शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2024 14:42 IST

Manoj Jarange Patil Warns Amit Shah News: गुर्जर, पटेलांचे आंदोलन हाताळून कोणता तीर मारला? तसेच आमचे आंदोलन हाताळून आंदोलन संपवणार असाल तर जनता तुम्हाला वठणीवर आणेल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

Manoj Jarange Patil Warns Amit Shah News: सगेसोयरेंची अंमलबजावणी, कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसीतून मराठा आरक्षण मिळण्यासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सुरू केलेले उपोषण स्थगित केले. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच आता पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाचे ज्येष्ठ मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले असून, थेट इशारा दिला आहे. 

मराठ्यांचे आंदोलन आमच्या पद्धतीने हाताळू, अशा आशयाचे विधान अमित शाह यांनी केली होते. या विधानाचा समाचार घेताना मनोज जरांगे यांनी अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता अमित शाह यांच्याकडे मनोज जरांगे यांनी टीकेचा मोर्चा वळवल्याची चर्चा सुरू झाली आहे. पटेलांचा वापर करून तुम्ही कोणत्या बेटावर काय केले हे आम्हाला माहिती आहे. सिल्वासाच्या बेटावर काय केले? दमणमध्ये काय केले? अंदमानमध्ये काय केले? स्वत:च्या लोकांना खड्ड्यात घालून काय केले, हे आम्हाला माहिती आहे. माझ्या मराठ्यांचे आंदोलन हाताळण्याच्या भानगडीत पडू नका. नाही तर तुमचा राजकीय एन्काउंटर करू, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मोहन भागवत खंबीर आहेत म्हणून, अन्यथा...

तुम्ही बरेच राजकीय एन्काउंटर केले. प्रमोद महाजनांनी काय कमी केले? अडवाणी कुठे कमी पडले? मुरली मनोहर जोशी कुठे कमी पडले? अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया हे कुठे कमी पडले? सुषमा स्वराज कुठे कमी पडल्या? तुम्ही या लोकांना का मागे पाडले? तुम्ही गोवा, कर्नाटक, हरयाणा आणि तामिळनाडूत तेच केले. तुम्ही वातावरण ढवळून काढण्यापर्यंत काम केले. तोगडियांनी काम नाही का केले? अशोक सिंघलांनी काम नाही का केले? त्यांच्यावर पळून जाण्याची वेळ का आणली? त्यांच्यावर वाईट परिस्थिती आणली. ही तुमची काम करण्याची पद्धत आहे. तुम्ही पक्ष आणि आंदोलन कसे हाताळतात हे सर्वांना माहिती आहे. मोहन भागवत खंबीर आहेत म्हणून. तुम्ही कुणालाही सोडले नाही, या शब्दांत मनोज जरांगे अमित शाह आणि भाजपावर हल्लाबोल केला. 

आंदोलन हाताळण्याची नाही, दादागिरीची पद्धत आहे

आंदोलन हाताळण्याची ही पद्धत नाही. ही दादागिरीची पद्धत आहे. सर्व नाराज आहेत. या देशातील व्यावसायिकही तुमच्यावर नाराज आहेत. तुमचे गुजरातचेच व्यापारी परदेशात चालले आहेत. मराठ्यांचे आंदोलन हाताळणे एवढं सोपं नाही. अमित शाह हे शिर्डीला आले होते. तेव्हा आरक्षणाबाबत बोललो होतो. नागपूरला आले होते, तेव्हा बोलले नाही. मराठ्यांच्या नादी लागू नका. तुम्हाला सरळ सांगतो. मराठ्यांना आरक्षण दिले तर सत्तेत राहण्यापासून कोणी रोखू शकत नाही. पण दिले नाही तर मग कठीण आहे, अशी बोचरी टीका जरांगे पाटील यांनी केली.

दरम्यान, तुम्ही स्वत:ला महानबुद्धीचे समजता का? सत्तेच्या बळावर काही करता येते. चांगले काम करणाऱ्यांना संपवले. हे विचार जास्त काळ टिकत नाही. एक दिवस जनतेची खदखद बाहेर येते, तेव्हा लोक सत्तेच्या विरोधात जातात. ज्या यंत्रणांचा वापर केला. त्याही बाजूला होतात. तुमच्या गोळ्या आणि रणगाडेही संपतील. जनता तुम्हाला घरात घुसून वठणवीर आणेल. तुम्हाला अशा पद्धतीने आंदोलन हाताळून मस्ती आली आहे. त्याच पद्धतीने आमचे आंदोलन हाताळून आंदोलन संपवणार असाल तर जनता तुम्हाला वठणीवर आणेल. गुर्जर, पटेल यांचे आंदोलन हाताळून कोणता तीर मारला? असा थेट सवाल मनोज जरांगे यांनी केला. 

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAmit Shahअमित शाहMaratha Reservationमराठा आरक्षण