शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

“मराठा आरक्षण मिळाले तरी मुंबई गाठणार, नाही मिळाले तरी जाणार”; मनोज जरांगेंचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 15:09 IST

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: सरकारचे नेमके काय सुरू आहे, ते माहिती नाही, असे सांगत मनोज जरांगे यांनी मुंबईला येण्याबाबत स्पष्ट भाष्य केले.

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: एकीकडे देशभरात श्रीरामोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, दुसरीकडे महाराष्ट्रात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी मुंबईकडे निघणार आहेत. मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. यातच आता काही झाले तरी मुंबईत जाणारच असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. 

सरकारचे नेमके काय सुरू आहे, ते माहिती नाही. आम्ही त्यांना काही ओळी टाकण्यास सांगितले होते. मात्र, मला वाटत नाही की, त्या ओळींचा समावेश सरकारने केला असेल. सरकारने जी काही दुरुस्ती केली आहे, ती व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली. अशा गोष्टी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवायच्या नसतात, प्रत्यक्ष येऊन चर्चा करायची असते आणि त्यानंतर अध्यादेश काढायचा असतो. तुम्ही तिथून टाकणार आम्ही मग इथून सांगणार, याला काही अर्थ नाही. प्रत्यक्ष येऊन करायचे. मगच अध्यादेश निघाला पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण मिळाले तरी मुंबई गाठणार, नाही मिळाले तरी जाणार

२० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईसाठी रवाना होत आहेत. यावर बोलताना मनोज जरांगे यांनी सांगितले की, आरक्षण मिळाले तरी मुंबईला जाणार आणि मिळाले नाही तरी मुंबईला जाणार. तोपर्यंत आरक्षण मिळाले तर गुलाल घेऊन जाऊ नाहीतर आणायला जाऊ, असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, सरकारने भानावर यावे. आमच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला गोडी गुलाबीने यावर तोडगा काढावा लागेल. आडमुठ्या भूमिकेत जाल, मुंबईत येऊ देणार नाही. आता मराठे संतापलेत. ५४ लाख लोकांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र द्या. सरकारने माझ्यावर ट्रॅप रचलाय, मी त्याला भीत नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण