शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

“हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का”; मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 15:18 IST

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: येवलावाला राजकीय फायद्यासाठी करतो आहे. मराठा समाजाला टक्कर देण्याचे काम कोणी करू नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके दोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे ओबीसीतून मराठा आरक्षण, सगेसोयरेची अंमलबजावणी यावर ठाम असून, ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, यासाठी लक्ष्मण हाके यांनी एल्गार पुकारल्याचे पाहायला मिळत आहे. यातच हीच वेळ आहे. मराठा आमदारांनी एकत्र यायला हवे. आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी विचारला आहे. 

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही. मराठा समाज एका झाल्याने यांचे पोट दुखत आहे. किती जरी झाकले तरी ते उघडे होतच आहे. आपल्याला सुद्धा परिवार आहे, आपले सुद्धा आंदोलन आहे. मी कोणाला घाबरत नाही, माझा रस्ता स्पष्ट आहे. मराठा समाजाला टक्कर देण्याचे काम कोणी करू नये. मी निर्भीडपणे बोलतो. मी मराठा समजासाठी मरायला तयार आहे. आता तर मी आंतरवाली सराटीत कुठेही राहणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.

आपल्याला लढूनच मिळवावे लागणार आहे

पोलिसांत तक्रार केली तर आम्हाला न्याय मिळणार नाही. मराठा समाजात असा मेसेज गेला, आता आपल्याला न्याय मिळणार नाही. आपल्याला लढूनच मिळवावे लागणार आहे. मराठा समाजातील गोरगरीब, पोरे मोठी व्हावे, यासाठी मी लढतो आहे, असे सांगताना, येवला वाला राजकीय फायद्यासाठी करतो आहे. ओबीसींचे नेते येवला वाल्याने एकत्र केले. जर ओबीसी समाज ताकदीने एकत्र येऊ शकतो तर आता मराठ्यांनी या शांतता रॅलीत एकत्र यावे. ओबीसींच्या नेत्यांचा पहिल्या पासून विरोध आहे, शांतता रॅली निघणार आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. 

आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का?

६ जुलै ते १३ जुलै शांतता रॅलीत सर्वांनी एकत्र यावे. आता हीच वेळ आहे. मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले आहे. मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे. ते अधिवेशनात मराठा आरक्षणाची मागणी करतील, असे वाटत आहे. आता मराठा समाजाच्या नेत्यांनी एकत्र यावे. आम्ही मेल्यावर तुम्ही एकत्र येणार का, असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण