शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 11:41 IST

Manoj Jarange Patil: उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय आहे. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे समाज योग्यरित्या ठरवेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हा शिवाय दुसऱ्या कोणत्याही चिन्हाचा प्रचार कधीही केला नव्हता. परंतु महाराष्ट्रातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. ८८ जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदान एका टप्प्यात आहे. मात्र महाराष्ट्रात ४८ जागा असताना पाच टप्प्यात मतदान घेऊन ठिकठिकाणी स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांना सभा घ्याव्या लागत आहेत. हा सत्ताधाऱ्यांचा पराभव असून मराठा एकजुटीचा विजय आहे, अशी टीका मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला कुणाला पाडा किंवा कुणाला विजयी करा, असे सांगितले नाही. ज्याला पाडायचे त्याला असे पाडा की त्याला मराठा समाजाची ताकद दिसली पाहिजे असे म्हटल आहे. मराठा समाजाने पाडायचे शिकले पाहिजे, असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीनंतर सगेसोयरे कायदेशीर अंमलबजावणी न केल्यास यापेक्षाही बिकट परिस्थितीचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागेल. मराठा समाजाने एक महिन्यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर आली आहे

आव्हान तर त्यांच्यापुढे उभे राहिले आहे. उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय आहे. स्वतःची मुले आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेऊन मराठा समाजाने यावेळेस ताकदीने काम करायचे आहे. एक गोष्ट खरी आहे, मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा घेण्याची कधी गरज पडली नाही. मी म्हटले होते की, मराठ्यांना खेटू नका. तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करत आहेत. माझ्या गोरगरीब मराठा लेकरांवर गुन्हे दखल केले. काहीही नसताना गुन्हे दखल करण्यात आले. आरक्षण असून दिल नाही. ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर आली आहे, या शब्दांत मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. कोण येत आणि कोण जाते हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही. पाहिल्यासारखे मराठे आता राहिले नाही. आता फायदा घेऊ देत नाहीत. मी घेऊ देत नाही तर मराठे कसे घेऊ देतील. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे समाज योग्यरित्या ठरवेल, असे मनोज जरांगे म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा