शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 11:04 IST

Maharashtra Assembly Election 2024 Manoj Jarange Patil News: मुस्लीम धर्मगुरूंनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. आवश्यक वाटले म्हणून मार्गदर्शन घेतले. यामुळे आता विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Maharashtra Assembly Election 2024 Manoj Jarange Patil News:  एकाबाजूला महायुती आणि महाविकास आघाडीसह परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी तसेच अन्य पक्षांमध्ये जागावाटप, उमेदवारी याद्या यांवर भर दिला जात असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला इशारा दिला असताना मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लीम धर्मगुरूंची भेट घेतल्याचे समजते.

मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन रात्री उशिरा मुस्लिम धर्मगुरू तथा ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांची  भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल दोन तास झाली चर्चा झाली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनोज जरांगे पाटील निवडणुकीबाबत भूमिका जाहीर करणार आहेत. थेट निवडणुकीत सहभागी व्हायचे की पाडायचे? याचा निर्णय होणार आहे. तत्पूर्वी, मनोज जरांगे यांनी मुस्लीम धर्मगुरूशी केलेल्या चर्चेला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले असून, राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे.

मुस्लीम धर्मगुरूंनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे

वेगवेगळ्या चर्चा होणारच. राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर चर्चा झाली. सज्जाद नोमानी हे ज्येष्ठ व्यक्ती आहेत. त्यांच्या समजात त्यांचे एक वेगळे वजन आहे. अशा माणसाला भेटायला गेल्यानंतर त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत. त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यांना दोन-तीन दिवसांचा वेळ हवा आहे. दोन-तीन दिवसांत ते काय निर्णय घेणार हे लक्षात येईल. त्यांचे राज्यभरातील धर्मगुरू आहेत. त्यांच्याशी चर्चा करून ते कळवतील. एक वेगळे समीकरण उभे राहिले पाहिजे. त्यानंतरच सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे. 

विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते

गोरगरीबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र यावे लागणार आहे. शेवटी शेतकरी अडचणीत सापडला आहे. सामान्य जनता अडचणीत सापडले आहे. तेव्हा चर्चा केली पाहिजे, जे वरिष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत, अनेक वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. नोमानी हे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक वाटले म्हणून त्यांचे मार्गदर्शन घेतले. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेला समाज जिथे मानवतावाद असतो, तिथे जात लावून चालत नाही. मानवतावाद जागा ठेवणे महत्त्वाचा आहे. नोमानी साहेब मोठे विचारवंत आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचे प्रचंड मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकते, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

माणुसकीच्या नात्याने भेट घेतली आहे

त्यांची इच्छा होती. पण त्यांना अंतरवाली सराटीत येता आले नाही. त्यामुळे मी इथपर्यंत आलो. माणुसकीच्या नात्याने भेट घेतली आहे. त्यांना अन्यायाची चीड आहे. समाजाचा आणि गोरगरिबांचा मान सन्मान वाढवणे गरजेचे आहे. दोघांमधील चर्चा सकारात्मक होती. धर्मपरिवर्तन, सत्तापरिवर्तनासाठी आपण एकत्र आलेलो नाहीत, ही गोष्ट त्यांना मान्य आहे. गोरगरीब, दलित, शेतकऱ्यांना, गोरगरीब मुस्लिमांना न्याय द्यायचा असेल तर, एकत्र यायला हवे. आपले भविष्य आजमावण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, हाच प्रयत्न आम्ही करत आहोत, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

राजकीय तज्ज्ञ, अभ्यासक आणि वकिलांसोबत एक बैठक

मनोज जरांगे यांनी अनेक राजकीय तज्ज्ञ, अभ्यासक आणि वकिलांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत आताचे राजकारण तसेच भविष्यातील भूमिका यावर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील लोकसभेप्रमाणे विधानसभेला पाडापाडीच्या राजकाणाची भूमिका घेऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुकीत उभे राहूनच विजय मिळावावा, असे काही नाही. पाडण्यातसुद्धा विजय आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.   

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, अशी आग्रही मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाही मनोज जरांगे ऐरणीवर आणत आहेत. मराठा फॅक्टरला दलित आणि मुस्लीम समाजाची साथ मिळाल्याचे लोकसभेत दिसून आले. विधानसभेत जरांगे पाटील उभे ठाकले अथवा त्यांनी काही उमेदवारांना पाठिंबा दिला. तर त्यांच्या मागे हे तीनही समाज एकगठ्ठा उभा राहिला, तर राज्यातील चित्र बदलू शकते, असा कयास बांधला जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMuslimमुस्लीमPoliticsराजकारण