शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 22:17 IST

Manoj Jarange Patil News: धनंजय मुंडे पुन्हा पदावर आले, तर त्याचे दुष्परिणाम पुन्हा एकदा सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil News: बीड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले. या प्रकरणी विरोधकांनी सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. अखेरीस धनंजय मुंडे यांना राजीनामा दिला. या घडामोडी घडत असताना भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना भक्कम पाठिंबा जाहीर केला होता. आता पुन्हा एकदा नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. 

बीडचे भूमिपुत्र धनंजय मुंडे नारळी सप्ताहाला येणार होते. त्यांना हेलिकॉप्टरचा क्लिअरन्स मिळाला नाही, म्हणून त्यांचा दौरा रद्द झाला. भगवान गडाचे म्हणून धनंजय मुंडे यांना जाहीर केले आहे. म्हणून तुम्ही त्याचे टेन्शन घेऊ नका. आपण मोठा कार्यक्रम करू. त्यांच्या गालावरून वारे गेले आहे. सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा. चांगली वाणी बंद पडली. ती पुन्हा सुरू व्हावी. पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्याकडून घडावे एवढेच बोलू, असे नामदेवशास्त्री यांनी सांगितले. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी कठोर शब्दांत भाष्य केले.

पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर अन्याय अत्याचार होणार

त्या गादीचा आम्ही सन्मान करतो, त्यामुळे आम्ही काही बोलणार नाही. परंतु त्यांच्या अंगावरून वारे गेले की गालावरून वारे गेले याच्याशी आम्हाला काही घेणे-देणे नाही. त्यावर मी बोलणार पण नाही. ते पुन्हा पदावर आले तर पुन्हा गुंडगिरी वाढणार, टोळ्या वाढणार आणि पुन्हा लोक मारणार आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर अन्याय अत्याचार होणार. ज्या वेळेस मंत्रिपदाचा दुरुपयोग करून गुंडगिरी सुरू झाली, खंडण्या सुरू झाल्या. आणि लोकांच्या हत्या झाल्या, त्यावेळी जिल्ह्यातील सर्व समाजातील लोकांचे मन दुखले, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, महंत नामदेव शास्त्री काय बोलले, याच्यावर मी बोलणार नाही, शेवटी गादीचा सन्मान आम्ही करतो. ते काहीही बोलले तरी आम्ही बोलणार नाही. परंतु ते पुन्हा पदावर येणे म्हणजे अन्याय अत्याचार त्या जिल्ह्यातल्या लोकांवर सुरू होणे, त्याचे दुष्परिणाम पुन्हा एकदा सरकारला भोगावे लागतील. कारण आत्ताच मंत्रिपदाचा गैरवापर करून किती गुंडगिरी वाढली होती, ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे होते तेव्हा इतकी गुंडगिरी नव्हती. त्यामुळे ते पुन्हा पदावर आले तर आम्ही वस्ताद आहेतच, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडे