शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने ती चूक करू नये, तसं झाल्यास गावाकडे असलेले मराठेही मुंबईत येतील, जरांगे पाटील यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 17:07 IST

Maratha Reservation: मराठा आंदोलक शांततेत आंदोलन करत आहेत. जर सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास गावाकडे राहिलेले मराठेही झाडून मुंबईत येतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या सीमेवर धडकलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने काही मागण्या मान्य केल्याने आजची रात्र नवी मुंबईतील वाशी येथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत काढण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास मुंबईत येण्याबाबतचा निर्णय उद्या दुपारी १२ वाजता घेतला जाईल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच मराठा आंदोलक शांततेत आंदोलन करत आहेत. जर सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास गावाकडे राहिलेले मराठेही झाडून मुंबईत येतील, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

या मुद्द्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला आरक्षण मिळो वा न मिळो आम्ही आझाद मैदानावर जाणार आहोत. सध्या मराठा समाज शांततेत आंदोलन करत आहेत. आता आम्ही आणखी वेळ वाढवून दिली आहे. त्यामुळे आम्ही सरकारचा सन्मान करून आणखी वेळ वाढवून दिला आहे, असा संदेश आमच्या समाजामध्ये जाणार आहे. मात्र आता सरकारने काही दगाफटका केला, तर आहेत ते मराठे देखील झाडून मुंबईकडे येण्यासाठी निघतील. त्यामुळे आता सरकारला आरक्षण द्यावंच लागणार आहे, असेही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. 

तसेच आरक्षणासाठी मुंबईत आलेल्या मराठा तरुणांच्या सुरक्षेबाबतही मोठं विधान केलं आहे.  एकाही मराठा तरुणाला पोलिसांनी धक्का लावला तर साडे पाच कोटी मराठे घरी दिसणार नाहीत, सर्वांना झाडून मुंबईत बोलावलं जाईल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला, आहे.

यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सामान्य विभागाचे सचिव सारासार निर्णय घेऊन आपल्याकडे आले होते. सरकारचे मंत्री चर्चेला आले नाहीत पण सरकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. ५४ लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत तर त्या प्रमाणपत्राचे तुम्ही वाटप करा. नोंदी कुणाच्या सापडल्या त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयात यादी चिटकवा. ज्याला नोंद मिळाली हे माहिती नसेल मग तो अर्ज कसा करणार? त्यासाठी सरकारने गावागावात शिबिरे सुरू केलेत. नोंदीही ग्रामपंचायतीला लावायला सुरुवात केली. ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या कुटुंबाला याआधारे प्रमाणपत्रे देण्यात यावे. एका नोंदीवर ५० ते १५० जणांना फायदा होतोय. यामुळे २ कोटी मराठा आरक्षणात जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार