शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

लोकांचे पैसे खाऊन जेलमध्ये गेलेल्यांना शेंदूर कोण लावणार? - मनोज जरांगे पाटील

By शरद जाधव | Updated: November 17, 2023 20:59 IST

मराठा-ओबीसी प्रश्नावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडावी आणि दंगली घडाव्यात अशीच त्यांची इच्छा आहे असा आरोप जरांगेंनी केला.

सांगली - मराठा-ओबीसींमध्ये विनाकारण वाद निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. पुरावे मिळाल्याने आता ओबीसीमधूनच मराठा आरक्षण मिळविणार आहे. मात्र, ओबीसी आरक्षणात मराठ्यांना येऊ द्यायचे नाही असा काहींचा प्रयत्न आहे. त्यामुळेच त्यांचा तीळपापड होत आहे. समाजाचा देव बनण्याचा प्रयत्न मी कधीच केलेला नाही, पण लोकांचे रक्त पिऊन, पैसे घेऊन पाच वर्षे जेलमध्ये जाणाऱ्यांनाच लाेकांनी आपल्याला देव मानावे असे वाटत आहे. मात्र, अशांना शेंदूर कोण लावणार, अशी टीका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली.

सांगलीत शुक्रवारी जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरमरीत शब्दात समाचार घेतला. जरांगे पाटील म्हणाले, त्यांचे वय झाल्याने आता टीका करण्यापेक्षा दुसरे कोणतेही काम उरलेले नाही. यामुळे ते टीका करत सुटले आहेत. मराठा समाज ओबीसीमध्ये आला आहे हे आता सिद्ध झाले आहे. त्याचे पुरावेही समोर आले आहेत. त्यामुळे आता अशा टीकाकारांवर लक्ष देण्याऐवजी त्यांना महत्त्व देणार नाही. समाजाचा देव बनण्याचा मी कधीच प्रयत्न केलेला नाही. उलट त्यांना समाजाने देव मानावे असे वाटत आहे. पण, लोकांचे रक्त पिऊन आणि पैसा खाऊन पाच पाच वर्षे जेलमध्ये तुम्ही जाता. तुम्हाला कोण शेंदूर फासणार आहे.

मराठा-ओबीसी प्रश्नावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडावी आणि दंगली घडाव्यात अशीच त्यांची इच्छा आहे. मात्र, असे कोणतेही भाष्य त्यांनी करू नये. माझ्यावर टीका करा पण समाजाला आरक्षण मिळविल्याशिवाय आता शांत बसणार नाही. धमक्या देऊन शांतता बिघडविण्याचे काम सध्या भुजबळ यांच्याकडून सुरू आहे. जनतेच्या नजरेतून उतरल्यानेच आता स्थान मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. लोकांच्या भावना भडकविण्याचे काम थांबवावे असेही ते म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण