शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

लोकांचे पैसे खाऊन जेलमध्ये गेलेल्यांना शेंदूर कोण लावणार? - मनोज जरांगे पाटील

By शरद जाधव | Updated: November 17, 2023 20:59 IST

मराठा-ओबीसी प्रश्नावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडावी आणि दंगली घडाव्यात अशीच त्यांची इच्छा आहे असा आरोप जरांगेंनी केला.

सांगली - मराठा-ओबीसींमध्ये विनाकारण वाद निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. पुरावे मिळाल्याने आता ओबीसीमधूनच मराठा आरक्षण मिळविणार आहे. मात्र, ओबीसी आरक्षणात मराठ्यांना येऊ द्यायचे नाही असा काहींचा प्रयत्न आहे. त्यामुळेच त्यांचा तीळपापड होत आहे. समाजाचा देव बनण्याचा प्रयत्न मी कधीच केलेला नाही, पण लोकांचे रक्त पिऊन, पैसे घेऊन पाच वर्षे जेलमध्ये जाणाऱ्यांनाच लाेकांनी आपल्याला देव मानावे असे वाटत आहे. मात्र, अशांना शेंदूर कोण लावणार, अशी टीका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली.

सांगलीत शुक्रवारी जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरमरीत शब्दात समाचार घेतला. जरांगे पाटील म्हणाले, त्यांचे वय झाल्याने आता टीका करण्यापेक्षा दुसरे कोणतेही काम उरलेले नाही. यामुळे ते टीका करत सुटले आहेत. मराठा समाज ओबीसीमध्ये आला आहे हे आता सिद्ध झाले आहे. त्याचे पुरावेही समोर आले आहेत. त्यामुळे आता अशा टीकाकारांवर लक्ष देण्याऐवजी त्यांना महत्त्व देणार नाही. समाजाचा देव बनण्याचा मी कधीच प्रयत्न केलेला नाही. उलट त्यांना समाजाने देव मानावे असे वाटत आहे. पण, लोकांचे रक्त पिऊन आणि पैसा खाऊन पाच पाच वर्षे जेलमध्ये तुम्ही जाता. तुम्हाला कोण शेंदूर फासणार आहे.

मराठा-ओबीसी प्रश्नावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडावी आणि दंगली घडाव्यात अशीच त्यांची इच्छा आहे. मात्र, असे कोणतेही भाष्य त्यांनी करू नये. माझ्यावर टीका करा पण समाजाला आरक्षण मिळविल्याशिवाय आता शांत बसणार नाही. धमक्या देऊन शांतता बिघडविण्याचे काम सध्या भुजबळ यांच्याकडून सुरू आहे. जनतेच्या नजरेतून उतरल्यानेच आता स्थान मिळविण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. लोकांच्या भावना भडकविण्याचे काम थांबवावे असेही ते म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण