शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 15:30 IST

मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. 

छत्रपती संभाजीनगर - Manoj Jarange Patil ( Marathi News )  सगेसोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य न झाल्यास मी मैदानात उतरणार, राज्यात सगळ्या जातींना सोबत घेत २८८ जागा लढवणार अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राजकारण माझा मार्ग नाही. मराठा एकत्र आल्याने तुमची लोकसभेला फजिती झाली, हे संकेत आहेत. माझ्या नादी लागू नका. सगेसोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य करा एवढीच माझं म्हणणं आहे. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. मला माझ्या समाजातील पोरं मोठी करायची आहे. समाजाला ताकद द्यायची आहे. जर तुम्ही हे नाही केले तर २८८ जागांवर मी सर्व जातीचे उमेदवार उतरून गोरगरिबांना निवडून आणणार. सर्व जातीधर्माचे लोक घेणार मग मी मागे हटणार नाही. त्यावेळी नाव घेऊन कुणाला पाडायचे हे सांगेन असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. 

तसेच मुस्लीम, दलित, मराठा यांच्या लेकरांना त्यांचं नुकसान व्हावं असं वाटत नाही. वेगवेगळ्या समुहाचे हाल आहेत. धनगरांना फसवलं, मराठ्यांना फसवलं. आमचे वैर नाही. पण मी कार्यक्रम लावणार, गोरगरिबांना निवडून आणणार. ४-५ जाती एकत्रित आल्या तर १०० टक्के सत्ता आणेन. मग होऊ द्या ७-८ उपमुख्यमंत्री, एक मुस्लीम, एक धनगर, एक दलित, लिंगायत समाज सगळ्यांचा एक एक उपमुख्यमंत्री करू. शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्री झाला तर दणादण शेतकऱ्यांची कामे करतील. मी मैदानात उतरलो, तर गोरगरिबांच्या हाती सत्ता द्या, निवडून येणारे कसे काम करणार नाहीत ते मी बघतो असं आवाहनही जरांगेंनी जनतेला केले. 

दरम्यान, मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही. त्यांच्या व्यासपीठावर बसणारे आज मला फोन करतायेत. समाजाचं काम सोडून मला इतर वेळ नाही. धनंजय मुंडे उपकार ठेवणारे आहेत असं वाटत होते. परंतु गेल्या २-३ दिवसांत मला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येतायेत. ही परतफेड आहे का, पुढे विधानसभा आहे बघू. तुमच्या नेत्यांना राज्यात फिरायचंय लक्षात ठेवा. मराठा एकजूट आहे. अन्याय सहन करत नाहीत. मराठा आणि वंजारी यांच्यात काही झालं नाही यासाठी सलोख्याची भूमिका बहिण भावाने म्हणायला हवं होते. मराठी वंजारी कुठेच काही झाले नाही. हे दोन्ही एकत्रित राहिले तर त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त होत नाही. निवडणूक गेल्यावर तुम्ही आता गुरगुर करायला लागलाय. जे झालं असेल ते झालं, पुढे एकत्रित राहू असं आवाहन बहिण भावाने करायला हवं होते असा निशाणा जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांच्यावर साधला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण