शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

“लोकसभा नाही, विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात करणार, आरक्षण...”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 13:09 IST

Manoj Jarange Patil: सगळ्या पक्षांनी आणि जाती-धर्मांनी पाठिंबा दिला होता. यामुळे खासदार झाला असतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil: बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या संविधानाने देशातील नागरिकांना न्याय दिला आहे. माझा राजकीय मार्ग नाही. लोकचळवळीचा मार्ग मला माहिती आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही. लोकसभेत आम्ही उतरलो नाही, परंतु विधानसभेची तयारी जोरात करणार आहोत, असे मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

मराठा बांधव कोणाच्या सभांना जात नाही. ते फक्त मजा बघत आहेत. ते उमेदवारांना पाडणार आहेत. तो आमचा मोठा विजय होणार आहे. आम्हाला वेळ कमी होता. लोकसभा निवडणूक खूप मोठी असते. त्याचे कार्यक्षेत्र मोठे असते, असे सांगत जून महिन्यापर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर ६ जूनपासून पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला.

बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही, राजकारण आपले क्षेत्र नाही

बहुमताशिवाय राजकारणाला किंमत नाही. भावनेच्या जीवावर राजकारणात मत घेता येत नाही. मी निवडणूक लढणार नाही. मला मराठा बांधव महत्त्वाचा आहे. सगळ्या पक्षांनी आणि जाती-धर्मांनी पाठिंबा दिला होता. यामुळे खासदार झाला असतो. परंतु राजकारण हे आपले क्षेत्र नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

दरम्यान, महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. आज देऊ, उद्या देऊ असे करून सात महिने झाले. मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे. इतके प्रेम उफाळून येते की, त्यांचे काही सांगता येत नाही. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण