राहू असं आवाहन बहिण भावाने करायला हवं होते असा निशाणा जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांच्यावर साधला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण