शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 11:41 IST

Manoj Jarange Patil: उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय आहे. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे समाज योग्यरित्या ठरवेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हा शिवाय दुसऱ्या कोणत्याही चिन्हाचा प्रचार कधीही केला नव्हता. परंतु महाराष्ट्रातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे. ८८ जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये मतदान एका टप्प्यात आहे. मात्र महाराष्ट्रात ४८ जागा असताना पाच टप्प्यात मतदान घेऊन ठिकठिकाणी स्वतः पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांना सभा घ्याव्या लागत आहेत. हा सत्ताधाऱ्यांचा पराभव असून मराठा एकजुटीचा विजय आहे, अशी टीका मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मीडियाशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला कुणाला पाडा किंवा कुणाला विजयी करा, असे सांगितले नाही. ज्याला पाडायचे त्याला असे पाडा की त्याला मराठा समाजाची ताकद दिसली पाहिजे असे म्हटल आहे. मराठा समाजाने पाडायचे शिकले पाहिजे, असे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीनंतर सगेसोयरे कायदेशीर अंमलबजावणी न केल्यास यापेक्षाही बिकट परिस्थितीचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागेल. मराठा समाजाने एक महिन्यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर आली आहे

आव्हान तर त्यांच्यापुढे उभे राहिले आहे. उमेदवार उभे करण्यापेक्षा पाडण्यात खूप मोठा विजय आहे. स्वतःची मुले आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेऊन मराठा समाजाने यावेळेस ताकदीने काम करायचे आहे. एक गोष्ट खरी आहे, मोदींना महाराष्ट्रात इतक्या सभा घेण्याची कधी गरज पडली नाही. मी म्हटले होते की, मराठ्यांना खेटू नका. तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करत आहेत. माझ्या गोरगरीब मराठा लेकरांवर गुन्हे दखल केले. काहीही नसताना गुन्हे दखल करण्यात आले. आरक्षण असून दिल नाही. ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदींवर आली आहे, या शब्दांत मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला.

दरम्यान, आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. कोण येत आणि कोण जाते हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही. पाहिल्यासारखे मराठे आता राहिले नाही. आता फायदा घेऊ देत नाहीत. मी घेऊ देत नाही तर मराठे कसे घेऊ देतील. कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे समाज योग्यरित्या ठरवेल, असे मनोज जरांगे म्हणाले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा