शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

“गाफील राहू नका, १३ जुलैपर्यंत ओबीसीतून आरक्षण दिले नाही तर...”; मनोज जरांगे थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:04 IST

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: आपली एकजूट कायम ठेवावी. मराठा समाजातील लोकांनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सुरू असलेल्या आंदोलाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. १३ जुलैपर्यंतची वेळ मनोज जरांगे यांनी सरकारला दिली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. तर ओबीसीतून आरक्षण देण्याला तीव्र विरोध होत असून, लक्ष्मण हाके यांनी आंदोलन सुरू केले आहे. यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी राज्यातील विविध ठिकाणी सभा, बैठका घेण्यास सुरुवात केली असून, गाफील न राहण्याची सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 

कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, येत्या १३ जुलैपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचे आहे, तोवर कुणीही गाफील राहू नका. सरकारने आपल्याला १३ जुलैपर्यंत आरक्षण दिले नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. सरकारने आरक्षण दिले नाही तर राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे याचा निर्णय लवकरच घेऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय थांबायचे नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचे आहे. आता आपली लेकरे मोठी करायची आहेत. आपल्या लेकरांना मोठे करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. गाफील राहू नका, हा माझा नेता, तो तुझा नेता असा वाद घालत बसू नका. इतकी वर्षे आपल्या नेत्यांना मोठे करत आलो. आता आपल्या मुलांना कसे मोठे करता येईल ते पाहा, असे मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, मराठा समाजातील लोकांनी १०० टक्के मतदान करावे. आपली एकजूट सर्वांनी पाहिली आहे. एकजूट कायम ठेवा. आपण आपला विषय मागे पडू द्यायचा नाही. सर्वांना शेवटचे सांगतो की, संपूर्ण ताकदीने एकत्र राहा. आपली शक्ती कमी पडू देऊ नका. सरकारने आरक्षण दिले नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाजाची सर्वांत मोठी बैठक आयोजित करू. एका विशाल मैदानावर ही बैठक घेऊ. या बैठकीत आपण पुढचे नियोजन करू. या सरकारने आपल्याला आरक्षण दिले नाही तर काय करायचे याचा निर्णय त्या बैठकीत घेऊ. २८८ मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे करायचे की त्यांचे २८८ उमेदवार पाडायचे त्याचा निर्णय त्या बैठकीत घेतला जाईल, असे मनोज जरांगे यांनी नमूद केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण