शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

“गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर...”; मनोज जरांगे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:04 IST

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: आपली एकजूट कायम ठेवावी. मराठा समाजातील लोकांनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. १३ जुलैपर्यंतची वेळ मनोज जरांगे यांनी सरकारला दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. तर ओबीसीतून आरक्षण देण्याला तीव्र विरोध होत असून, लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केले आहे. यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी राज्यातील विविध ठिकाणी सभा, बैठका घेण्यास सुरुवात केली असून, गाफील न राहण्याची सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, येत्या १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचे आहे, तोवर कुणीही गाफील राहू नका. सरकारने आपल्याला १३ जुलैपर्यंत आरक्षण दिले नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. सरकारने आरक्षण दिले नाही तर राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे याचा निर्णय लवकरच घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचे आहे. आता आपली लेकरे मोठी करायची आहेत. आपल्या लेकरांना मोठे करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. गाफील राहू नका, हा माझा नेता, तो तुझा नेता असा वाद घालत बसू नका. इतकी वर्षे आपल्या नेत्यांना मोठे करत आलो. आता आपल्या मुलांना कसे मोठे करता येईल ते पाहा, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, मराठा समाजातील लोकांनी १०० टक्के मतदान करावे. आपली एकजूट सर्वांनी पाहिली आहे. एकजूट कायम ठेवा. आपण आपला विषय मागे पडू द्यायचा नाही. सर्वांना शेवटचे सांगतो की, संपूर्ण ताकदीने एकत्र राहा. आपली शक्ती कमी पडू देऊ नका. सरकारने आरक्षण दिले नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाजाची सर्वांत मोठी बैठक आयोजित करू. एका विशाल मैदानावर ही बैठक घेऊ. या बैठकीत आपण पुढचे नियोजन करू. या सरकारने आपल्याला आरक्षण दिले नाही तर काय करायचे याचा निर्णय त्या बैठकीत घेऊ. २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे त्याचा निर्णय त्या बैठकीत घेतला जाईल, असे मनोज जरांगे यांनी नमूद केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण